गग ! | |
क ल *-....->->>>>>.-> ४५.
रमणी!
! त्मक, ष
0800000007
वच र
ह
4
क
चनक. कच - नड
प लक जजन व्र प तन अण ७ नक यल स्वी क - > २२ उभ निदा २.
रा
“८
स्स्स्स्््यॉ
शत /॥॥ टिळा
शि
0000002000
ह) 0
(टी (८000000002
च 3
7000. शर रद रि
ऱ्झ ऱ्
0/// 7 /
स्स
टि 77 /
र
तल्णाणाफ-
व्या ८०००५०५ म्य व्य -
ल 1) व । ९... गि र
कि क
दक ७200101 रड टले >> टॅ -2“ ७७.५१ र ण प पष पपरी ५ ५९. //; गैर | ९" र र व्या (>“““ वरो 00 भट ये पसमरकधा ताया मयत एटा दद क ओड, री रोजे श ळी कश, स्यू ब्यारकातकवकातरपऱचपडा गि क ण > - र्ं र स्््ड $ श्रिजळ मळ्यात की पक टो क > व डे टा गील ल ू शी व स्व
छेखक १ यतावतेर प 1 >
क ट्के व द्व ऱ्ट पी व पशर-म्ट._ र
टाचा क णणायळ पक्क "क्व
संबंधीं सर्वे प्रकारचे मालकोहक््क सौ. व्रेजयंती हडप यांच्या स्वाधीन व आहेत
ष्र १७६९४९७७९6 € &६ €९6९८€ €8€6€
; ? ;
“ कादंबरीमय पेशवाई”मधीळ र गंवारांवी
१ याच लेखकाच्या पूवीच्या 9 बळवंत विष्णु परचरे
बारा कादंबऱ्या _ परडुरे पुराणिक आणि संडळी | वड वानी १ बुकसेलसे व पब्लिशर्स, माधवबाग, पेशवाईचें पुण्याहवाचन ? री
र पेशवाईची प्राणप्रतिष्ठा ;
; पेशवाईचे घ्रवदरीन र पेशवाईचा ध्रुव ढळला १ ् पेशवाईचा पुनर्जन्म 1. कादुधी नव
५ पेशवाईचें पुनबेंभव 2 ;
पेशवाईचा दरारा १ रि _---ऱ श
9 पेशवाईतील दुर्जन 2 > टा पेशवाईतील पश्चिमदिग्विजया./ 7!
पेशवाइंतीळ धर्मसिस्स्कार्रा ॑
हि »सेन्वरावाईतीळ उत्तरदिग्विजनय टं
) पेशवाईवरीळ गण्डान्तर | लककेकतकेकेकककऊपकेकळलेकननिवोह ४“ कादंबरीमय पेशवाई'चें पुन-
मुद्रण भाषांतर, रूपांतर वगेरे- करर: कती
शंकर रामचंद्र दाते अ. वि. ग्रहू-लोकसंअह प्रेस; ६२४ सदाशिव, पुर्णे,
भूमिका ५०८७-८६
"पेशवाईचे मन्वंतर! ही 'कादंबरीमय पेशवाई' माळेतीळ तेरावी कार्द बरी होय. या मालेतील यापूर्वीच वारा कादंबर्यांहून या कादंबरीचें स्वर्प जरासे भिन्च आहे. तें असें कीं, यापूर्वीच्या कादंबर्यांत बहुश: पेशव्यांचा प्रामु- ख्यानें उल्लेख व संबंध आलेला आहे; व प्रस्तुत कादंबरींत तसा खुद्द पेश- व्यांच्या मदुंमकीचा फारसा अंश नाहीं. थोरले बाजीराव पेशवे निधन पावल्या- वर् त्यांच्या पश्चात् पेशवाईची वस्त्रें कोणाला द्यावीं याविषयीं सातार्याला याहूमहाराजांच्या दरबारांत फारच मतभेद माजून राहिले होते, त्याच सुमाराला रघूजी भोंसले व फत्तेसिंग भोंसळे वगेरे पराक्रमी वीरांच्या नेतृत्वा- खालीं कर्नाटकची मोहीम जोरानें सुरू होती. वस्तुतः अर्काटचा नबाब व तंजावरचे राजे यांच्यांतील कटकटी नबाबाच्या अघोर राज्यतृष्णेमुळें त्या- पुर्वीच फारां दिवसांपासून अधिकाधिक विकोपाला जात होत्या. नबाब हळूहळू कर्नाटकांतील सर्व हिंदु राजा--महाराजांना व पाळेगारांना मातीला मिळवून व त्याबरोबरच हिंदु धर्माची श्रेष्ठता नष्ट करून कर्नाटकांत एकट्या स्वतःची इस्लामी सावेभोम सत्ता प्रस्थापित करण्याच्या खटपटींत होता- हिंदुपदपादशाहीचा जगड्व्याळ उद्योग जो मराठ्यांनी व पेशव्यांनीं आरंभिला होता, त्याला विघातक असाच हा अर्काटच्या नबाबाचा उद्योग होता. तो उद्योग तसाच वाढूं दिल्यास हिंदुपदपादशाहीचा उद्योग निदान कर्नाटकांत तरी स्वप्नवत् ठरून श्रीछत्रपति शिवाजी महाराजांनीं अ्हनिश परिश्वमांनीं आचरून नांवारू्पाला आणलेले गो-ब्राह्मण-प्रतिपालनाचें महान् ब्रत विफल ठरणार; तें संकट टाळण्यासाठीं मराठझाहीच्या कर्त्या पुरुषांना कर्नाटकावर स्वारी करून तेथील यावनी .जुळूम-जबरदस्तीला आळा घालून आपला दरारा तेथें बसविणें प्राप्तच होतें. असा हा कर्नाटकांतील मोहिमेचा चिर- स्मरणीय ऐतिहासिक प्रसंग प्रत्यक्ष पेशव्यांच्या य्षोगानांत पूर्णत्वाने सामाव- णारा नसला तरी तो 'कादंबरीमय पेशवाई'च्या कथाविस्तारांतून बाजूला ठेवण्याजोगा खास नव्हता. त्या मोहिमेंत मराठे विजयी न होते तर, त्यांच्या
9 भमिका ९
-€५-५१८५/४-/४५८//% /५.४४४४-/%५ ४-८ ५-./४./४- ९.७» ४४” ४१.४.” ४./९_/९ /" १५५४-५१. ४५.५/५.५५./९./ ४४१५ ४५८१४. ९४ ५४ ९.५५. ५५.४. १.० १५.५. ६./१
हिदुपदपादद्याहीच्या महत्तव महत्त्वाकांक्षा, ज्या पुढे क्रमाक्रमाने उत्कर्ष पावून सुमारे पाऊण शतकानंतर कालगतीप्रमाणें अपकर्षही पावल्या, त्या मुळांतच फोल ठरल्या असत्या. इतका आणीबाणीचा प्रसंग तो होता; म्हणूनच पेश- व्यांचीं यशोगीतें गाण्याला त्यांत फारसा अवसर नसतांही पेशवाईचे महत्त्व अप्नत्यक्षत: वाढविणारा तो प्रसंगविशषेषच प्रस्तुत कादंबरीसाठी निवडावा लागला. या प्रसंगांतही इतक्या खरोखरीच्या अद्भुत व रोमांचकारी घटना घडलेल्या आहेत कीं त्यांचें नुस्ते यथावत ऐतिहासिक निवेदनही वाचकांना विस्मयचकित करून सोडील.
या कादंबरींतील मुरारराव घोरपडे, रघूजी भोंसळे, मानाजी, कोयाजी घाटगे, प्रतापसिह महाराज, सफ्दरअल्ली, मीर असद, वगेरे महत्त्ववान् पुरुष तर पुर्ण ऐतिहासिक आहेतच. पण चंदासाहेबाच्या रूपयौवनावर भाळून सर्वस्वी फंसळेली व त्रिचनापल्लीरचे महत्त्ववान् हिंदी राज्य चंदासाहेबाच्या पचनीं पडण्याला कारण होणारी त्रिचनापल्लीची राणी मीनाक्षी, तंजावर- च्या राजवटींतीळ यवन मुृत्सही' सय्यदखान याच्या अत्याचाराला बळी पडून भ्रष्ट झालेली एका देवाल्यांतील देवदासी मोहना, स्वत:ला पुत्रसंतति नसतां रूपी नांवाच्या बटकोचा एक मुलगा जवळ करून तो आपलाच पुत्र असें सांगून कोयाजी घाटग्याच्या कुटिल संमतीनें त्या दासीपुत्राळा ( तो इतिहासांत काटराजा या नांवानें प्रसिद्ध आहे ) तंजावरच्या गादीवर बसविण्यासाठी नान्ना कारस्थाने करणारी अपरूपा राणी, या स्त्री-भूमिकाही पूर्णपणें ऐति- हासिक आहेत. करुणा राणी, झंझारराव, सच्चिदानन्द वगैरे अवान्तर व्यक्ति काल्पनिक असल्या तरी त्या इतर प्रमुख ऐतिहासिक व्यक्तींच्या व मुख्य इति- हासम्रसंगाच्या पुरक आहेत. त्यामुळें कथानकांतील ऐतिहासिक ओघ बद- लणार नाहों व त्याला वैगुण्यही येणार नाहीं, अशी शक्य ती खबरदारी घेण्यांत आली आहे. शिवाय ऐतिहासिक कादंबरी म्हणजे खरा इतिहास नसून इतिहासाची आभासात्मक स्थूल रूपरेखा होय, इतकें विस्तृत कथाक्षेत्र म 'कादंबरीमय पेशवाईच्या पहिल्या कादंबरीपासून आंखून घेतलेले आहे, हे. माझ्या वाचकांना माहीत आहेच.
'पेशवाईवरीळ गंडांतर' ही 'कादंबरीमय पेशवाई'मधील बारावी कादंबरी भ्रसिद्ध झाल्यानंतर ही तेरावी कादंबरी प्रसिद्ध होण्याला दोन वर्षांपेक्षा जास्त
भमिका घु अवधि लागला व त्यामुळें या कार्याविषयीं अनेकांना शंकाकुदंका काढण्याला अवसर मिळाला. कांहींदी अशी गेरसमजूतही होऊन बसली कीं-गेल्या वर्षी त्यांपेकीं एका गृहस्थाने महाराष्ट्र-वाऊमयाचा सांवत्सरिक आढावा घेतांना “मराठींत ऐतिहासिक कादंबऱर्यांविषयीं लोकांना आतां विशेष आवड राहिली नाहीं. त्यामळे ऐतिहासिक कादंबऱ्या मराठींत अलीकडे प्रसिद्ध होत नाहींत. याचें प्रत्यंतर म्हणजे श्री. हडप यांच्या कादंबरीमय पेशवाई मधील एकही कादंबरी' या वर्षी प्रसिद्ध झाली नाहीं.” अद्या आशयाचे उद्गार आपल्या लेखांतून काढले. दुसर्या कांहींनीं मला लेखकालाच दोष दिला; द खुट्ट माळेचा वाचकवर्ग तर मी आणि 'कादंबरीमय पेशवाई'चे प्रकाशक या दोघांवरही थोडा फार रुष्ट झाला आहे. हा रुष्टपणा अर्थात् आपुलकीचा आहे; मालेंतून साधारणत: दर तीन महिन्यांनीं एक कादंबरी प्रसिद्ध करा- वयाची या आमच्या पुर्वसंकल्पानुसार कार्य मुळींच होत नाहीं याबद्दलचा तो रुष्टपणा आहे. त्यांत वाचकांची '“कादंबरीमय पेशवाई” विषयींची उत्कंठा व आपुलकीच ठळकपणें दिसून येत आहे. व म्हणूनच आम्ही-- लेखक व प्रकाशक दोघेही वाचकांचा तो रुष्टपणा शुभाशिर्वाद म्हणून अत्या- दराने शिरीं धारण करून हें कार्य आजवर अपरिददार्य कारणांमुळे दिरंगाईवर पडलें होतें त्याबद्दल वाचकांची मनःपुर्वक क्षमा मागतों व यापुढे अशी दिरं- गाई वाचकांना अनुभवावी लागणार नाहीं असें त्यांना आश्वासन देतों. सात्र * सरासरी गुडघाभर पाणी ' अशी वाडमयाची सरासरी काढण्यासाठी 'कादंबरीमय पेशवाई'चा आधार घेऊन, ज्या अर्थी या मालेंतील कादंबऱ्या अलीकडे प्रसिद्ध झाल्या नाहींत त्या अर्थी वाचकांची ऐतिहासिक कादंबऱ्यां- विषयींची आवड ओसरत चाळली असे अदूरदर्शीपंणाचे अंदाज काढणाऱ्या व इतर सर्वे शंकेखोरांना आणि टीकाकारांनाही मी येथें स्वानुभवाने नम्गरतापूर्वक सुचवूं इच्छितो कीं त्यांचा हा युक्तिवाद सुतराम् खरा नाहीं. एवढें खरें आहे कीं, काळ झपाट्याने पालटत आहे, त्याप्रमाणेंच नव्या पिढीची रुचिपालटही होत आहे; तरुण पिढी झपाट्यानें प्रगतिपथाचें आक्रमण करीत आहे. अश्या वेळीं पुराणेतिहासांतील “ शिळोप्याच्या गोष्टी ' वाचण्यापेक्षा आज- कालचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ज्यांत करण्यांत आला आहे अश्या सामाजिक केथा--कादंबऱ्या वाचकांना वाचावयाला आवडतात. आणि वाचकांकडून मजवर
न भूमिका
*“१४५-४0%.४४-४१५-४ १.” ४५//. ४_१५, ५,५१५ ११५ ८ ४ ८४५0९. १.५४. ४_५९./१५ /0५/०१.” १५ ४. १ “0-४ ४८४४.” १५/%- ८ण- “६.४५. ४ ४० ४.४ ४.४ ४-0 “५८ “४६-४४.” ५-/"-/४*-०" ४" “0४-१४ ४८८४-४४. ४८४ ७-८ ६. ४८४ ची
आत्मप्रोढीचा आरोप लादला जाणार नाहीं अशा भरंवश्ानें मीही सांगतों कीं मला स्वतःला देखील “शिळोप्याच्या गोष्टी' मुळींच आवडत नाहींत. तथापि प्रगमनश्ील कुशल लेखक जर पुराणेतिहासांतील परंपरागत शिळेपणा दुर करण्यासाठीं देश-काल-परिस्थितीशीं त्या शिळ्या गोष्टींचा योग्य समन्वय करून आणि वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांकडे तजर देऊन आज व उद्यांही मार्गदर्शक होईल असें पौराणिक व ऐतिहासिक कथावाडमय निर्माण करील, तर तें निःसंशय लोकमतप्रवर्वक होतें व तें वाचकांना आवडतेंही. 'कादं- बरीमय पेशवाई मधील कादंबऱ्यांची रचना मी प्रारंभापासून याच जाणि- वेनें करीत आलों आहें, व त्यामुळेंच सहस्त्रावधि वाचकांना ही माला कधीं एकदां यथावत पूर्ण होते आणि या मालेंतील संकल्पित पंचवीस कार्दबर्यांपैकीं तव॑ कादंबऱ्या कधीं एकदां वाचावयाला मिळतात अद्यी तळ- मळ लागून राहिली आहे.
इतर सामाजिक कथा-कादंबर्या लिहिण्यापेक्षा ऐतिहासिक कादंबऱ्या सूळ इतिहासांतीळ शिळेपणा दूर करून पण ऐतिहासिकता कायम ठेवून व सत्यविवेचनात्मक परंतु जिवंत अद्या पद्धतीनें लिहिणें बरेंच अवघड आहे. सामाजिक कथा-कादंबऱ्यांतून लेखकाला आपल्या कल्पनांच्या खेळाचा पसारा जसा निरंकुशपणें मांडतां येतो, तसा ऐतिहासिक कादंबऱ्यांतून मांडतां येत नाहीं. यामुळें सामाजिक कथा--कादंबरी-लेखन जितक्या झपाट्याने करतां येते, तितक्या झपाट्याने ऐतिहासिक लेखन करतां येत नाहीं. गेल्या दोनतीन वर्षांत पेशवाईवरील कादंबरी एकही निघाली नाहीं,पण माझा इतर वाडःमय- पसारा बराच वाढला याचें कारण हेंच होय. तथापि यापुढें कादंबरीमय पेशवाई' मधील कादंबऱ्या आतां नियमितपणे दर तीन महित्यांनीं एक याप्रमाणें पूर्व- संकल्पानुसार माझ्या हातावेगळ्या होतील असें मी येथें माझ्या प्रिय वाचकांना आडइवासन देऊं शकतों. कारण ही तेरावी कादंबरी हातावेगळी करतांना 'पेशवाईचा पुनर्विकास' ही माढेंतीळ चौदाबी कादंबरी लिहून तयार असून पुढील पंधरावी कादंबरीही बहुतेक पुरी झाली आहे. कोणत्याही कारणाने कां असेना, एकदां रेंगाळत पडलेळें माठेच्या प्रसिद्धीकर- णाचें काम पुन्हां सुरू करावयाचे तें “याला पुन्हा अस्थानी विलं- बांचे गालबोट लागूं नये अह्या तयारीतेंच सुरू करावयाचे असें मीं
भमिका ७ प्रकाशकांच्या, माझ्या व वाचकांच्या वतीर्ने ठरवून ही नियमित- पणाची पूर्वतयारी केली आहे, अर्थात यापुढे 'कादंबरीसथ पेशवाई' मधील कादंबरत्रा नियसितपर्णे यथासकल्प प्रसिद्ध होत जातील असा भरंवसा वाचकांनी बाळगावयाला मुळींच हरकत नाहीं असें वाटते. वाचकांपेक्षा प्रकाशकांना व प्रकाशकांपेक्षां मला हें कार्य शक्य तितकें सर्वांग- सुंदर व शक्य तितर्क्रे लवकर हातावेगळें केव्हां होतें अशी तळमळ लागून राहिली आहे. 'कादंबरीमय हिददी' हें माझे अत्यंत प्रिय असें जीवितकार्य आहे, व * कादंबरीमय पेशवाई' हा त्या जगड्व्याळ कार्याचा एक भाग आहे. चाचकवंदालाही माझी ही वाड्मयसेवा अत्यंत प्रिय होऊन बसली आहे. हें कार्य नियमितपणे झाले तरच माझ्या या जन्मीं हातावेगळें होईळ एवढें विराट आहे, व हें कार्य केल्याशिवाय मी इहलोकची यात्रा संपविण्याला तयार नाहीं. ऐन तारुण्यांत मीं एथवरची मजल गांठली आहे, त्या अर्थी ह॒यातींत एवढं हे 'कादंबरीसय हिंदवी'मधील सुमारें चाळीसपन्नास ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लछेखनकार्य मी माझे इतर सर्व साहित्यविषयक व्याप सांभाळून पूरे करीन अज्ञी उभेद बाळगल्यास ती अस्थानीं खास होणार नाहीं.
आदर्श वाडमय प्रकाशन |
अक्षतवितीया, शके १८५६ - गि सर्वांचा नम्तर, _ पुणे २. | विठ्ठल वामन हडप
'कादेबरीमय पेशवाई'ची पुढील चौदावी कादंवरी
पेशवाईचा पुनर्विकास
ह्या,
थोरल्या बाजीरावांच्या निधवानंतर राजवटीं-
तल्या प्रमाणेच शाहु महाराजांच्या राजवाड्यांतही सवतीमत्सरामुळें व अधिकारतृष्णेमुळे दोन राण्यांतील अंतःकलहाची परमावधी झाली. रघूजी भोसले व बारामतीकर नाईक यांनीं थोरल्या राणी सकवारबाईच्या छायेखालून नानासाहेबांना पेशवाईपदावरून भ्रष्ट करण्याची शिकस्त केली. त्या विरोधकांच्या संघटित प्रयत्नांना कांहीं काळ यश आलें, तरी पुन्हां नानासाहेबांनाच बोलावून आणून राज्यकारभार त्यांच्या हातीं सोंपविणें महाराजांना प्रास्त झाले. त्या हूदयस्पर्शी प्रसंगावर ही कादंबरी विरचिली गेली आहे.
शं १- 4१-०9 तव......2>४७>& >४..:2 > ०-.--:51.352 “च्य -म्स्नन्य २ 5290 मळ ::&.102..99ााळानाळाळळळा र
2०70-27 -.--_:-:--.----न्-
४ ७६... अक काक
प्रकरण १ लं राणी मीनाक्षी फंसली !
न्यिचनापल्लीचा किल्ला* एवढा अजिक्य-कर्नाटकांत फार पुर्वीपासून केक दतरके अजिक्य म्हणून जे किल्ले प्रख्यात होते,त्यांत अग्रस्थानी चमकणारा मी मी म्हणणारे एकाहून एक कर्दनकाळ शत्रू अनकदां तो किल्ला पाडाव करण्याच्या ईषेनें जिवावर उदार होऊन चालून आले. त्यांतले कांहीं किल्ल्या- बाहेर बळी पडले तर कांहीं किल्ल्याच्या दरवाजांत हात टेकून माधारे गेले; पण शत्चूकडील मुंगीलादेखील कधीं आंत रीध मिळाली नाहीं. त्याच किल्ल्याचा दरवाजा एके दिवशीं एका अधमाधम म्हणून गाजलेल्या अविधासाठीं एका लर्णांत सताड उघडा झाला व त्या अविधाला आपल्या बरोबरच्या लढवय्या
__ & त्रिचनापल्ली एथे नायक राजे राज्य करीत पस्य एर्थे नायक राजे राज्य करीत असतां तेथील शेवटचा राजा विजयरंग हा इ. स. १७३१ त मृत्य पावला व त्याच्या गादी- विषयीं त्याची राणी मीनाक्षी आणि दुसरा वारस वंगारू तिरुमल यांच्यामध्ये. तंटे सुरू ज्ञाले. ही उत्कृष्ट संधि साधून अर्काटच्या नवावानें आपला मुलगा सफदरखान व जांवई चंदासाहेब यांस त्रिचनापल्ली एथील तंटा मिटविण्या- करितां पाठविलें. चंदासाहेबाने तेथें जाऊन मोठ्या युक्तीनें राणी मीनाक्षी हिला अनुकूल व वद्य करून घेतलें; आणि त्रिचनापल्ठीचा किल्ला व फौज आपल्या ताब्यांत घेऊन त्या राजस्त्रीला विशवासघातानें बंदिवासांत टाकलें. याप्रमाणे चंदासाहेब त्रिचनापल्लीचा स्वसत्ताधारी नबाव बनळा आणि राणी मीनाक्षी ही बंदिवासांत दु:खाश्चू गाळीत आपल्या आयुष्याचे दिवस कॅटू लागली... .. अशा प्रकारें इ. स. १७३६ मध्ये तंजावरच्या शेंजारचें त्रिचनापल्लीचे प्राचीन हिदु संस्थान चंदासाहेबाच्या ताब्यांत गेल्यामुळें त्याचें नांव दक्षिण हिंदुस्थानामध्यें प्रसिद्धीला आले व तिकडील राजकारणा- मध्ये त्याचे महत्त्व फार वाढलें. "णइतिहाससंग्रह.
२ पेशवाईचे मन्वंतर सेन्यासह हंसत खेळत किल्ल्यांत प्रवेश मिळाला ! इतकेंच काय ? पण तो अविध आंत जातांच अनेक सृंदर व तरुण राजदासींचा ताफा त्याला पंचा- रत्या ओंवाळण्यासाठीं पुढे आला, व त्या दासीजनांनीं कुंकुमाक्षतादि मंगल चिन्हांनी अलंकृत केलेल्या त्या अविधाचें स्वागत करण्यासाठीं स्वतः राशी मीनाक्षी देखील सस्मित वदनानें किल्ल्यांतीलळ राजमहालाच्या महादार्रांत उभी होती ! |
असें कसें झालें ? याचें कारण असें कौ, अर्काटचा नबाब दोस्तअल्ली _ हा तर अखिल भारतवर्षातील हिंदवीला मूठमाती देऊन जिकडे तिकडे इस्लामी दुनियेचा जगडूव्याळ पसारा मांडण्यासाठी हरयुक््तीनें झटणाऱ्या बादशाही सत्ताधारी यवनांत अग्रमालिकेंत शोभणारा. आणि तोदेखील बादशाही सत्तेच्या उत्कर्षासाठी झटत नसून स्वतःच्या वेयक्तिक उत्कर्षासाठी झटत होता. 'मी अर्काटचा नबाब आहें तो उभ्या कर्नाटकाचा नबाब होऊन स्वतंत्र- . पणे अपार राजवेभव कधीं उपभोग लागेन' हया महत्त्वाकांक्षेचें वेड त्याच्या अंगीं पुरेपूर बाणलेलें. तो कर्नाटकांतील सर्वेच लहानमोठ्या हिंदु राजसत्तांना रावंदिवस पाण्यांत पहात होता. त्याचा जांवई चंदासाहेब हा तर आपल्या सासऱ्यालाही सहस्रवार बरा म्हणविणारा होता. त्याची तडफ व हिंदु राज्यें बुडवून सवेत्र एकजात मुसलमानी सत्तेचा वरवंटा फिरविण्याची दुर्देम ईर्षा पाहूनच दोस्तअल्ली नबाबानें त्याला आपली मुलगी देऊन घरजांवई केलें होतें व आपल्या दिवाणपदाचीं वस्त्रे देऊत त्याला मोठ्या मान्यतेला चढविले होतें. नबाबाचा धघरजांवई झाल्यापासून चंदासाहेबानें कर्नाटकांत जीं अनन्वित कृत्यें केलीं होतीं त्यांचा दुष्कीतिमय दुर्गंध नुसत्या कर्नाटकांतच नव्हे, तर जवळजवळ आसेतुहिमाचल दरवळूं लागला होता. हिंदु काय, मुसलमात काय किंवा इंग्रज-फ्रेंच वगेरे वणिग्वत्तीच्या ब्रख्याखालीं आपल्या राज- सत्तेचें जाळें हिंदुस्थानभर प्फॅकण्याला टपून बसलेले परद्धीपस्थ लोक काय, सर्वांनाच चंदासाहेब हें एक सर्पाचे पिल्लं आहे असें खात्रीपूर्वक वाटत होतें अश्या कलिपुरुषाला त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत अनिरुद्धपणें प्रवेश मिळालेला पाहून कोणालाही आइचर्ये वाटणें अगदीं स्वाभाविक होतें
पण ह्या प्रकारामुळे किल्ल्याबाहेरच्या लोकांना जितर्के आश्चर्य वाटलें तितकें किल्ल्यांतल्या लोकांना वाटले नाहीं. ' चंदासाहेबाला किल्ल्यांत
राणी मौनाक्षी फेसली ३
प्रवेश कां मिळाला हें त्या लोकांना माहित होतें. तेथली तरुण, विधवा व विलासप्रिय राणी मीनाक्षी चंदासाहेबाच्या मोह॒जालांत गुरफटली गेली आहे हें त्यांतील इंगीत किल्ल्यांतल्या बहुतेक लोकांना कांहीं दिवसांच्या प्रत्यक्ष अनुभवानें कळून चुकलें होते. तेथला राजा विजयरंग हा मृत्यु पावल्या- दिवसापासून त्या तरुण रागीच्या वर्तनाविषयीं लोकांना संशय घ्यावयाला भरपूर अवसर मिळण्याजोग्या अनेक गोष्टींचा बोभाटा झाला होता. राजाच्या मृत्यूनंतर कांहीं काळ राणी मीनाक्षीच राज्य करीत होती. असा प्रकार कांहीं वर्षे चालल्यानंतर वंगारू तिरुमल या नांवाचा दुसरा एक वारस पुढे येऊन गादीसाठीं भांडं लागला व ही भाऊबंदको राज्याचे अंतरंग दिवर्से- दिवस चांगलेंच पोंखरून खाऊं लागली. ही संधि तें राज्य गिळंकृत करण्याला फार नामी आहे असें पाहून नबाब दोस्तअल्लीनें चंदासाहेबाला त्रिचनापल्ली- कडे तिर्ऱ्हाइती करून तेथली भाऊबंदकी मिटवण्याच्या मिषाने पाठविलें. नवाब मोठा धूर्ते व अतुभवी माणूस होता. विजयरंगाच्या मृत्यूपासून पुढे वांगलीं पांचसात वर्षे त्यानें त्या राज्यांतील घडामोडींकडे डोळ्यांत तेल घालत लक्ष ठेवलें होतें. त्यासळे तरुण राणीची विषयांधता व वत्तिचांचल्य आणि तिला प्रतिस्पर्धी म्हणन पढे आलेल्या तिरुमलाची असहायता त्याला चांगली माहीत झाली होती. चंदासाहेबाची स्त्रियांच्या बाबतींतील नेसगिक अधम वृत्तीदेखील नबाबाच्या पूर्ण परिचयाची होती. असे असतां पांचसात वर्षांपावेतों नबाबानें ह्या बाबतींत कांहींच हालचाल केली नाहीं याचें कारण राणी व तिरुमल यांपैकीं कोणता घांस आपणाला दांत लावण्याचे देखील श्रम न घेतां घशांत टाकतां येईल याचा अचूक अंदाज त्याला मिळाला नव्हता राणी कशी झाली तरी बायको माणस, तिच्या अंगीं राज्यकतेत्व तें काय असणार ! तिचा प्रतिस्पर्धी तिला आज ना उद्यां बाजला लोटन स्वतः: राजा होण्याइतका चतुर व कर्तबगार होता. न जाणो, आज त्याला दृखवन राणीला पाठीशीं घालावे, आणि उद्यां त्याचीच सरशी झाली तर! ह्या भीतीस्तव नबावाच्या मनांतून तिरमलालाच शक्य तों आपल्या पंखाखाली ओढावयाचें होतें. परंतु जाणूनबुजून शत्रूच्या जवड्यांत शिरून तेथें झोंपी जाण्याइतका तिरुमल भोळा नाहीं असें आढळून येतांच राणीला व तिच्या निमित्ताने त्रिचनापल्लीच्या राज्याला घक्यांत टाकण्याचा त्याचा निश्चय
9 पेशवाईचे मन्वंतर
न“ > >“ ">
कायम होऊन त्याने त्या कामगिरीवर आपला जांवई चंदासाहेव आणि मुलगा
वाजूंनी सफदरअल्लीपेक्षां पुष्कळच उजवा असल्यानें राणीला वश करण्याच्या कुटिल कारस्थानांत तोच अखेर विजथी झाला व सफदरअल्लीला हिर- मसल्या वृत्तीनं माघारें यावें लागलें.
चंदासाहेबानें आज उघडपणें त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्यांत प्रवेश करण्या- पूर्वीच परस्पर संन्या्याच्या हातून विचू मारावा त्याप्रमाणें राणीकडून तिचा प्रतिस्पर्धी तिरमळ याला हहपार करविले होतें. तिरुमलाला नबाब व चंदासाहेब यांच्या ह्या कृष्णकारस्थानाची चांगली ओळख पूर्वीच झाली असल्याने त्यानें हद्दपार होण्यापूर्वी एकदां राणीपाशीं त्याचा आपलेपणाने परिस्फोट करून तडजोडीची इच्छाही दर्शविली होती. पण कामांध राणीला ती आपल्या प्रियकराची वृथा निदाशी वाटली, व तिनें तिरुमलाशीं तडजोड न करतां उलट त्याला हह्पार केलें.
मात्र राणी जरी विषयांध होती तरी भोळी नव्हती. ती चंदासाहेबासारख्या प्रियकराच्या सहवाससोौख्यासाठीं आपल्या राजवेभवावर लाथ मारायला तयार नव्हती. चोहोंकडून लोक चंदासाहेबाच्या कृष्णकारस्थानाविषयीं बोल्यू लागले, त्याचा तिच्या मनावर मुळींच परिणाम झाला नाहों अर्से नाहीं. पण मुसलमान लोक हे एरव्ही लबाडी, फंसवाफंसवी व क्र्रपणा अशीं कितीही अनन्वित कृत्ये करायला तयार झाले तरी ते आपल्या धर्माशीं कधींच बेइमान होणार नाहींत, असा तिचा प्रामाणिक समज होता. तिनें चंदासाहेवाला किल्ल्यांत प्रवेश देण्यापूर्वी एके दिवशीं एकान्तांत ' तुम्ही किल्ल्यांत आल्यावर माझ्याशी बेइमानी तर करगार नाहीं ना?” असें विचारलें व त्या निमित्ताने आपल्या कानांवर आलेले सारे लोकप्रवाद त्याच्या कानांवर घातले. चंदा- साहेबानें अर्थात् त्या सर्वे आरोपांचा इन्कार केला. इतकेच काय पण आपल्या निर्दोषतेर्चे नाटक यथावत् रंगावें म्हणून कुराणाच्या शपथेवर राणीशीं इमान राखण्याचें वचन देण्याला तो तयार झाला. त्याला वाटलें होतें कीं राणी त्या थराला प्रसंग आणणार नाहीं. पण राणीला तें पाहिजेच होतें. तिनें कुराणाची दापथ घ्यावयाला सांगतांच त्यानें आपल्या एका नोकराला अंमळ वाजला घेंऊन प्रथम हळुहळू कायसे त्याच्या कानांत पुटपुटून लगेच राणीला
राणी मीनाक्षी फंसली प्र
0१-0४". ५-८ ६.५ १५८४१७५ १. 00०४-०१-४१ ४४७४७०४७७० “0४-०९” ४०००५ ४-०"४/४५७४७४ ४७४४५४७ ४” मिरा क्य
एकू जाईल अद्या मोठ्याने त्याला कुराण आणावयाला सांगितलें. नोकराने भरजरी बासनांत बांधून आणलेलें कुराण (? ) हातीं घेऊन त्यार्ने राणीच्या देखत नतमस्तकपुर्वेक शपथ वाहिली, “ हया माझ्या पवित्र क्राणाला स्मरत मी आपणाला वचन देतों, राणीसाहेब मी आपणाशीं आजनत्भ विदवासानें वागेन व त्रिचनापल्लीची सारी राजसत्ता! आपल्या हातीं अव्याहतपणे राहील अशी तजवीज सी करीन. ”
त्याच वेळीं राणीने पुढेमागे आपल्या मांडीवर दत्तक घेऊन त्याच्या नांवानें राज्य चालविण्याचा आपला मनोदय व्यक्त केला,व त्या तिच्या धूर्ते प्रियकराने त्याही गोष्ठीला कुराणाच्या शपथेनें संमति दिली. आतां राणीला अविश्वास बाळगण्याचे कारण कोठें उरलें ? इतकेंच काय पण राणीतें आपल्या सर्वे कारभार््यांनाही आपली ही सर्व मसलत कळविली व त्यांपैकीं बहुतेकांनी तिच्याप्रमाणेंच भोळेपणानें चंदासाहेबाच्या शपथेविषयीं विश्वास दाखविला. ज्या थोड्या महत्त्वाच्या लोकांनीं याविषयीं अविश्वास दाखविला, त्यांच्या वाट्याला तुरुंगवास आला, व कांहींचा तर किल्ल्याच्या तटावरून कडेलोटही करण्यांत आला.
इतक्या खुल्या दिलाने एकमेकांच्या आणाभाका झाल्यावर त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत चंदासाहेबाला राजरोसपणें घरच्या मालकाप्रमाणें प्रवेश मिळाला यांत नवल तें काय ? पण किल्ल्याच्या आंत प्रविष्ट होतांच सूर्यास्ताच्या पुर्वीच चंदासाहेबानें आपलें खरें स्वरूप प्रगट केलें. किल्ल्यावरील कोणते लोक आपणाला अनुकूल आहेत व कोणते प्रतिकूल आहेत हें त्याला इतक्या दिव- सांच्या अनुभवानें चांगलें माहीत होतें. जे लोक अनुकूल होते, त्यांना त्यानें ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे खूष केलें. जे अर्धवट निश्चयाचे पण स्वार्थ- साधू होते, त्यांनाही त्यानें हां हां म्हणतां आपल्या बाजूला वळवून घेतले मात्र जे विरुद्ध होते, त्यांची सर्रास कत्तळ करून आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाचा नायनाट करायला त्याने कमी केले नाहीं. राणीला हा अनर्थ पाहून अत्यंत विस्मय वाटला. तिनें त्याला त्या कृत्याचा जाबही विचारला, “ माझ्यावर तुमचें प्रेम होतें, त्या प्रेमाचा हाच अर्थ काय? ”
यावर त्यानें खुनश्शीपणानें हंसून तिला उत्तर दिलें, “ राणीसाहेब ! माझें प्रेम तुमच्या दोलतीवर होतें, तुमच्यावर नव्हतें. मला विलासविहारांची
न पेशवाईचे मर्न्वंतर
ञवड आहे खरी; पण माझ्या जनानखान्याला पुरून उरण्याईतक्या सुंदर व तरुण मुली तुमच्या राज्यांत मळा मिळण्याजोग्या असतांना मी तुमच्या ठायींच कां म्हणून आसक्त राहुं ? रोज तीनत्रिकाळ ताज्या ताज्या सुवासिक फुलांची पखरण पायांवर पडावी इतका मी थोर भाग्यवान् असतांना निर्माल्यां- तीळ कोमेजलेल्या फुलावर मीं संतोष कां म्हणून मानावा? ”
त्याच्या त्या परमावधीच्या निष्ठुर बोलांनीं बिचाऱ्या राणीच्या हृदयाचे दातशः तुकडे तुकडे केले. आपण फंसलों, ह्या विश्वासघातकी चांडाळानें आपला केंसानें गळा कापला, हें ती पक्के ओळखून चुकली. तिनें त्याला काकुळतीला येऊन विचारलें, “ विदवासघातक्या, तूं माझ्याशीं बेइमान झालास तो झालास; पण आपल्या धर्माशींदेखील बेइमानी करतोस! तृ अस्सल मुसलमान नाहींस. ”
“मी अस्सल मुसलमान आहें. मीं माझ्या धर्माशी बेइमानी केलीही नाहीं व मरेतों करणारही नाहीं. ”
“ तर मग तूं सकाळींच माझ्यापाशी कुराण हातीं घेऊन शपथ घेतलीस त्याचा अर्थ काय? ” ज्या महालांत त्या दोघांची सकाळीं भेट होऊन शपथेचा खेळखंडोबा झाला होता, त्याच महालांत त्या दोघांचे आतांचें संभाषण चाललें होतें. सकाळचे तें भरजरी बासनांतलें कुराण अजून तिथेंच पडले होतें. तें हातीं घेऊन राणीनें चंदासाहेबापुढे करून विचारलें, “ ह्या तुझ्या पवित्र धर्मंग्रंथाची तरी कांहीं लाज राख! ”
चंदासाहेबाने विकट हास्य करीत राणीच्या हातांतून तें बासन हिसकावून घेतलें व तें उलगडून तिच्यापुढे फेकीत म्हटलें, “ज्या कुराणाची शपथ मीं सकाळीं घेतली तें हें कुराणपहा ! ”
तें कुराण नव्हतें; ती जरीच्या वासनांत गुंडाळलेली मातीची वीट होती ! राणी तो प्रकार पाहून जास्तच खवळली व चंदासाहेबाळा अगणित शिव्या- शाप देऊं लागली. पण त्याचा परिणाम काय झाला? त्याच क्षणीं त्या विश्वासघातक्याच्या मुखांतून निघालेल्या हुकुमासरसा बिचारीच्या कपाळीं जन्माचा बंदिवास आला. शिपायी तिला धरून केदखान्याकडे नेऊं लागले तेव्हां जखमेवर मिठाचे पाणी शिपडावें त्याप्रमाणें त्या मदोन्मत्ताने आणखी उ गार काढले, “ मूर्ख स्त्रिये, मला विरोध करणाऱ्या सवे मकेटांचा जसा
राणी मीनाक्षी फसली ७
मीं आज कडेलोट केला, तसाच तुझाही केला असता. पण ह्या एथली राज्यसत्ता एकतंत्री माझ्या हातीं येईपावेतों मला तुझी गरज आहे, म्हणून तुला जिवंत ठेवीत आहें. ”
अश्या प्रकारें ती अभागी राणी आपल्या राजधानींत बंदिवान होऊन पडली; व दुसर्या दिवशीं सकाळीं सारे लोक पहातात तों किल्ल्यावर नायक राजवंश्याचा झेंडा जो नेहमीं हवेंत फडकत असे, तो नाहींसा होऊन त्या जागीं अर्काटच्या नबाबाचा रंगीत झेंडा फडकं लागला ! अवघ्या ओट छटकांत त्या प्राचीन हिंदु राज्याचा असा विध्वंस झालेला पहाण्याचे सहखररिम सूर्याच्या जिवावर आलें म्हणूनच कौ काय, दुसर्या दिवशीं आकादह्यांत काळ्या कुट्॒ ढगांचे काहर उसळून एक प्रहरभर सूर्यदर्शनही झालें नाहीं !
टॅ पेशवाईचे मन्वंतर
"१-८ ५७४५४ ४-९ ०८१४” 0. ५-/५” "५१५ "५ ५८ ५.८ - ४-८ ५ ४-५ ५९१.” * “% ८ ८. ५५ १-८ ४५ ८. * ८ १.० ५.८ ४. ५.» ४-० ४८-१५. १.८१ ४८.८ ९-० ७.० ४-४ ४-७ यची 39.०. ६/१/५/२०८१
प्रकरण २ रं तंजावरची कहाणी
४; चनापल्लीच्या हिढू राज्याची दुर्दशा करण्यांतच चंदासाहेबाचा ग्रमुर हात होता असें नाहीं, तर जवळचेंच तंजावरचें हिंदु राज्यदेखील त्याच्य किवा याहीपेक्षा स्पष्ट भाषेंत बोळावयाचें तर बांडगुळाप्रमाणें हिंदु समाजाच्य प्रचंड वृक्षाचा जीवनरस शोषण करून सामर्थ्येवान् झालेल्या अनेक सत्ताधार्र मदोन्मत्त मुसलमानांच्या डोळ्यांत सलत होतें व हिंदवीचें निर्मूलन कोणत्य उपायांनीं करतां येईल याविषयीं जो तो डोळ्यांत तेल घालून झटत होता या बाबतींत कोणताही पाशवी प्रयत्न करण्यांतदेखील त्या प्रांतांतील मुसव्ल मान कोणाला हार जाणारे नव्हते, हें वाचकांना चंदासाहेबाच्या उदाहरणावरून आढळून आलेंच आहे. तसाच तंजावरच्या राज्याविरुद्धही ह्या मानर्व प्राण्यांनी कसा बेमालूम व्यूह रचिला होता व त्याचीं पाळेंभुळें किती खोर गेलीं होतीं, याचें यथावत् ज्ञान करून देण्यासाठीं एथें प्रथम तंजावरची कहार्ण) तिवेदन करणें अवश्य आहे. शिवद्याहीच्या प्रथम चरणांत कर्नाटकांत मराठ्यांचा दरारा चांगळा*च गाजला व शिवशाहींत छत्रपति म्हणून दिगंतीं प्रख्याति पावलेल्या भोंसले राजवंशांतील कांहीं पराक्रमी पुरुषांच्या हस्ते तंजावर एथें मराठी राज्याःची स्थापदा झाली. त्यावरोबरवच इतर अनेक कर्तेबगार मराठ्यांनींही अपार मान-धन-वैभवाची जोड संपादन करून त्या प्रांती वास्तव्य केलें. त्यांतच घोरपडे वंक्षाची प्रासुख्यानें गणना होते. मराठी अंमलाची ही भरभराट कर्नाटकांत संभाजी व राजाराम ह्या दोघां छत्रपतींच्या अमदानींत ओहोटीला लागली, व मराट्यांच्या उद्योगाला आळा बसल्यानें कर्नाटकप्रांतीं बादद्याही सत्तेला पुन्हा डोकें वर काढण्याला अवसर मिळाला. वस्तुत: मोगलांचा कर्नाटकांतील उद्योग मराठ्यांच्या पुर्वीचा होता. फार प्राचीन काळापासून दक्षिण हिंदुस्थानांत अनेक प्रबळ हिंदु राजांची सत्ता होती, त्यावेळीं निरनिराळ्या! ठिकाणीं जमाबंदीच्या वगेरे कामावर जे अंमलदार नेमण्यांत याले होते, ते तीं राज्ये नष्ट झाल्यावर देखील तेथेंच वंशपरंपरागत वतने सांभा-
तंजावरची कहाणी न
२. /* “४ ४ “0१५ 770१-४१.” * “०४-५४.” “ ४४ “7"./0४५/*%./५ “४५१५ “0४५0 0 रोक कॉमेडियन अक
ळून राहिले. त्यांना पुढें पाळेगार अथवा संस्थानिक ही संज्ञा प्राप्त झाला अवरंगजेव बादशहानें कर्नाटकावर बादशाही सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठ्यांनीं महाराष्ट्रांतच सवे बाजूंनीं दे माय धरणी ठाय करून सोडल्यामुळें कर्नाटकांत आपला यथास्थित अंमळ बस- विण्याला त्याला पुरेसा अवसर मुळींच मिळाला नाहीं. तेथल्या पाळेगारांनी त्याला मुळींच दाद दिली नाहीं. परचक्र आलें कीं तेवढ्यापुरती नमाता दाखवून खंडणी वगेरे देऊन आपला बचाव करावयाचा व मागे आपलें ये रे माझ्या मागल्या आहेच. मराठ्यांनादेखील त्या प्रांती हाच अनुभव आला त्यांनीं त्या प्रांती आपला दरारा वसविला खरा; पण तो अगदींच विस्कळित स्वरूपाचा होता. वादश्ाही अंमलाची वावटळ जरी त्यांनीं थोपविली, तरी बादशाही अंमलदार जे ठिकठिकाणीं आपले पाय रुजवून वसले होते; त्यांची उठावणी करण्याचें राहन गेलें. औरंगजेब वाददाहाच्या पक्ध्चात मृत्युपंथाला लागलेल्या दिल्लीच्या बादशाही सत्तेंत नवजीवन ओतण्याचे कार्य निजामउल्मुलकानें केलें. पण हां हां म्हणतां निजाम इतका वलाढय झाला कीं शेताची राखण करण्यासाठीं रोंवण्यांत आलेल्या कुंपणानेंच लेत खाऊं लागावे, त्यांतली अवस्था निजाम व दिल्लीची वादह्याही सत्ता यांच्या परस्पर संबंधाची झाली. मोडकळीला आलेल्या वादशहातींत निजाभानें सवेसत्ताधारी होण्याच्या महत्त्वाकांक्षेनें प्रेरित होऊन आपला स्वतंत्र पंथ काढला व दक्षिणेतील सहा बादशाही सुभ्यांचें राज्य त्याच्या ताब्यांत आले- पण निजामाचीही वरीच शक्ति थोरल्या बाजीरावाच्या कारकोर्दीत नर्धिष्णु मराठी सत्तेशीं झगडण्यांत खर्च होऊं लागली व त्याच सुमाराला दिल्लीच्या मध्यवर्ती राजकारणांत हात शिरकवण्याची संत्रि मिळाल्याने निजामार्चे बहुतेक सारें लक्ष तिकडे गुंतलें. त्यामुळें औरंगजेबाच्या अम- दानींत दक्षिणेत जे सुभेदार नेमिले होते त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना प्राचीन हिंदु राज्यांतील पाळेगारांप्रमाणेंच आपापल्या हुकमतीखालीळ प्रदेशांत पाय रुजविण्याला फावलें. सुभेदारांच्या हाताखालील प्रांताधिकाऱ्यांना नबाब अशी संज्ञा होती. असे नबाब अर्काट, शिरें, कडपें, कनूल व सावनूर अशा पांच ठिकाणीं बळी तो कान पिळी? या न्यायाने जबरदस्त सत्ताधारी होऊन वसले. पेकीं अर्काटचा नवाब हा त्रिचनापल्ली व तंजावर ह्या हिंडू
१० पेशवाईचे मन्वंतर
५९४५ ५» १.४४. » १ “९. “४.५५ ५7४.” १४७ “७ €% १४-४७
राज्यांना अगदीं नजीक असून विशेष तडफदार, हिंदुत्वाचा द्वेष करण्यांत विशेष नि्ढवलेला, विशेष महत्त्वाकांक्षी असा असून शिवाय त्याला चंदा- साहेबासारख्या समस्वभावी, अनेकावधानी व चतुर अश्या नातलगाची साथ मिळाली. मग त्यार्ने कर्नाटकांत पाणी जाळण्याला सुरुवात केली यांत नवल तें काय ?
चंदासाहेबांचें त्रिचनापल्ली एथील कुटिल कारस्थान जें पूर्वी निवेदन करण्यांत आलें आहे, त्या कारस्थानाच्या उभारणीपूर्वीच अर्काटच्या नबाबाने 'कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ' शोभणाऱर्या एका नीच वृत्तीच्या देशद्रोही मराठ्याला हाताशीं धरून त्याच्यामाफंत तंजावरचे राज्य घशांत टाकण्याचे एक कृष्णकारस्थान उभारळें होतें व त्याचें जाळे तंजावरच्या राजघराण्यांत अंतस्थ रीत्या अत्यंत खोलपावेतों पसरलें होतें. जशी त्रिचनापल्लीच्या नाशाला राणी मीनाक्षी कारण झाली, तशीच अपरूपा या नांवाची तंजावरची एक अवलक्षणी राणी आपल्या मतें त्या कारस्थानाची सूत्रधार पण वास्तविक यूत्रधारी नबाबाच्या हातांतील कळसूत्री बाहुली बनली होती. अपख्पा ही तंजावरचे राजे सरफोजी महाराज यांची एक राणी. सरफोजींना आणखीही कांहीं राण्या होत्या. पण त्या बिचाऱ्या सरळ वृत्तीच्या होत्या. पण दुधाच्या हंड्यांत मिठाचा खडा पडावा आणि त्या एका खड्यामूळें हांडाभर दुध नासून जावें, त्याप्रमाणे राणी अपखर्पा ही एकटीच त्या राजधराण्यांत भाऊबंदकीचा वणवा पेटविण्याला पुरून उरली. सरफोजी राजांना तुकोजी या नांवाचा एक धाकटा भाऊ होता. त्याला ईशकूपेने संततिसोख्य चांगल्या- थेकीं होते. आणि सरफोजी राजांना मात्र संतति कांहीं नव्हती. संतति नाहीं म्हणून जसें राजांना तसेंच त्यांच्या सर्वे राण्यांनाही वाईट वाटणे साह- जिक होतें. परंतु अपख्पा राणीप्रमाणें इतरांनीं कधीं तुकोजीच्या संतति- सुखाबद्दल मत्सर केला नाहीं. अपरूपा राणी मात्र आपण राजमाता व्हावें ह्या महत्त्वाकांक्षेनें माथेफिरूसारखी वागू लागली. दु्देवाची गोष्ट ही को ही राणी रूपवान व तरुण असल्यानें सरफोजी राजांची तिच्यावर फार मर्जी होती. त्या मर्जीचा उपयोग अपरूपा राणीनें सरफोजी व तुकोजी ह्या बंधूंत वितुष्ट आणण्याच्या कामीं करून घेतला, व तुकोजीला आपल्या कुटुंब- परिवारासह तंजावरपासून दूर महादेवपट्टण एथें जाऊन रहावयाला भाग पाडले»
तंजावरची कहाणी ११ पण तुकोजीला घरभेंदेपणानें दूर लोटणें राणीच्या हातीं होतें तसें राजमाता होशें कोठें होतें ? तरीही त्या बाबतींत देखील अजब कारस्थान रचण्याला तिनें कमी केलें नाहीं. राजवाड्यांतील व बाहेरच्या कांहीं दुष्ट स्त्रियांची संगत तिला होतीच. शिवाय तिचा माहेरकडून जवळचा आप्त कोयाजी घाटगे हाही तिचा पाठीराखा होता. ह्या कोयाजीला हाताशीं धरून अर्का- ट्या नबाबानें तंजावरच्या नाशाचें कृष्णकारस्थान कसे रचिले याचा उलगडा पुढें यथाकालीं होईलच. ह्या कारस्थानाच्या जाळ्यांत अपख्पा राणी गुरफटून गेली असतां कोयाजी घाटग्याच्या संमतीने तिनें स्वतः राज- साता होण्याची शक्कल शोधून काढली. तिनें आपण गरोदर आहों असें कांही दिवस ढोंग करून नऊ महिने जाऊं दिले व नऊ महिन्यांनंतर प्रसूत झाल्याचा बहाणा करून एका कृत्रिम बालकाला ' जन्म! दिला. तंजावरच्या गादीला वारस निर्माण झाला याचा सर्वांना अत्यानंद झाला. राजधानींत व राज्यांत सवंत्र आनंदोत्सव झाले. बारश्याच्या दिवशीं अपूर्वे समारंभ होऊन ह्या तान्ह्या राजपुत्राचें नांव “सवाई शहाजी' राजे? असें ठेवण्यांत आलें. परंतु थोड्या दिवसांनीं राणीचें हें कृत्रिम प्रकाशांत येऊन सरफोजी राजांनी त्या तान्ह्यासह कोयाजी घाटग्याला हद्दपार करून राणीला प्रतिबंधांत ठेवलें-* सरफोजी राजे कालवश झाले तेव्हां तुकोजी राजे गादीवर बसले. हे सरफोजी राजांपेक्षांही विशेष राजकारणपटु, धर्मनिष्ठ व विद्यामिलाषी * सरफोजी राजांच्या अनेक राण्यांपँकी अपरूपाराणी हो एक असून ती घाटगे वंशांतील होती. तिच्या उपरोक्त कारस्थानाचा स्पष्ट . उल्लेख इतिहाससंग्रह' मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या तंजावरचे राजघराणे नामक पुस्तकांत करण्यांत आला आहे. कोयाजी घाटगे हा तिचा ह्या कारस्थानांतील पाठीराखा होता. राजकारणांत-व तेंदेखील स्वतः अस्सल मराठे असून मराठ्यांच्या राजकाणांत-बिघाड करणारे अनेक पुरुष व स्त्रिया- देखील ह्या घाटगे वंद्यांत उत्पन्न झाल्याचें इतिहास सांगतो. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या कारकीर्दीत प्रथमच चंद्रसेन जाधवाबरोबर फितूर होऊन मोंगलांना जाऊन मिळाणारा सर्जेराव घाटगे! पेशवाईच्या अखेरीला मराठशाहीच्या नरडीला फितुरीचें नख लावणारा त्याच वंशांतला दुसरा सर्जेराव घाटगे ! तसाच हा कोयाजी घाटगे! शाहू महाराजांशीं स्पर्धा करून मराठशाहीचीं मुळांतच दोन शकले करण्यांत देखील घाटगे रक्तच प्रभावी ठरलें! !
५ ५१-५४ $/ ४६. १.१४
२२ पेशवाईचे मन्वंतर
५ १-४ ९ ४ ९८ १. ५४,४८१. ८ ७7 » ५,०१0 ४ “५-०, ५7 क र खा
होते. त्यामुळें दूरदूरचे विद्ान् पंडित व फकीर वगैरे त्यांच्या भेटीला येत व पुरस्कार घेऊन आनंदानें माघारे जात. असाच एक अवलिया फकीर एकदां त्यांच्या भेटीला आला. त्यानें राजांच्या सद्गुणांवर प्रसन्न होऊन त्यांना आपला प्रसाद म्हणून नागिणी व पद्मिनी अक्षया दोन तरवारी नजर केल्या. * त्या तरवारींच्या प्रभावाविषयीं त्या फकिरानें राजांना सांगितल, “राजा, ह्या दोन तरवारी म्हणजे कडिसिद्धी आहेत असें समज. यांच्या अंगीं असें अचाट सामर्थ्य आहे कीं ह्यांचे वास्तव्य जेथें असेल, तेथें सामर्थ्य समृद्धि-शान्ति यांचें अखंड साम्राज्य तांदेल. परंतु ह्यांची पाळणूकही तशीच कठीण आहे. ह्या तरवारी धारण करणारा सनृष्य सदाचारी व धर्मात्मा असला पाहिजे; त्यानें सज्जनांचा प्रतिपाळ व दुर्जनांचा संहार करण्याकडेच ' नीतिधर्मारने ह्यांचा उपयोग केला पाहिजे. ह्यांच्या अंगीं आणखी असा एक चमत्कार आहे कीं, सनांत दुर्वुद्धी धारण करून कोणी ह्या तरवारींना स्पर्श केल्यास ह्यांचें तेज व पाणी तत्काळ नष्ट होतें व त्या धारण करणाऱ्या माणसाचा कार्यनाश होतो. त्याप्रमार्णेच ह्या धारण करणारा किंवा संत्रहीं ठेवणारा माणूस दुर्मति असल्यास यांच्या प्रभावाचें त्याचा समूळ नाळ नात्र होईल. पण ह्या धारण करणार्या माणसाने नीतिधर्माचें यथावत पालन केल्यास त्याला यांचा वजकवचाप्रमाणे व कामधेनूप्रमाणें उपयोग होईल. अजी ही साक्षात् राजलक्ष्मी राजा, मी तुला आज अर्पण करीत आहें. हिचा तूं नीति- धमर्नि वागून वंशपरंपरेने उपभोग घे. मात्र त्याबरोबर तूं हेंही. लक्षांत ञेव को, कोणत्याही कारणानें ह्या तरवारींना तूं किवा तुझा राजवंश मुकला, तर राजलक्ष्मी रुष्ट होऊन बाहेर गेली असें निश्चयपूर्वक समज; आणि म्हणूनच यांना तूं तुझ्या
१५७४४५५0०४ प कताट००८.८ १-८...
तंजावरची कहाणी १३ ह्या दोन प्रासादिक तरवारींच्या प्रभावामुळे व त्याला तुकोजीराजांच्या अंगच्या लोकोत्तर नीतिधर्म-प्रियतेची जोड मिळाल्यामुळे तुकोजी राजांची कारकीदे चांगली भरभराटीची गेली. त्या तरवारींवर त्यांची इतकौ जबरदस्त श्रद्धा होती कीं निश्चित पुराव्याच्या अभादीं एखादा न्याय करा- वयाचा झाला तर तो करण्याच्या कामीं त्यांनीं ह्या साधनाचा उपयोग करावा. फिर्यादी व आरोपी अथवा वादी व प्रतिवादी ह्या दोघांना ईशस्मरणपूर्वक ह्या तरवारी उचलण्यास सांगावे व ज्याच्या हातानें त्या काळ्या ठिक्कर पडतील त्याला अपराधी समजन शासन करावे परंतु तुकोजी राजांच्या ठायीं जी दानत होती, तिला त्यांच्या निधनाबरो- वरच मूठमाती मिळून त्यांच्यामागे पुन्हां आपसांतील भाऊबंदकीनें डोकें दर काढलें. त्यांच्यामार्ने त्यांचा वराच मोठा परिवार होता. त्यांपैकी वडील पुत्र बाबासाहेब हा व्यंकोजी हें नांव धारण करून गादीवर बसला तो फार संशयी स्वभावाचा व भोळसर असल्यानें त्याच्या कारकीर्दीत राज्यांत फारच वजबजपुरी माजून स्वार्थपटु व मतळबी लोकांचे दरबारांत फार प्रावल्य झालें. त्या लोकांत सय्यद खान व सय्यद कासीम हे दोघे मुसलमान बंधु प्रमख होते. त्यांनीं जवळजवळ सर्वे राजसत्ता आक्रमण करून राजाला केवळ नामधारी बनवून ठेविलें होतें. व्यंकोजी राजाच्या परचाद् त्यांना मूलबाळ वगेरे कांहीं नसल्यानें सय्यद बंधूंनी तें राज्य पुढेमागे आपल्या घक्षांत टाकण्याचा अंतस्थ डाव तडीला नण्याचा उद्योग आरंभिला. पण राजवटीशी एकनिष्ठेने वागणारे व पराक्रमी असे इतर कांहीं कारभारी दरबारीं होते; त्यांत मानाजीराव जगताप हा वीस वर्षांच्या उमरीचा एक तडफदार मराठा सरदार असून शिवाय मल्हारजी गोडेराव या नांवाचा राजघराण्याचा आप्त- संबंधी प्रोढ सरदार व अण्णाप्पा शेंटगे वगेरे कांहीं मंडळी होती. ह्या मंडळीने सय्यद वंधूंची मसलत बेमाठू्मपर्णे वाजूला सारून व्यंकोजी राजांच्या राग्यां- पेकीं सुजानवाई नांवाच्या तरुण, चतुर व सदाचारी राणीलाच गादीवर बसविलें. सय्यद बंधूंचा हा एक डाव फंसला तरी त्यांनीं नाउमेद न होतां गुप्त- पर्णे नवे नवे डाव खेळण्याला सुरुवात केली. अपरूपाराणीचें ह्या कार- स्थानांत शत्रूला पाठबळ मिळू नये म्हणून मानाजीराव वगेरे कर्त्या मंडळीने नव्या राणीच्या सल्ल्याने जरी तिला सक्त बंदोबस्तांत ठेविलें होते तरी कोयाजी
१४ पेशवाईचे मन्वंतर
४ ५ ४८९ ४८ ४८०५0 ४४८५ ४-९ १५४५-०0, ७५९७.” ७५५१-१८-१0 ५.०0...” २./% > ९००५-०८ -८६.> ४-५ “>. ४८ ८४, ४५-९४. ४-१ 0-0 -*१५/४-४.-€ १५ “-
५-७ ४.० ४५-४० ४१५७०९ ७८००0 ८ फिल ७५४१. कल
" घाटगे मन भानेल तसे उपद्व्याप करण्याला मोकळा होताच. त्यानें एका बाजूनें सुजानबाईचा कारभार अयशस्वी करण्यासाठीं कंवर कसली; सय्यद बंधू दुसर्या बाजूनें कंवर कसून उभे होते. ह्या दोन प्रतिस्पर्धी शक्तींपुढे सुजानबाईचा नाइलाज होऊत तिला राज्याचीं अधिकारसूत्रे खालीं ठेवादीं लागलीं. शेवटीं सय्यद बंधूंचे राजकारणच यदस्वी होऊन त्यांनीं सयाजी - या,नांवाच्या तुकोजी राजांच्या दुसऱ्या एका मुलाला सामील करून घेतलें व त्याला तंजावरचा नामधारी राजा बनवून सवे राज्यसूरत्रे आपल्या हातीं . घेतलीं. कलहाचा नवा वणवा पेटण्याला आणखी काय पाहिजे?
तंजावरची कहाणी १"
. ७ ५) ४७.८७ “/ ५८७ ४७५४ ७८% ७७.७0 “४ “0 ७७ “0, शा &0% /0७ “6७, “१७ /ह »%,” ४७ ७ “0७ ४७ “0 / “७ ७ ७१% “00 “ ४ “ १ 209 “% ७९% 00७ “४ 0१ 0 ह" -.& 7७. १५ 2 १. -ीषे ८00५ 2५ 20.५
प्रकरण ३ २ तंजावरची कहाणी (पुढें चालू )
१-८ १-५ ५८ ५.८
सल्द बंधूंचा हा उपद्व्याप मानाजीराव वगेरे तंजावरच्या राजवटींतील नष्ठावंत मंडळीला मुळींच मान्य नव्ह्ता. आणि राज्यांतील बहुजन समा- जाचा ओढाही त्यांच्याकडेच होता. त्यामुळें त्यांनीं कांहीं बेमाळूम नवी योजना मनाशीं ठरवून लोकरच तुकोजीराजांची अन्नपुर्गाबाई या नांवाची एक सुशील व सदाचारी प्रियतमा होती, तिला व तिच्यामाफत प्रतापसिह् या नांवाच्या तिच्या तरुण पुत्राला आपल्या वाजूला वळवून घेतलें. प्रताप- सिह आपल्या मातापितरांप्रमाणेंच सदाचारी, चतुर व सुविचारी होता, व तुकोजीराजांच्या इतर पुत्रांच्या अंगीं न चमकणारें अनन्यसामान्य राजतेज त्याच्या अंग्री चमकत होतें. तो वयानें जरी तेव्हां पंचविशीच्या आंत होता, तरी त्यानें जनतेची प्रीति चांगलीच संपादन केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली मानाजीराव वगेरे मंडळीनें राज्यप्राप्तीचा जो डाव रचिला, तो सर्वांच्या कल्पनेबाहेर फलट्रप होऊन जनतेनें मानाजीरावाच्या नेतृत्वाखालीं तंजा- वरचा राजमुकुट प्रतापसिहाळाच अपेण केला. सय्यद बंधूंनीं-विशेषत: सय्यद खानानें 'हा दासीपुत्र, याला राजा कसा करावयाचा वगेरे अपवादांच्या झाडीआडून विरोधाच्या गोळया झाडण्याची शिकस्त केली; पण त्याचा . कांहींच उपयोग झाला नाहीं. याप्रमाणें प्रतापसिह तंजावरच्या गादीवर आला; व त्यावरून आतांतरी आपल्या राज्याला बरे दिवस येतील असें मानाजीराव, मल्हारजी गाडेराव वगेरे मंडळीला वाटं लागलें. पण सय्यद खान वगेरे मंडळीचा अंतस्थ रीत्या विरोध सुरूच होता. इतकेंच काय पण सय्यद खान हा तर दुखावलेल्या विषारी नागाप्रमाणें मनांत दावा धरून प्रतापसिह् व त्याचा पक्ष यांचें समळ उच्चाटण करण्यासाठीं गुप्तपणें भगीरथ प्रयत्न करीत होता. हें प्रताप- [सिहाला माहीत होतें व प्रतापसिह आपणाला ओळखतो हें सय्यद खानाला माहीत होतें. मानाजीराव, मल्हारजी, अप्पाण्णा वगेरे मंडळी प्रतापसिहाच्या
पेशवाईचं मन्वतर
76)
- 2२ ८४७० २८० टा “५. २ 2५०५-०० 2४९८१. 2५ 20५ हाण 2० टो: ८० “५.00 “७ ०२०.” आ. ला
पदरीं आहेत, ते आपले आज ना उद्यां उच्चाटण केल्याखेरीज रहाणार नाहोंत हेंही त्याला माहीत होतें. तरीही तो राज्यलोभ सोडावयाला तयार नव्हता. मानाजीराव वगरे मंडळी सामान्य नव्हती, व प्रतापसिहाशीं त्या मंडळीचा पर्ण मिलाफ होता. पण एक तर मधल्या बजबजपुरीचा सय्यद खानाने सर्व सत्ता आपल्या मुठींत आणण्याच्या कामीं भरपुर उपयोग करून घेतला होता, व प्रतापसिहाच्या हीनकलोत्पन्नतेची हाकाटी करून त्या जोरावर जनतेचीं मने कलषित करण्याचा त्याचा उद्योगही अत्यंत गप्तपर्णे आणि तितक्याच
यशस्वितेने सुरू होता. तेथे राजवंशाचा एकतर्फी दुरभिमान बाळगणाऱ्या लोकां- चीही. अगदींच वाण होती अश्यांतली गोष्ट नाहीं. शिवाय अपरूपाराणीचा पक्ष अधिकारारूढ होण्यासाठीं इरेला पडून काय पाहिजे त्या भल्याबर््या गोष्टी करा- वयाला हा लोककंप् एका पायावर उभा होता. अशा लोकांना सय्यद खानाचा मोठा पाठिबा मिळाला; व त्यांनीं राज्यक्रान्तीचा एक व्यहही रचिला. कांहीं वर्षांपूवी सरफोजी राजांच्या कारकौर्दीत त्यांचा अर्थात् अपरूपाराणीचा पुत्र म्हणून पुढें आलेला व कृत्रिम राजपुत्र ठरल्यामुळे कोयाजी घाटग्याबरोबरच हृद्पार झालेला बाळक* तिकडे कोयाजी घाटग्याच्या कृपाछत्राखालीं वाढून . लहानाचा मोठा झाला होता. तो आतां सुमारें वीस वर्षांचा तरणा बांड गडी शोभ लागला होता. त्यालाच सय्यद खानार्ने कोयाजी घाटग्याच्या
% सुजानबाईच्या कारकोर्दीत गादीसाठीं प्रयत्त करणारे अनेक शत्र निर्माण झाल्यामळे तिला राजपदाचा अधिकार फार दिवस उपभोगितां आला नाहीं. तिची कारकोर्द पुरी तीन वष झाली नाहीं तोंच सवाई शहाजी या नांवाचा कोणी इसम कोयाजी घाटगे या नांवाच्या सरदाराच्या साहाय्यानें तंजावरच्या गादीचा हकक सांगण्याकरितां तोतया निर्माण झाला आणि त्याने तंजावर येथील किल्लेदार सय्यद खान यास फितवन तंजावरची गादी वळकावली. तंजावरच्या इतिहासांत काटराजा या नांवानें हा तोतया प्रसिद्ध आहे. त्यानें इंग्रज व फरेंच लोकांस द्रव्य देऊन त्यांचें सेन्य आपल्या मदतीस बोलावले व तंजावरच्या गादीचे आपण अस्सल वारस आहों असा सर्वांच्या मनांत भ्रम उत्पन्न केला. परंतु हा काटराजा रूपी नामक बटकीचा एक मलगा असून याचा तंजावरच्या गादीशीं कांहींही संबंध नाही, अशी तंजावरचा किल्लेदार व मख्य सरदार यांची लवकरच खात्री झाली यामुळें त्यांनीं या ढोंगी काटराजास तात्काळ काट दिला. -<-इतिहाससंग्रह-
तंजावरची पूर्व कहाणी १७ नामधारी पुढारीपणाखालीं स्वतः बाह्यतः अगदीं नामानिराळा राहून, तंजावरच्या गादीचा खरा वारस सरफोजीराजांचा औरस पुत्र म्हणून पुढें आणण्याचा उद्योग आरंभिला होता. अपरूपाराणी तर ह्या कारस्थानांत गुप्तपणे सामील होतीच; कारण तिला त्या निमित्ताने राजमातेचा अपूर्व मान मिळणार होता. पण राजघराण्यांतील बाकीचे बहुतेक जवळचे अगर दूरचे वारस व त्यांचे अलवतेगलबते सुद्धां, सय्यद खानासारख्या सामर्थ्येवान् माणसाने राजा होऊं घातलेल्या ह्या नव्या वारसाचा पक्ष धारण केल्याचें पाहून त्यालाच अखेर यश मिळणार असें धोरण बांधन त्याचे पक्षपाती बतळे होते. हा कट हां हां म्हणतां इतक्या परिपक्व देला पोंचला कीं प्रतापसिह राजे, मानाजीराव वगेरे मंडळीला त्याचा सुगावा लागून देखील त्याचा नायनाट करण्याचा कांहीं उपाय सांपडंना.
त्याच सुमाराला चंदासाहेबानें त्रिचनापल्लीचें राज्य बेमाळूम कपट- कारस्थानाच्या जोरावर कसें घशांत टाकलें, याच्या रसभरित वार्ता सवंत्र रूढ झाल्या होत्या, व तो गवगवा तंजावरपर्यंत आपोआपच येऊन पोंहोंचला होता. इतकेंच काय; पण चंदासाहेबाचीं एकाहून एक कपटप्रचुर कृत्यें पाहून किवा एंकून हा महाकारस्थानी पुरुष हळुहळू आपल्या आंगच्या कृष्ण- कारस्थानपट्तेच्या जोरावर सर्वे कर्नाटक आपल्या कह्यांत आणणार असेंही जाणते लोक बोलं लागले होते. न जाणो, पुढेमागे त्याची वक्रदृष्टि तंजा- वराकडे वळली तर आपली धडगत लागावयाची नाहीं, हा कयास बांधून सय्यद खानाने त्यालाच आपला दोस्त बनविण्याचें व नंतर आपल्या कपट- कारस्थानांत त्याची हक्कानें मदत घेण्याचें धोरण आंखून आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊं केली. याच्या उलट चंदासाहेबानेंही तंजावरच्या राजकारणांत हात शिरकविण्याला व त्रिचनापल्लीचें राज्य निश्चितपणे अलूग घशांत टाकण्याला सय्यद खानाची आपुलकी पुष्कळच उपयोगी पडेल असा दूरवर विचार करून त्या सोयरिकोला तेव्हांच रुकार दिला.
याप्रमाणें एक ठक व दुसरा महाठक अशी' ही गट्टी जमल्यावर तंजावरच्या राज्याची इतिश्री होणार हें जवळजवळ निश्चितच होतें. परंतु ह्या अरि- ष्टांतूत तरी तें राज्य वांचावें अशी विधिघटना असल्यामुळें म्हणा, किवा
आजवर आपले राज्य टिकले तें त्या दोन प्रासादिक तरवारींच्या देवी बलावर र
१८ पेशवाईचें मन्वंतर टिकळें अशा विश्वासार्ने प्रतापसिह्राजांनीं सदाचारपूर्वक त्या अमोघ आय- धांवे आपल्या प्रागापलींकडे रक्षण चालविल्यामुळें म्हणा, सय्यद खानाच्या कटांत फूट पडण्याला एक आकस्मिक कारण घडून आलें. महाभारतकालीं संदोन*मत होऊन देवादिकांनाही त्राठि त्राहि करून सोडणाऱ्या सुंदोपसृंदांचा नाश करण्यासाठीं ईश्वरी प्रेरणेचे एक मोहिनी जशी उत्पन्न झाली व तिच्या अभिलाषार्ने ते मदांध देत्य आपसांत भांडून जसे एकमेकांच्या नाशाला कारण
झाळे, तशीच मोहुना* या नांवाची एक संदर कुमारिका राजधानीच्या लगतच्या श्रीरंगाच्या देवालयांत देवसेवेसताठीं येऊन वास्तव्य करू लागली. तिच्या सौंदर्याची ख्याति हां हां म्हणतां सवेत्तर पसरली, व दोघेही सय्यदबंध् तिच्यावर एकदम आषक झाले. दोघांनींही आपापल्या परीनें त्या मोहनसाठीं प्रियाराधनाची शिकस्त केली. पण ती सच्छोळ कुमारिका त्या दोघांपैकी कोणालाच वश होईना. अखेर सय्यद खानानें देवालयांत शिरून तिला बलात्काराने ष्ट करून आपल्या वाड्यांत नेऊन ठेविलें. ह्या अतिप्रसंगा- मुळें सवे हिंदु जतता तर त्याच्यावर मनस्वी चिडलीच; पण सय्यद कासीमही बिथरून त्याच्या कटांतून फुटला व गुप्तपणे प्रतापसिहराजांच्या पक्षाला जाऊच मिळाला. चंदासाहेब व सय्यदखान यांचीं कसकशीं कारस्थाने चालली आहेत' याची बित्तंबातमी प्रतापसिह्राजांना सय्यद कासीमपासून मिळतांच त्यांनी मोठ्या युक्तीनें सय्यद खानाला जगांतून नाहींसा करण्याच्या कामीं त्या बातमीचा उपयोग करून घेतला. सय्यद कासीमदेखील आज आपल्याला सामील झाला तरी तोसुद्धा आजना उद्यां आपल्या वडील भावाच्या वळणावर खास जाणार हें ओळखून त्याचाही गुप्तपणे अचानक वध करण्यांत आला. अशा प्रकारें सय्यद बंधूंचा नायनाट झाल्यामुळें त्यांचें कारस्थान तेवढ्यापुरतें तरी फिसकटलें. त्या दोघांप्रमाणेंच त्यांच्या अनुयायांनाही गांठून ह्या जगांतून नाहींसे करण्यासाठीं मानाजीराव वगेरे मंडळीनें शिकस्त केली व कांहीं लोक सांपडले त्यांची तशी वासलात लावलीही. परंतु कोयाजी घाटगे व त्यानें निर्माण केळेला राजपुत्र ह्या दोन व्यक्ती कांहीं केल्या त्यांच्या हातीं लागल्या नाहींत. व तद्यांत अपरूपाराणीनें साळसूदपणें रडून, ओरडून ह्या कारस्थानांत आपलें मुळींच अंग नव्हतें असें भासविल्यामुळे, आणि
आब णाा//४७४७४000यनमाधणढणढढढट्टटटक्र्००५0000100010000000ली णा यजमानाने कलन,
तेजावरची पूवेकहाणी 9९ त्यांतल्या त्यांत अब्रला भिऊन प्रतापसिहराजांनीं तिला कोणत्याही' प्रकारें शासन करण्याचें नाकारलें. सय्यद बंधूंचा मात्र समूळ निवेश करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु त्याच्या कुटंबांतील सर्वे मंडळीला चंदासाहेबारने ऐनवेळीं गुप्तपणे त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत आपल्या कृपाछत्राखालीं नेऊन ठेविल्यामुळें ती सर्वे मंडळी बचावली. बिचार्या मोहनेची स्थिति मात्र त्यामुळें आगींतून उठून फुफाट्यांत पडल्याप्रमाणें झाली; चंदासाहेबाच्या जनानखान्यांत त्याची विलासदासी होऊन रहाण्याचे तिच्या नशिबीं आलें!
आपला पक्ष सय्यदबंधुंच्या नाशामुळें दुबळा झाला, म्हणून हातपाय गाळून स्वस्थ बसणारा कोयाजी घाटगे नव्हता. त्यानें पुन्हां अर्काटच्या नबाबाशीं संधान बांधलें. अपर्पाराणीची त्याला आंतून भरपूर फूस होतीच नबाबालाही तंजावरच्या राजकारणांत हात शिरकवण्याला अद्या कोणातरी घरभेद्याचें साह्य पाहिजेच होतें. त्यानें आपल्या जांवयाला-चंदासाहेबाला त्या कामगिरीवर नेमलें. त्रिचनापल्लीच्या राज्याचा घांस दांतदेखील न लावतां घशांत टाकण्यांत चंदासाहेबानें जें अपूर्व कुटिल कत् त्व दाखविलें होतें, त्यामुळें धर्मवेड्या मुसलमानी समाजांत त्याची फारच चहा होऊं लागली होती; व अकटिच्या दरबारांतही त्याचें चांगलेंच वजन वाढलें होतें “हिंदु लोक भोळे; त्यांना आपण आपल्या करांगुलीच्या टोंकावर नाचवूं दकतों; आपण कितीही अत्याचार केले तरी ते ते लोक निमूटपणें सहन करतात; आणि त्यांना धर्मभरष्ट करण्याची कामगिरी इतकी सोपी आहे कीं कोणीं फाटक्या मुसलमानानेंदेखील भराभर हवे तेवढे हिंदु बाटवावे” वगेरे स्वानुभवाचा आत्मविश्वास चंदासाहेबाच्या ठायीं व त्याच्या निमित्ताने नबाबाच्या ठायींही उत्पन्न झाला होता. “हिदू राजे काय, आम्ही पटावरील सोंगट्यांप्रमाणें मनाला मानेल तसे नाचर्व. दिल्लीची मध्यवर्ती राजसत्ता आम्हां मुसलमानांची असतांना ठिकठिकाणीं उगाच चिरीचिरि करणार्या ह्या तळहाताएवढ्या हिंदु संस्थानांचा नायनाट करण्याला आम्हांला कोण आडकाठी करणार आहे ?” अशा प्रकारच्या घमेंडीने नबाबही अगदीं फुगून गेला होता. त्यानें तंजावरचें राज्य पादाक्रान्त करण्याची कामगिरी चंदा- साहेबाला सांगितली व कोयाजी घाटग्याशीं त्याची गांठ घालून दिली. या बाबतींत नबाब, कोयाजी व चंदासाहेब यांचे आपसांत कांहीं संकेत व करार-
२० पेशवाईचे मन्वंतर मदार ठरले होते. परंतु त्यांची त्या तिघांशिवाय चौथ्या कोणालाही दाद नव्हती.
प्रतापसिह व मानाजीराव वगेरे त्याच्या पक्षाची मंडळी यांना इकडे समाधान वाटलें; आपण पाताळयंत्री सय्यदबंधूंचा नायनाट केला आतां आपलें राज्य निर्वेध झालें. कोयाजी वगेरे मंडळी बाकी होती; पण त्याची अवस्था पंख कापलेल्या पक्ष्यांप्रमाणे झाली आहे, ते राजवटींत काय बखेडा करणार! -अद्या भोळ्या आत्मविश्वासाने त्यांच्याकडे दरबारी मंडळीने दुलक्ष करून राज्याची अंतर्व्येव्यस्था लावण्याचे कार्य हातीं घेतलें.
ही व्यवस्था सुरू असतांच एके दिवशीं अपरूपा राणीला माहेरीं जाण्याची इच्छा झाली. तिच्या माहेरीं जाण्यांत प्रतिपक्षाचें कांहीं राजकारण निगडित झालें असेल अशी शंकादेखील कोणाला आली नाहीं; इतकें तिचे राजवाड्यां- तील वर्तन अलीकडे चोख, प्रेमळपणाचें व सलोख्याचे दिसत असल्यानें प्रता्पासह राजांनीं तिला कोणत्याही प्रकारें माहेरीं जाण्याला विरोध केला नाहीं. त्याच्या पक्षाच्या मंडळींत मानाजीराव महा धर्त होता; त्याला कशी न कळे, राणीच्या ह्या माहेरवासाबद्दल शंका उत्पन्न झाली. परंतु कशी झाली तरी ती राणी पडली, तिच्याविषयीं मानाजीरावानें तरी भलताच संशय पुराव्याखेरीज कसा बोलून दाखवावा ? अपख्पा राणीने आपल्या मायावी प्रेमळपणाच्या जोरावर राजांना आपलेसे करून घेतलें होतें, हें मार्गे सांगण्यांत आलेंच आहे. ती त्या उभयतांची आपुलकी अलीकडे तर इतकी वाढली होती कीं राणी राजांना आपलाच पुत्र मानूं लागली होती, व राजांनाही तिला 'आईसाहेब” असें संबोधण्यांत संतोष वाटत असे. इतकेंच काय पण राणीने राजांच्या नांवाला जन्माचा चिकटलेला अकुलीनतेचा डाग कायमचा धुवून टाकण्यासाठीं त्यांना दत्तक घेण्याचेही ठरविलें होतें, व राजांना त्याप्रमाणेंच मानाजीरावांखेरीज इतर कारभाऱ्यांना तो विचार संमतहि होता. मानाजीराव मात्र प्रथमपासूनच सर्वांना कानींकपाळीं ओरडून सांगत होता कीं “ राणीचे हें सारें वर्तन मायावी आहे, तिच्यावर विश्वास ठेवणें सुरक्षितपणाचें नाहीं? पण मानाजीराव पडला पोरसवदा. त्याचे बोल इतर प्रौढ अनुभवी कारभार्यांना कसे पटावे ? व राजांनीं तरी त्या अनुभवी साह्यकार्यांच्या विरुद्ध कसें वागावें ?
तंजावरची पूवेकहाणी २१ असे कांहीं दिवस गेल्यावर एके दिवशीं अपरूपाराणीनें कांहीं दिवसांसाठी माहेरीं जाण्याची इच्छा दर्शविली. तिला नको म्हणण्याचें कोणालाच कांहींच कारण नव्हतें. असें असतां मानाजीरावाला मात्र कां त कळे, संशय आला कीं: हिच्या माहेरीं जाण्याच्या मुळाशीं कांहींतरी कारस्थान शिजत असलें पाहिजे. पण ती राणी, राजांच्या मर्जीतली व सर्वांच्या आदराला पात्र झालेली, तिच्याविषयीं माताजीरावातें मुहेसूद पुराव्याशिवाय अविद्वास बोलून तरी कसा दाखवावा! पण कांहीं झालें तरी मानाजीरावाची संशयनिवृत्ति कांहीं केल्या होईना. त्यातें एकदां राणीच्या कारस्थानाचा अचूक छडा लावून ह्या वाढत्या थोतांडाचा सोक्षमोक्ष करण्याच्या निर्धाराने चौकशीसाठीं बाहेर जावयाचें ठरविलें व राजांना आपला बेत कळविला. स्वतःला मातेप्रमाणें पुज्य असणाऱ्या राणीविषयीं मानाजीरावानें अजूनही असा संशय घेणें राजांना सचलें नाहीं हे तर खरेच. पण तो सहजासहजी उपेक्षा करण्याइतका सामान्य माणूस नसल्यानें परस्पर स्वानुभवाने त्याचा संशय फिटलेला बरा असा विचार करून त्यांनीं त्याला तसें करण्याला मोकळीक दिली.
२२ पेशवाईचे मन्वंतर
“ह कद रायकर “असक मोक कणतेकारकीी किक किचन अलक िधट ७.७ ७ क कळक कलक“ 2४४००५००८९ ४४0 0५0700/027 0.८१. ४१४०५ १५१७४ १ १
प्रकरण ४ थं प्रसादचिन्हांची चोरी
-_7ाऱपयप्>र्ा---
साशाजीरावाप्रमाणेच अपरूपा राणीविषयीं संशयी वृत्तीने वागणारी आणखी एक व्यक्ति राजवाड्यांत होती. ती प्रतापसिह राजांची धाकटी पत्नी
करुणाराणी होय. करुणा वयाने तेव्हां अठरा वर्षांची असून रूपानें इतकी सुंदर होती कों तिच्या सोंदर्याचिं वर्णन करतांना वर्णनकाराला आपल्या कल्पकतेची लेणीं त्या सौंदर्यावर चढविण्याची कांहींच आवश्यकता नव्ह्ती. आणि ती राणी झाली तीही केवळ आपल्या सौंदर्याच्या जोरावरच झाली. नाहीपेक्षां ती एखाद्या सामान्य अकुलीन मराठा सरदाराच्याच गळ्यांत पडावयाची- याचें कारण ती तेव्हां अज्ञात मातापितरांची मुलगी होती. अर्काट्जवळच्या एका लहानशा जहागिरदारानें आपल्या आतेबहिणीच्या दोन जुळ्या मुली मातृ- पितृनिधनामुळे अनाथ होऊन उघड्यावर पडलेल्या आणून पाळल्या, त्यांतली एक मुलगी हो करुणा होय. जशी करुणा तशीच तिची बहीणही रूपवान होती असें लोक सांगत. तिचा कोणालाही पत्ता नव्हता. लोक बोलत त्यावरून कांहीं कांहीं लोकांना माहीत कीं त्या दोन मुलींचा बाप अर्काटच्या नबाबाच्या पदरीं शिळेदार होता. त्याची बायको अर्थात् करुणेची आई वासंती या नांवाची होती तीही करुणेसारखीच संदर होती. तेव्हांचा कर्नाटकचा नबाब सादतुल्लाखान अत्यंत स्त्रेण होता व वासंतीचा पति दौलतराव हा त्याच्या पदरीं शिलेदार होता. दोलतराव एकदां दूर लढाईत गुंतला असतां इकडे नबाबानें त्याच्या घरावर छापा घालून बलात्कारानें वासंतीला नेऊन आपल्या जनानखान्यांत ठेवलें. यानंतर त्या दोन मुली त्या जहागिरदाराच्या पदरीं कश्या आल्या याविषयीं कोणाला कांहीं माहिती नव्हती. त्या जहागिर- दाराचें नांव बुवासाहेब असें होतें. तोही कोणाला फारसा माहीत नव्हता. कांहीं वर्षापूर्वी राजद्रोहाच्या आरोपावरून नबाबानें त्याला पकडून हत्तीच्या पायांखालीं देऊन ठार मारलें व या मुलींच्या कल्याणाचा भार झुझ्ारराव ह्या विश्वासू सेवकावर येऊन पडला. त्यांपैकी करुणा एकटीच झुंझ्वाररावाच्या
प्रकादचिन्हांची चोरी २३ हातीं सांपडली. तिच्या बहिणीचें त्या संकटांत काय झालें तें परमेश्वराला माहीत ! असा तिचा वृत्तान्त मानाजीराव सांगे व तोही आपल्या वडिलांच्या एका गरीब लंगोटीयार मित्राच्या तोंडून ऐकलेला म्हणून ! मानाजीरावाला त्या गोष्टीचें एवढें महत्त्व वाटण्याचें कारण प्रता्पसह राजांशी करुणेचें लग्न होण्यापूर्वी तिचे मानाजीरावाशीं लग्न व्हावें अक्षी वाटाघाट चालली होती. झु्षारराव व मानाजीरावांचे वडील हे अत्यंत जिव्हाळ्याचे दोस्त असल्या- नेच त्या दोस्तीस पुढेंही अढळ स्थान मिळावें यास्तव झुश्षाररावानें करुणा मानाजीरावाला देऊं केली होती. परंतु करुणा ही झंझाररावाची केवळ पाळलेली मुलगी. बुवासाहेब सांगे म्हणन तिला त्याच्या बहिणीची मुलगी मानावयाचे इतर्केच. बरें; करुणेची आई यवनांच्या हातीं भ्रष्ट झाल्यामुळें तो कधींही न पुसला जाणारा डाग तिच्या कपाळीं लागलेला ! अश्या स्थितींत मानाजीरावाच्या पित्याने त्या मागणीला रुकार दिला नाहीं यांत कांहीं नवल नाहीं. झंझाररावानें देखील एरव्हीं ह्या सोयरिकीचा प्रश्न काढण्याचे धाडस केलें नसतें. पण मानाजीराव व करुणा यांचें एकमेकांवर मुग्ध प्रेम असल्याचें त्याला नक्की आढळून भाल्यामुळेंच त्यानें एवढें धाडस केलें होतें.
परंतु मानाजीरावाच्या पित्याने त्या संबंधाला नकार दिला, तेवढ्या- वरच तो प्रश्न लौकिक दृष्ट्या संपला. करुणा व मानाजीराव यांना त्याबद्दल अत्यंत खेद वाटला. पण त्याची पर्वा कोणाला? सुदेवानें प्रतापसिह राजे गादीवर आल्यावर करुणेचें भाग्य उदयाला आलें. आपणां उभयतांच्या नशिबी विवाहग्रंथीनें बद्ध होऊन संसारसुख भोगावयारचें नाहीं तर नाहीं, करुणा कोणीकडून तरी सुखी झाली कीं तेंच आपले सुख, असें मानून खुद मानाजी- रावानेंच करुणेला पदरांत घेण्याविषयीं राजांना एकदां विनंति केली, व करुणेचें सौंदर्य पाहून राजांनींही तत्काळ त्या विनंतीला मान्यता दिली. अर्थात् राजे हे दासीपुत्र असल्यामुळेंच संशयित जन्माच्या करुणेला त्यांनीं पदरीं घेतलें हें सांगणें नकोच. या प्रकारें करुणा तंजावरची राणी झाली होती. त्यानंतर मानाजीरावाच्या नाशयावर टपलेल्या कांहीं मंडळीने करुणा व मानाजीराव यांच्या एकमेकांवरील प्रेमाचा विकृत अर्थ करून ती दुर्वार्ता राजांच्या कानांवर जाईल अशी तजवीज केली. परंतु राजांनीं तें मुळींच मनावर घेतलें नाहीं. दुधाच्या पेल्यांत खडीसाखर घालावी त्याप्रमाणें करुणेच्या ह्या सुखमय
२९ पेशवाईचें मन्वंतर
00.00: १-० १ ८४-५५ श्री शण 2१ ६.१ र. पटा २४८0०2१ १... ४१ २
जीवनांत परमेश्वरानें लौकरच एका नव्या परमसुखाची भर घातली. ती अलीकडे गर्भवती होती; त्यामुळें ती राजांची अगदीं जीव कीं प्राण होऊन बसली होती. तिच्या पोटीं राजपुत्र यावा अशी सर्वांचीच इच्छा होती; व तो राजपुत्र आपणापेक्षांही परमभाग्यशाली व्हावा यासाठीं राजांनीं मृदहाम तिला त्या दोन प्रासादिक तरवारींची पुजा करावयाला सांगितलें होतें त्यासाठीं त्या रत्नखचित पेटीच्या किल्ल्याही जामदारखान्याच्या किल्ल्यां- बरोबरच तिच्या स्वाधीन केल्या होत्या.
अपरूपाराणी जशी राजांवर आत्यंतिक प्रेम करी,तश्ीच ती आपल्या मतें करुणेला प्रेमाने वश करण्यासाठीं शिकस्त करीत होती. पण काय असेल तें असो, करुणा कांहीं तिच्या आहारीं गेली नाहीं. मानाजीरावानें तिला सांगून ठेविलें होतें; कौ, “ करुणे, अपरूपाराणी ही राजा दशरथाच्या राणी केकेयीप्रमाणें कुटुंबबात व राज्यघात करणारी आहे. महाराज तिच्या मोह्पाशांत सांपडले आहेत हों कांहीं बऱ्याची चिन्हें नाहींत. राजे माझा हिताचा शब्द एंकायला तयार नाहींत; तिथें माझा नाइलाज झाला आहे. पण तूं तरी त्या मायाविनीच्या मोहजालांत सांपड नकोस. आणि राजांनाही त्या मोहापासून परावृत्त करणें हें त्यांची अर्धांगी या नात्यानें तुझें कर्तव्य आहे. करुणेला भानाजीरावाचा हा उपदेश सोळा आणे पटला होता; व त्याला अनुसरून तिनें राजांना हितबोध करण्याचा प्रयत्नही अनेक वेळ करून पाहिला. परंतु पालथ्या घागरीवर पाणी ओतल्याप्रमाणें त्या बोधाची अवस्था होती. राजे उलट आपणालाच संशयी व कुढ्या मनाची ठरवून अपरूपाराणीची थोरवी आपल्या मनावर बिबविण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगविशेषीं “असले घरभेदेपणाचे विचार यापुढें तरी तूं माझ्यापाशी कधींच बोलून दाखवू नकोस असेंही किंचित रागाचा आविर्भाव आणून सांगतात; त्याप्रमाणेंच मानाजी- रावारचे असेंच मत आहे असें सांगतांच त्याच्यावरही आपल्या रागाची आग पाखडावयाला कमी करीत नाहींत, असें पाहुन तिनें अलीकडे तो नाद सोडून दिला होता. राजांची जरी ती जीव कीं प्राण होती आणि राजे एरव्ही प्रत्येक बाबतींत जरी तिचा एकही शब्द खालीं पडूं देत नसत, तरी ह्या एका बाबतींत ते आपलें कधींच एंकणार नाहींत व आपण त्यांना सावध करण्याचा जास्त प्रयत्न केला तर तो आपल्या संसारसुखाची माती करण्यालाही वेळीं
प्रसादर्चिन्हांची चोरी २५"
रि १५८५ ५५७१ ७७. 6७ करी "४८% आड चे र, 000. 2१७ ०० कर के » ६० २-० २-८ ५८ १-० ७८८ £- ४- ६ -८१- ७-7 ४५४ ७ ४५०४-८८ ५८ ५: “४ ४ र “८ वि
कारण होईल अशी खात्री झाल्यामुळें ती स्वतःशी फार भिऊन वागूं लागली होती परंतु विधिघटना थोडीच कोणाला कधीं टाळतां आली आहे, मानाजीराव बाहेरगांवी गेला, त्याच्या दुसर्या दिवशीं झुंझ्ाररावाकडून एक जासूद निकडीचें पत्र घेऊन राजांकडे आला. त्या पत्रांत पुढीलप्रमाणे मजकूर होताः मी आसन्नमरण स्थितींत आहें. ह्या आजारांतून मी जगंन असा मला व वंद्य-हकिमांनाही मुळींच भरंवसा वाटत नाहीं. ह्या आयुष्यांत माझी कोणतीही इच्छा उरळेली नाहीं; फक्त साझ्या करुणेची अखेरची दृष्टभेट व्हावी अशी इच्छा आहे. तरी आपण एवढी छुपा करावी अशी विनंति आहे. ” राजे सदय अंत:करणाचे होते. पण दयाळू माणसाला स्वार्थ नसतो असें थोडेच आहे! करुणा त्यांची अत्यंत लाडकी असून ती आतां थोड्याच दिवसांत तंजावरच्या राजपुत्राला जन्म देणार होती. ही पहिलीच वेळ असल्यानें पहिलारू गर्भेवतीप्रमाणें तिलाही नाना परींच्या डोहाळ्यांनीं बरेंच हेराण केलें होतें. अशा स्थितींत राजवाड्यांत सर्वे सुखसोईत देखील तिची प्रकृति नीट राखणें अवघड जात असतां प्रवासांत-आणि म्हातार्याच्या आजारीपणांतील प्रत्यक्ष दुः:खभरांत तिची प्रकृति नीट रहाणें शक्यच नाहीं. तिला तिकडे कशी पाठवावी ?-ह्या प्रश्नाचें नकारार्थी उत्तर राजांना मनोमय मिळालें व त्यांनीं तेथें कोणी माणूस नसतांही स्वतःशीं विचार करतां करतां नकारार्थी मान हलविली. तोंच अपख्पाराणी अकस्मात् तिथे आली. “ झुझारराव फार आजारी आहेत ना? ” तिनें विचारलें. राजांच्या मनांतून तें पत्र तसेंच गुप्त राखावयाचें होते, “आपण आपल्या राजवद्याला तिकडे पाठवूं, झंझाररावांच्या प्रकृतीची अन्य प्रकारें जेवढी काळजी घेतां येणें शक्य आहे तेवढी घेऊं. त्यांना अंमळ आराम पडल्यावर इकडेच आणचवं, म्हणजे अनायासे करुणेची व त्यांची भेटही होईल, आणि करुणा एथल्याएथें राहुनही दोघांचा काळ सुखांत जाईल. बरे; दुदैवाने ह्याच दुखण्यांत त्यांचा शेवट झाला तर ईश्वरी इच्छा! त्यापुढे कुणाचा काय इलाज ! मग करुणेला ही बातमी कळवणेंच भाग आहे.-” असे विचार त्यांच्या मनांत घोळत होते. पण अपरूपाराणीला ती बातमी कळली, आतां ती ग॒प्त रहाणें शक्यच नव्हतें. “ मग करुणेला पाठवायला पाहिजेच नाहीं का ? ”
२६ पेशवाईचे मन्वंतर
११८ ७५४१० १८० कजा १५ भन 2 कट कही कट दट जोक २ ८८ “८ ०» १-८१-८४%-/१-० ५-० ७ ४-० २2९५८८ 2“ ८५-- 5 “४४५८ ७५१४८४४०४० सट पावल ९८९.» ५.६ छी
“ती जाऊन तरी काय करणार? तो त्यांच्या आयुष्याची दोरी जास्त बळकट करणार आहे कौं काय? ”
“ही काय माणसाची बोलण्याची रीत झाली ? सोन्यासारखा दुबळा जीव उघड्यावर पडला होता, त्याला त्यांनीं स्वत:च्या जिवापलीकडे जपून वाढवून लहानाची मोठी केली. त्यांना मरणघटकेला तिची दृष्टभेट घेण्याचा देखील अधिकार नाहीं कीं काय? आतां, तुम्ही राजे आहां व ते एक सामान्य माणूस आहेत हें खरें; पण राजे लोकांनीं झालें तरी माणुसकीला सोडून वागावें असें कोणत्या शास्त्रांत सांगितले आहे ? तें कांहीं नाही. करुणा जाऊन त्यांना भेटून आलीच पाहिजे. ”
आईसाहेबांचा हुकूम झाल्यावर त्याविरुद्ध वर्तन करण्याचें धेर्य राजांच्या अंगीं मुळींच नव्हतें. तरी पण त्यांनीं धाडस करून करुणेच्या डोहाळ्यांचा पुरुषी भाषेंत शक्य तेवढा आडपडदा ठेवून अर्थात् * करुणा आतांशा आजारी आहे ' असा चांचरत चांचरत उल्लेख केला.
राणी त्यावर पूर्ववत् अधिकारयुक्त वाणीने उत्तरली, “ त्या आजारी- पणाची परीक्षा तुम्हां पुरुषांपेक्षां आम्हां बायकांना जास्त असते. आणि झुझाररावांची दृष्टभेट देखीळ झाली नाहीं तर तिच्या मनाला तरी बरें वाटेळ का? तें कांहीं नाहीं. तिला गेलेंच पाहिजे.”
शुझाररावाच्या आजारीपणाची बातमी करुणेला नुकतीच राणीकडून कळली होती व त्या क्षणापासून तिच्या डोळ्यांवाटे गंगायमुना वाहुं लागल्या होत्या. राजे आपल्याला विद्षेषत: ह्या गरोदरपणांत किती जपतात हें तिला स्वानुभवावरून माहीत असल्यानें ते या वेळीं आपल्या पालक पित्याची व आपली भेट होऊं देतील अशी तिला मुळींच आशा नव्हती. परंतु अपर्पा- राणी कनवाळूपणानें आपल्या पदरानें तिचे अश्न पुसून तिच्या वतीनें अधि- कारयुक्त वाणीनें राजांना दोन शब्द सांगावयाला इकडे आली, तेव्हां तिला आह्या वाटू लागली कीं आपणाला आपले पिताजी भेटणार. त्या उत्सुकतेच्या भरांत करुणा तशीच. घाईघाईने राणीच्या पाठोपाठ येऊन अंतर्महालांतील दरवाजाबाहेर उभी होती. तिनें त्या दोघांचे संभाषण ऐंकलें तेव्हां तिळा कधींहि वाटला नव्हता इतका आपलेपणा अपरूपा राणीविषयीं वाटला. आपली बाजू राणीनें उचलून धरल्या कारणानें तिला धीरहि आला होता व
प्रसादचिन्हांची चोरी न राणीविषयीं बराच आदरही वाटूं लागला होता. तद्या विमनस्क स्थितींतदेखील 'सासूबाईची मनोवृत्ति निवळत चालल्याचें हें गमक आहे' अशी खणगांठ आपल्या मनाशीं मारून ठेवावयाला ती चुकली नाहीं. ती आंत गेली ती पदरानें डोळे पुश्ीतच गेली. राणीनें तिला जवळ घेऊन * वेडीसारखी रडतेस काय ? झंझाररावांना लौकर बरें वाटेल, कांहीं काळजी करायर्चे कारण नाहीं. तं आजच्या आज त्यांना भेटायला जा. असें तिचें शांतवन केलें व राजांकडे वळून पुन्हा विचारलें, “ हिला आज पाठवणारना ? ”
*“ जाऊं द्या. पण जरा जपून वागा म्हणजे झालें. ” राजे म्हणाले.
य अ ऱ€
करुणाराणी त्याच दिवशीं प्रहर दिवसाला माहेरीं निघून गेली. जातांना तीं प्रासादिक खड्गें ठेवलेल्या देवघरांतील रत्नखचित पेटीची किल्ली तिनें अपरूपाराणीपाश्ीं दिली. राजे त्यावेळीं जवळ उभे होतेच. राणीनें ती किल्ली तश्शीच राजांच्या स्वाधीन करून म्हटलें, “ नीट जपून ठेवा. ”
करुणा माहेरीं गेली, व राणीनें दुसऱ्या दिवशीं माहेरीं जाण्याचा बेत ठर- विला. जातांना एकदां त्या प्रासादिक तरवारीचें दर्शन घ्यावें अशी इच्छा तिला झाली; म्हणून तिनें राजांना पूजेच्या वेळीं तसें सांगितलें. राजांनीं पूजेच्या वेळीं पुजाऱ्यापाश्ीं किल्ली देऊन पेटी उघडण्याला सांगितलें. पुजार्यानें त्यांच्यादेखत पेटी उघडली. तों काय ? पेटी रिकामी! तिच्यांत त्या तर- वारी नाहींत !
२८ पेशवाईचे मन्वंतर
१४7 ४० १.ल ह) “०.2 का य हक त कक हक. २ *% ७ २ शल १ १ १.५५, ७.
प्रकरण ८ वें कठोर राजाज्ञा
किव. रन्काकाकाया
रू कातर एखादा कडा कोसळून पडावा तसें सर्वांना त्यावेळीं वाटले. राजांची तर कंबरच खचल्यासारखी झाली.ते शून्य दृष्टीनें राणीच्या
तोंडाकडे पाहुं लागले, व राणी त्यांच्याकडे पाहु लागली. पुजारी तर देवा- समोर बळी द्यावयाला नेण्यांत आलेल्या अजापुत्राप्रमाणें भीतीनें थरथर कांपत होता. तरीही त्यांतल्या त्यांत तो स्वत:शीं समाधान भानीत होता, “ माझें नशीब थोर, म्हणून ती पेटी उघडतांना महाराज समक्ष हजर होते. त्यांच्या गेरहूजेरींत ती पेटी उघडली असती आणि असा प्रकार आढळुन भला असता तर साझें मुंडकें कांहीं जाग्यावर राहिलें नसतें. ”
“तुम्ही किल्ली कालपासून बेसावधपणें कुठें ठेवली होती ? ” राणीने विचारलें.
“ती माझ्यापाशींच होती ” राजे उत्तरले.
“मग हा प्रकार असा कसा झाला ! ” राणीने पुन्हां विचारलें.
सांगण्याचे तात्पर्य काय कीं ही जी ठिणगी पडली, तिचा हां हां म्हणतां सार्या राजवाड्याभर वणवा भडकला. सर्व दासदासांची कसून चोकशी सुरू झाली. आपसांत एकमेकांचे वेमनस्य करण्याऱ्या रोगापासून राजवाड्यांतील दासदासीवर्ग अलिप्त होता अशांतला प्रकार नाहीं. उलट ह्या राजवाड्यांत तर त्या प्रकाराचा कळस झाला होता. त्यांतल्या विघ्न- संतोषी लोकांपैकी ज्यांचे साधले त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सूड घेण्या- साठीं ह्या वाहत्या गंगेच्या लोंढ्यांत हात धुवून घेण्याला कमी केलें नाही. कांहीं लोक नोकरीवरून काढून टाकण्यांत आले, कांहीं जे पक्के वहिमी ठरले त्यांच्या वांट्याला तुरुंगवास येऊन चोरीचा तपास लावण्यासाठीं त्यांचा अमानुषपणे नाना प्रकारे छळ सुरू झाला, कांहींच्या धरादारांवरून तर गाढवांचा नांगर फिरला. इतकें सारें झालें, दोन दिवस हा धुडगूस चालला, तरी चोरीचा यत्किचितदेखील तपास लागेना. आणि खरा गुन्हेगार शासन झालेल्या किवा केदेत हाळ भोगीत असलेल्या अभागी लोकांतच होता किंवा अगदी
कठोर राजाक्षा २९
१८ ८ १५-१०” *. "च १ जये. बाळका अभ केळन १४८ ५ “४० ५/7५-०-००-- ८. । “. - 5
नामानिराळा राहिला होता, याचा तरी काय नेम ?
इतक्या अतिचिकित्सेबरोबरच कांहीं शंकेखोरांच्या मनांत असाही विचार आला कीं करुणा राणीच्या ताब्यांत ज्याअथी इतके दिवस किल्ली होती, त्याअर्थी तिनें तर त्या तरवारी बरोबर नेल्या नसतील किवा अन्य उपायाने लांबविल्या तर नसतील ? ह्या शंकेचा विस्तार होतां होतां ती राजांच्या कानांपावेतों जाऊन पोंचली. त्याबरोबर त्यांनाही वाटले, “करुणेचा ग्रह आईसाहेबांविषयीं अनुकूल नाहीं. त्यांच्याविषयी माझें मन कलुषित व्हावें एवढ्यासाठीं करुणेने तर हा एखादा डाव आरंभिला नसेल? करुणेने जातांना ती किल्ली मुद्दाम अपरूपाराणीच्याच स्वाधीन केली, त्याची राजांना आतां नेमकी आठवण झाली. त्यांनीं राणीपा्ी जाऊन ही शंका बोळून दाखविली. राणीर्ने त्याला मान्यता दिली नाहीं. परंतु “ खरें खोटें काय असेल तें देव जाणे. पण त्यावेळीं तिथल्या तिथें ती किल्ली तुमच्या स्वाधीन करण्याची बुद्धि मला सुचली, ती सुवेळीं सुचली म्हूणावयाची ” एवढे मात्र म्हणावयाला कमी केलें नाहीं. ह्या बाबतींत त्या मानलेल्या मायलेंकरांचें असें संभाषण चाललें आहे, तोंच द्वाररक्षकानें राजांच्या नांवचें आणखी एक पत्र आणून दिलें. राजांनीं तें राणीच्यादेखत उघडून वाचले. त्यांत पुढीलप्रमाणें मजकूर होता.
“ महाराज, मानाजीराव हा आपल्या राजवैभवाला त्याप्रमाणेंच संसाराला लागलेला भूंगा असून त्यानें आपल्या संसाराची घडी तर केव्हांच बिधडवळी आहे व राजवेभवाचा डोल्हारादेखील आंतून इतका पोंखरला आहे कीं तो केव्हां आपल्या मस्तकावर कोसळून पडेल याचा नेम नाहीं. करुणा राणीशीं आपला विवाहसंबंध जुळवून आणण्यांत मानाजीरावार्ने पुढाकार घेतला तो कां, करुणा त्याच्यावर इतकें प्रेम कां करते, त्या दोघांचें एकमेकांवरील प्रेम खरोखरच बहीण- भावंडांच्या प्रेमाप्रमाणें शुद्ध आहे कीं काय, वगेरे गोष्टींची वाच्यता मी करीत नाहीं. तें ज्यानें त्याने आपल्या मनाशीं ओळखावें. परंतु आपल्या आजवरच्या भाग्योदयाला कारण असणार्या व आपल्या राज्याच्या भरभराटीला कारण अश्या आपल्या दोन्ही तरवारी करुणाराणीमाफंत आजच मानाजीरावाच्या स्वाधीन झाल्या असून त्या तरवारींच्या
३० पेशवाई'चें मन्वंतर आधारावर मानाजीराव तंजावरचे राज्य कसें बळकावतां येईल हया धालमेलींत गुंतला आहे, यावरून आपण काय धोरण वांधावयाचे तें
> ८१..२५./१* “८१% »
पाहिजे असेळ, तर मी आपणाला सांगतो, राणी आपल्या पित्याच्या आजारीपणामुळें माहेरी आली हें निव्वळ खोटें. आपण थाचा कसून तपास करा; आणि सावधपणानें वागा. ” | ह्या पत्राखाठीं आपला एक हितकर्ता? एवढीच सही होती. हा 'हितकर्ता? कोण ह्या प्रश्नाला अर्थात् फारसें महत्त्व नव्हत. प्रश्न त्या पत्रांतील भज- कुराच्या खरेखोटेपणापुरताच होता. मानाजीराव व करुणा यांची करु- णेच्या लग्नापूर्वीपासून मैत्री होती हें राजांना माहीत होतें, व एकदां त्या दोघांचें लग्न ठरू पहात होतें असेंही त्यांना ओझरतें ऐकू आलें होतें. मानाजी- राव व करुणा यांचे एकमेकांवर प्राणापलीकडे प्रेम आहे याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता व सख्या बहीणभावंडांत देखील इतकें निर्व्याज प्रेम जगांत क्वचितच पहावयाला मिळतें अशी ते आपण होऊन प्रशंसा करीत असत. त्या प्रेमाच्या पवित्र पाटवाला त्या दोघांच्या दुर्वर्तनाचे डाग पडलेले राजांना आतां स्पष्ट दिसू लागले. त्यांची मनस्थिति अगदीं भांबावल्यासारखी झाली. तशा स्थितींत 'आपण ताबडतोब करुणा व मानाजीराव यांना पकडून आणून शासन करावें ' असाही विचार त्यांना पुचला, व त्याची अंमलबजावणी
पत्नाचा वृत्तान्त तिच्या कानावर घातला, त्याबरोबर तिनें तोंडांत बोटें घातली.
“माझी तर ह्या पत्रावरून अशी ठाम कल्पना झाली आहे कीं देवघरां- तील चोरीच्या मुळाशीं करुणा आणि मानाजीराव यांचें अंग मुख्यत्वे असावें.” राणी.यावर कांहीं उत्तर न देतां जणू काय एकंदर घटनेविषयी-विशेषत- त्या पत्राविषयीं आइचर्यसागरांत बुडून गेली होती. तिचें आपणाकडे लक्ष वेधण्यासाठी राजे किचित् मोठ्यानें पुढें म्हणाले, “मीं ह्या दोन्ही गुन्हे- गारांना ताबडतोब शासन करण्याचा निश्चय केला आहे. ” |
“ पण अपराधाची शावबिती होण्यापूर्वीच शासन ? ”
“अपराधाची शाबिती व्हावयाची आणखी काय बाकी आहे! त्या
कठोर राजाज्ञा ३१
४४ ४५८८४४-११-/७%- ४०८१५५.” ४.” ४.7. ४-४. ७.० ४८ ७०० २ ७ 4८२०१४० ७७८ ४ ५.० १-० ५.० ४०७0४७० भाट क्ट - ४. ० ८०७ ४.० ४०० १-० फायल 2 ५-०
क्र क्ल डी
दोघांचें एकमेकांवर किती प्रेम व किती विश्वास आहे, हें तुम्हीदेखील पहातच आहां. मानाजीराव परवां जो बाहेरगांवीं गेला तो तिच्याशीं संगनमत ठरवूनच गेला असला पाहिजे; आणि त्याच्या मागोमाग ही मुलुखभवानी काल गेली. झंज्ञारराव खरोखर आजारी आहेत कीं नाहीं याचीदेखील मला आतां शंका येऊं लागली आहे. आणि जातांना त्या कुलटेनें तुमच्या गळ्याला फांस लावण्याचा कसा बेमाल्म बेत केला होता पाहिलात ना ? तिनें किल्ली मुद्दाम तुमच्या स्वाधीन केली. तुम्हीं ती लगेच माझ्यापाशी दिली व तेव्हांपासून ती माझ्यापाशींच होती म्हणून ठीक; नाहींपेक्षांहा आरोप तुमच्यावर यावा व तुमच्या माझ्यांत वितुष्ट यावें असा तिचा बेत होता."
“ करुणा इतको पाताळयंत्री असेलसें मळा नाहीं वाटत. भाबडी मुलगी, तिला इतके डावपेच कुठचे सुचायला? आतां, भानाजीरावाविषयीं मात्र कांहीं खात्री देववत नाहीं. त्याचें तिच्यावर वजन आहे, ती पुष्कळदां त्याच्या
तंत्राने वागते, हें मात्र खरें. पण त्यानेंच तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला फंसवलें असेल !.. ..
“ हे पत्र सांगते कीं तीं दोघेही आमचा विवाह होण्यापुर्वीपासून पापें पुजीत आहेत. ” राजांनीं तें पत्र राणीच्या पुढ्यांत आदळून आविक्यानें म्हटलें. त्यावेळची त्यांची तप्त मुद्रा पाहन पहाणाराला भीतीनें कांपरें भरलें असतें. पण राणी शांतपणानें म्हणाली, “हें पहा, पदरीं पडलें आणि पवित्र झालें.- माझ्या मतें करुणा तशी नाहीं. पण माणसाच्या पोटांत कोण रिघ शकणार? ती कशी असली तरी आतां राणी झाली आहे, आणि उद्यां राजमाता व्हायची आहे. तिच्याविषयीं असे अनुदारपणाचे उद्गार काढणें आणि तिला शासन करणें म्हणजे आपलीं गृहछिद्रे आपणच दिव्यावातीनें दुसऱ्याला दाखवून देण्यासारखे आहे. तरुणपणाच्या पहिल्या जोरांत अपराध अनेकांच्या हातून घडतात. मात्र ती त्या कारस्थानांत कितपत मानाजीरावाच्या आहारी गेली आहे, त्याप्रमाणेंच त्या तरवारी तिनेंच खरोखर नेल्या कीं काय-”
“ शंकाच नको. तिनेंच नेल्या असल्या पाहिजेत. ”
“ तिनें नल्या असल्या तरी त्या तिनें खरोखरच मानाजीरावाच्या स्वाधीन केल्या किवा कसें याचा अगोदर तपास करायला हवा. उगाच एखाद्या मार्थेफिरूप्रमाणें त्या निनांवी पत्रावर विश्वास ठेवून कसें चालेळ? मला
३२ पेशवाईचे मन्वंतर तर वाटतें कीं कुणींतरी केवळ सूडबुद्धीने तें पत्र लिहिलें आहे. ”
“ते सुडबुद्धीनें लिहिलें असो कीं प्रेमबुद्धीने लिहिलें असो. त्यांत ग्राह्यांश असेळ तेवढा आपण घेतलाच पाहिजे. ”
“ एण॒ त्या माणसाला तरी इतकी लावालावी करायची काय गरज होती? ज्याचा अपराध असेल त्याला ज्यासन झालें पाहिजे आणि होईलही. इतक्या उजेडांत आलेल्या भानगडी मधल्यामध्यें जिरत नाहींत खास. पण असलीं चृगल्खोर माणसें कोणत्याही परिस्थितींत घातकच. आपल्या रामराज्यांत असल्या आगलाव्या लोकांचा सुळसुळाट मळा नको आहे. ह्या चृगलखोरांचा प्रथम तपास करून त्याला शासन झालें पाहिजे. ”
राणी आपल्या भतें राजाचें शांतवन करण्याचा प्रयत्न करीत असली तरी राजांच्या मनावर क्षणोक्षणी त्याचा विपरीत परिणाम घडून येत होता. राणी करुणेच्या अन्यायावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे असा राजांचा पक्का ग्रह झाला होता. ते पुर्ववत् कड्या स्वरांत तिला म्हणाले, “ आईसाहेब, दया, ममता, आपलेपणा हे सद्गुण खरे; पण त्यांचा अस्थानीं उपयोग केल्यानें सद्गुणी मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुम्ही करुणेविषयीं ममताळूपणा दाखवीत आहां तो असाच अस्थानीं आहे. तेव्हां तुम्हांला माझी विनंति आहे कीं ह्या बाबतींत तुम्ही कांहीं बोळूं नका; आणि राज्याची आबादानी' राखण्यासाठी मला कांहीं कांहीं बाबतींत थोडेफार निष्ठुर व्हावें लागलें तरी त्याबद्दह मला दोष देऊं नका. ”
“ आतां तुम्ही क्तेसवरते झालां. तुम्हांला मी यापेक्षां जास्त काय सांगूं? हो! मुलांनीं शब्द मानला तर बरें; नाहींपेक्षां वडीलमाणसांची शोभाच व्हायची! त्यापेक्षां जास्त कांहीं न बोललेले बरें-बाकी, तुमचादेखीलळ जीव कळवळला तो उगाच नाहीं. त्या तरवारी चोरीला गेल्या हा राज्याला केवढा मोठा अपशकून ! काय वाटेल तें करून चोरीचा तपास लावलाच पाहिजे. ” असें म्हणून राणीनें आपल्या भाषणाचा समारोप केला. व माहेरी जाण्या- साठीं राजांचा निरोप घेतला. आणखी' अंमळझ्यानें ती आपल्या थोर पदाला साजेशा लव्याजम्यासह माहेरीं जावयाला निघाली.
त्याच दिवशीं सूर्यास्ताच्या सुमाराला चंदासाहेबाकडून एक निर्वाणीचा
कठोर राजाज्ञा ३३
..०६.० ५.५... ४५-५८ /५-/४-४६-॥ ->६५-४-४४-८% ४५-०४ ह: ४-८ ४-0 ह “7-0: - 0१-"०५१-१-५-/६-/८६४४-”--
४ ५ &४%-०११४-/१//१. '७-/०५८ ४४” १ 1 00५ 0 /7 ४७७ ४-0 ऑरल
खळिता येऊन धडकला. त्या खलित्यांत पुढील आशयाचा मजकूर होता:--
“ तुम्ही तंजावरची गादी अनधिकारानें बळकावली आहे अशाबद्दल तुमच्या प्रतिस्पर्धी मंडळींतील गादीच्या योग्य वारसाकडून आमच्याकडे बरेच दिवस तक्रारी येत आहेत. तुम्ही उघड उघड दासीपुत्र असून गादीवर बसल्यानें गादीचा अक्षम्य अपराध झाला आहे. शिवाय तुम्ही आमचे व्याही व तुमचे कर्तबगार दिवाण सय्यदखान यांचा विश्वास- घातानें खून केला आहे. तुमच्या व कर्नाटकांतील इतर हिंदू राज्यांवर वास्तविक बादशहाची सत्ता असून तुम्हीं बळजबरीने त्या सत्तेचे तुमच्या राज्यापुरतें अपहरण केलें आहे. ह्या तुमच्या अक्षम्य गुन्हेगारीबद्दल बादशाही सत्तेचे प्रतिनिधि व आमचे श्इवशूर नबाब दोस्तअल्ली यांनीं तुमची चौकशी करून न्याय करण्याची कामगिरी आम्हांला सांगितली आहे.
“ यास्तव हया हुकुमान्वयें आम्ही तुम्हांला असे फर्मावितो कीं तुम्हीं आमच्याशीं आम्ही सांग त्याप्रमाणे तह करून गादीवरील आपला हक्क सोडून देण्याला तयार व्हावें व तसें आम्हांला तीन दिवसांचे आंत कळवावें. तुम्हीं शरण येऊन सामोपचाराचें धोरण राखल्यास तुम्हांला मान्यता- पुर्वक सरदारी बहाल करण्यांत येऊन तुमच्याशीं दोस्तीचा तह करण्यांत येईल. त्याप्रमाणेंच तुमच्या गादीवर तुमच्या मागाहून येणाऱ्या वारसा- पासून किवा त्याच्या वतीने हरकोणापासून तुम्हांला उपद्रव होणार नाहीं अशीही तजवीज करण्यांत येईल. याम्रमाणें वर्तेन तुमच्याकडून तीन दिवसांच्या आंत न घडल्यास मात्र लगेच आमच्या सेन्याचा तुमच्या राजधानीसभोंवार वेढा पडेळ व ह्या प्रकरणाचा जो काय आम्हांला योग्य वाटेल तो निकाल आम्ही तरवारीच्या जोरावर तात्काळ करून घेऊं, याची तुम्हांला दखलगिरी असावी ... ”
3 शी डी ्श् राजांचा नेहमींचा परिपाठ असा कीं असे कोणतेंही महत्त्वाचे राजकारण उपस्थित झालें कीं प्रथम आपल्या विश्वासांतील सर्वे कारभारी मंडळींचा विचार घ्यावयाचा व मग काय तो बेत नक्की ठरवून त्याची अंमलबजावणी
करावयाची. इतकेंच काय पण कोणाला एखाद्या अपराधाबद्दह जबाबदार ३
३४ पेशवाईचे मन्वंतर
“१-५.” 00” ४.१४" “४६.४४. “४ 20५ “४.५५.” ५//५/५-/५-/५ “०-१ ६ २.१ “>. ४२.५४ ८००१ “४५४०९४०४५० ७
१7०१५९७ ४९१५५0१ शा. र पी
धरून शासन करावयाचें झालें अथवा कोणाला एखाद्या उपयक्त कामगिरी- बहल कोणत्याही महत्पदाला चढवावयाचें झालें तरी सहकारी मंडळींचा विचार घेतल्यावाचून त्यांनीं कांहींदेखील करूं नये. ह्यामुळें मानाजीराव, मल्हारजी, सखोजी नाईक वगेरे मंडळी प्रत्यक्ष राजदाकतीचे घटक बनून गेली होती. मानाजीरावाविषयीं तर बोलावयाळाच नको. त्यानें स्वतःच्या अंगच्या लोकोत्तर गुणांमुळे सर्व दरबारी मंडळीला-खाज्या कारभार्यांनादेखील मार्गे टाकलें होते. सखोजी नाईक हा दिवाण ना; पण मानाजीरावाचें एवढें प्रस्थ राजांपाशीं माजलेळें पाहून त्यालादेखील जेव्हां तेव्हां अंमळ भिऊन वागणें भाग पडे. सखोजी व मानाजीराव हे अगदीं जीवरच कण्ठरच स्नेही खरे. परंतु सखोजीलाही मानाजीरावाची एवढी चलती. पाहून-आणि कदाचित् दुसर्या कोणीं सांगितल्यामुळेंही असेल-संशयात्मक धास्ती वाटूं लागली होती कीं, मानाजीराव स्वार्थाला वळी पडन मित्रद्रोहाचें पाप जोड- ण्याला तर उद्युक्त होत नसेल ना? अशा संशयानें मनुष्याला एकदां पछाडले, कीं त्या मनुष्याच्या हातून मित्रद्रोहाचें पापदेखील त्याला स्वतःला नकळत घडूं शकतें. मात्र एवढें खरें कीं, मनदुबळेपणाची मऊ मऊ भुसभुशीत जागा सांपडल्याशिवाय कोणाच्याही मनांत संशयाचें बीज कधींच रुजत नसतें. सखोजी असा कांहींसा मनदुबळा होता.
आज राजांनीं तें पत्र वाचावयाला व सखोजी तेथें यावयाला एक गांठ पडली. वास्तविक सभोवारच्या सहाय्यक मंडळींत राजांना सल्ला-मसलत देण्याचा पहिला मान मानाजीरावाला मिळावयाचा, व मग मानाजीरावानें इतर मंडळींना पाचारण करून पुढील विचारविनिमय करावयाचा, असा अलीकडील परिपाठ होता. पण एकतर आज मानाजीराव राजघानींत नव्हता व दुसरे, आजच तो तरवारीची चोरी झाल्याविषयींच्या संशयामळें राजांच्या अवकुपेला पात्र झालेला असल्यानें तो जरी वेळीं जवळ असता तरी राजांनीं त्याचा विचार प्रथम घेतलाच असता असें नाहीं.
सखोजी तेथें येतांच राजांनीं त्याला चंदासाहेबाचें तें निर्वाणीचें पत्र दाख- विले. आंत येतांच राजांची गंभीर व चिंताक्रांत चर्या पाहून असा कांहींसा संशय सखोजीला आलाच होता, त्याला त्या पत्राने दुजोरा मिळाला. तो पत्र वाचूं लागला तेव्हां राजे एकसारखे त्याच्या चर्येकडे टक लावून पद्दात
कठोर राजाज्ञा ३" होते. पत्र वाचून होतांच त्यानें त्यांच्याकडे वळून म्हटलें, “ चंदासाहेबाचा असा कांहींतरी दुष्ट बेत चालल्याबद्दलचा सुगावा मला लागला व तें महा- राजांच्या कानांवर घालण्यासाठीं मी आलों होतों. तों ह्या पत्राने खात्रीच करून दिली.”
“ सानाजीचें ह्यांत कांहीं अंग असं शकेळ का?” राजांनीं विचारले. वस्तुतः त्यांची तशी खात्रीच होती. पण इतका आपल्या गळ्ांतला ताईत मानाजीराव, त्याच्यावर एकदम भयंकर आरोप आपण केल्यास लोक काय म्हणतील ह्या भयानें ते कांहीं हातचे राखून बोलत होते.
सखोजीची जरी मानाजीराव अपराधी असल्याबहल यत्किचित् खात्री नव्हती, आणि जरी तो स्वार्थासाठी काय पाहिजे तें भलेंबुरें करण्याला धजण्या- इतका बेरड वृत्तीचा नव्हता, तरी कावीळ झालेल्याच्या डोळ्यांना सर्वच पिंवळे दिसतें त्याप्रमाणें त्याला मानाजीराव दोषी असावा असें वाटले. एखाद्याला कोणत्याही कारणानें जें मनुष्य नावडते झालें असेल, त्याच्याविषयी उण्या गोष्टी बोलण्याकडे आणि करण्याकडे एखाद्याचा कल स्वाभाविकतःच असतो- सखोजीनें त्या वहात्या गंगेंत हात धुवून घेतले. तो म्हणाला, “ महाराजांना तसा कांहींतरी नक्की सुगावा लागला असल्याशिवाय आपल्या आवडत्या मानाजीविषयीं महाराजांच्या तोंडून असे उद्गार कसे निघतील पण त्याच्या हातून अज्ञानाने एखादी चूक घडली असली तरी तिकडे महाराजांनीं काना- डोळा करावा. माणसें तोडतां फार लौकर येतात पण जोडावयाला महा सायास पडतात. तशांत तो अजून हड आहे..” बोलतां बोलतां सखोजीनें राजांच्या दृष्टीला दृष्टि भिडविली. त्यांच्या दृष्टींत निश्चयपूर्ण संतापाचे पाणी खेळत असलेलें पाहून तो जरा दचकून बोलावयाचा थांबला. खाई त्याला खवखवे या न्यायाने त्याच्या मनांत अशीही शंका आली कौ, महा- राजांनीं आपल्या आवडत्या मानाजीविषयीं माझें मत पहाण्यासाठीं हा संदिग्ध प्रश्न ठाकला असावा; व आपण कोणत्याही पुराव्याच्या अभावीं निष्कारण होला हो ठोकून दिल्यामुळें त्यांचा गेरसमज होऊन घुस्सा झाला असावा !
परंतु दुसर्याच क्षणाला सखोजीची संशयिनिवृत्ति झाली. राजांनीं, आवेद्याच्या भरांत त्यांना आज्ञा केली, “ बस्स! तुम्ही आतांच्या आतां मानाजीराव व राणी ह्या दोघांना पकडून आणण्यासाठीं माणसें रवाना करा.”
३६ पेशवाईचें मन्वंतर
क ०५. ८0१४५४४५४५” री री 6 “० ०४४४४ प्या. काना: 01-21: ८८००-००... ९४४१-४४-0१ 0४.0४” ५/ ४”-/ 2१ ८- 7५ 7५... . “५ 7
यावरून सखोजीची खातरजमा झाली कीं महाराज खरोखरच मानाजी- सावावर रागावले आहेत. त्याला पकडन आणण्याची महाराजांची आज्ञा सखोजीला तितकीशी विस्मयजनक वाटली नाहीं. पण राणीलाही पकडून आणण्याविषयीं महाराजांचे फर्मान सुटलेले ऐकून मात्र त्याच्या अंतःकरणाला वकक वसल्यासारखा झाला. कारण त्याच्या स्वत:च्या मतें राणी ही तंजा- वरच्या राज्यांतील मूतिमन्त राजलक्ष्मी होती; तिच्याच पुण्यप्रभावानें राज्यांत आबादीआवाद चालली आहे असा तिच्या ठायीं एकट्या सखोजीचाच नव्हे तर अनेकांचा पुज्य भावाचा विश्वास होता. सखोजीच्या मनांत त्याच- क्षणीं असेंही आलें कीं आपण राजांना हिताचे दोन शब्द सांगून त्यांना राणीच्या छळापासून निवृत्त करावें. परंतु उसर्याच क्षणाला राजांच्या मुखांतून पुर्वीच्याहनही निरिचित अशी आज्ञा उच्चारली गेली,” आणि राणी व मानाजी- राव यांच्याविषयीं ज्या कोणाच्या मनांत मदर वसत आहे असें आढळून येईल अशा सर्व वहिमी मंडळीलाही पकडून आमच्यासमोर घेऊन या. आमच्या- विरुद्ध उभारण्यांत आलेल्या ट्या राजकारस्थानाचा पाळांमुळांसह शेवट आम्हांला वेळींच केला पाहिजे.. जा प्रथम आतांच्या आतां राणी व मानाजी- राव यांना पकडून आणण्याची तजवीज करा, व काय तजवीज केली तें ताबड- तोव इकडे येऊन कळवा. ”
'' महाराज, मी जरा स्पष्ट बोलतो याबद्दल क्षमा असावी. पण आपण शूर्चे पारिपत्य करण्याचा विचार शरथम करावयाचा सोडन हें भलतेंच काय आरंभिले आहे?” सखोजीनें मना'चा हिय्या करून विचारलें.
राजे थावर निग्रहपुर्वक उद्गारले, “ ह्या घरभेद्यांपा्शींच शत्रुकारस्था- नाचे मूळ आहे. त्यांचें निर्मूलन केल्याशिवाय त्या रशत्रुकारस्थानाला आळा “सावयाचा नाहीं. तुम्हांहा राणीविषयींची माझी आज्ञा ऐकून चमत्कारिक वाटलें असेल-” राजे क्षणभर थांबून पुन्हा म्हणाळे, “पण राणीचें नशीब! तिला भिकेचे डोहाळे आठवले ? त्याला कोणाचा काय इलाज? ”
सखोजी दिवाण झाला तरी तो राजांचा नोकर ! राजांच्या आज्ञेपुढे त्याच्या सारासार विचाराला कसली किमत? |
ववेदासाहेब आणि मोहना ३७
“ ४५४ १४१४५१५" (१८ ४-० १.१४ -८ ४५१. ६५ ५८५ ४7 ५-५. ५/*८-- -/*-/%- ४-४ ५ ७४ ५-४-/ ५८१४ ५-५ ५-४१- ४. ५2 १-१४- 7 20 ४८०४८० ५-८ १८ धट १७० ८-० ४०७ 0 १-० ४ १०४०
प्रकरण ५ वें चैदासाहेब आणि मोहना
क भोंवारच्या जगांत एथवरच्या घडासोडी होईतों सुमारें तीन वर्षांचा काळ लोटला. एवढ्या काळांत त्रिचनापल्लीच्या राज्यांत पुष्कळच
उलथापालथ झाली होती. सर्प गाईच्या पायांना वेटोळीं घाळून पाय घट्ट बांधून
मनसोक्त दुग्धपान करतो त्याप्रमाणें चंदासाहेबाचा कारभार चरिचनापल्लींत चालला होता. मीनाक्षीराणी मात्र विचारी त्या बंदिवासांतच खितपत पडळी होती. भात्र तिच्यामुळे तिचा रंगसहाल-जेथें तिर्ने मनोविकारांना बळी पडन चंदासाहेबासारख्या यवन नराधमाच्या संगतींत दुराचाराचीं पापें पुजलीं तो रंगमहाल तिच्या गेरहजेरीमुळें रिकामा पडला होता असें नाहीं!
मग काय? चंदासाहेबाच्या बेंगमेला तो रंगमहाळ लाभला होता ?- नाहीं. चंदासाहेबाच्याच काय पण दिल्लीशवराच्या बेगमेलाही भूषवील इतका मीनाक्षीराणीचा तो रंगमहाल सर्वे प्रकारच्या विलासोपयोगी साहि- त्यानें सुसज्जित व वेभवसंपन्न असा होता. त्याच्या वभवार्चे वर्णन करा- वयाचे तर त्याला थोड्याशा फरकानें पांडवकालीन मयसभेचीच उपमा द्यावी लागेल. मीनाक्षीराणी ही आपल्या पतीची अत्यंत लाडकी राणी, तिच्या होशीप्रमाणे राजानें लक्षावधि रुपये,; लाखों रुपये किमतीचे सुवर्ण, हिरे-माणके वगेरे रत्ने खर्चन 1! तो नुसता एक रंगमहाल सजविला होता. असें असतांही मीनाक्षीराणीला बंदिखान्यांत कोंडल्या- पासून आजवर एकदांही त्याच्या बेंगमेला त्या रंगमहालांत घटकाभर विश्रांति घेण्याची संधि मिळाली नव्ह्ती. परंतु बेंगमेला त्याबद्दल नाराज होण्याचें कांहींच कारण नव्हतें. तिच्यासाठीं चंदासाहेबानें अडीच वर्षांपूर्वी म्हणजे मीनाक्षीराणी केदेंत पडून त्रिचनापल्लीच्या राज्याचीं सर्वे सूत्रे पुर्णपणे त्याच्या हातीं येतांच राजप्रासादादेजारींच सुमारें पाव कोटि रपये खर्चून
व त्रिचनापल्लीच्या खजिन्यांतील बहुमोल रत्ने उपयोगांत आणून बेगममहाल
या नांवाचा एक नवा रंगमहाल बांधला होता. तेव्हांपासून त्याच्या मुख्य
बेंगमेचें तेंच वास्तव्यस्थान होतें.
३८ पेशवाईचें मन्वंतर
आणि मौनाक्षीराणीच्या रंगमहालाचा उपयोग काय? तेंही चंदासाहेबारचें विलाससंदिरच होतें; परंतु सहध्भिणी बेंगमांशीं विलासविहार करण्याचें तें स्थान नव्हे! तेथें फक्त नाटकशाळांना प्रवेश होता ! आणि तो देखील संदे नाटकळाळांना नव्हे, तर-दिव शिव! त्या गोष्टीचा उच्चार करतांना जिव्हा अडखळते व लेखणी थरथर कारू लागते.- आपल्या पूर्वायुष्यांत पति- सेवापरायण म्हणून सर्वांना परिचित असलेल्या मीनाक्षीराणीसारख्या मान्य- तेच्या हिंदु महिलांना भरष्टवून आपल्या मुसलमानी धर्माची महति वाढ- दिण्याचा त्या नरपश्ूला मोठा नाद! व त्या आपल्या अजब करामतीचें मतिमंत स्मारक म्हणून त्याने आपल्या तसल्या पापांची परवड रचण्यासाठीं तो रंग- महाल खास राखून ठेविला होता! त्या रंगमहालांत मीनाक्षीच्या मागाहून अनेक हिंदु महिलांच्या अब्रूची होळी पेटविली गेली असून तूर्त तेथें मोहना या नांवाच्या एका सोळासतरा वर्षांच्या रूपवती युवतीचे वास्तव्य होतें
मोहना त्या महालांत नुकतीच प्रविष्ट झाली होती, व प्रथम प्रथम तिनें चंदासाहेबाळा वश होण्यांत आढेवेढे घेतले असले तरी आज ती पूर्णपणें त्याची विळासदासी बनण्याला मान्यता देऊन चुकल्यामुळें त्या दोघांच्या प्रणयी हितगुजाला आज नवा रंग चढला होता.
त्या रंगमहालाच्या सजावटींतील एथें विषयपरत्वे प्रामुख्यानें उल्लेखिण्या- सारखा विशेष म्हणजे तेथील सोनेरी मलाम्याच्या नक्षीदार भितींवर व पलंगासर्भावार जरतारी रेशमी काढण्यांनीं टांगण्यांत आलेलीं भव्य तेल- चित्रे होत. त्या चित्रांत फक्त एकच चित्र पुरुषाचे होतें, व वाकीचीं यौवन- सोंदर्यसंपक्च स्त्रियांची होतीं. पुरुषाचें जें भव्य चित्र तेथें होतें, तें कोणातरी राजपुरुषार्चे व तेंहि हिंदु राजपुरुषाचें असावें, त्याप्रमाणें इतर सर्वे चित्रे हिंदु स्त्रियांची असावीं, असें वर वर पहाणार्या कोणालाही कळन आलें असतें
चेंदासाहेबाच्या आग्रहाने मोहना त्या रात्रीं चार घटका रात्रीला त्या रंगमहालांत प्रविष्ट झाली, ती तेथील चित्रांकडे टकमक पहात उभी राहिलेली पाहून चंदासाहेबानें दोन पावलें पुढें होऊन तिच्या हनवटीला हात लावन लाडक्या भाषेत तिला विचारलें, “ प्यारी, त्या चित्राकडे इतकी टक लांवन काय पहातेस ?”
चंदासाहेबाच्या हाताचा स्पर्शे होतांच मोहनेचें सर्वांग विजेचा धवका
ववंदासाहेब आणि मोहना ३९
२ ७१९ ४४७७६७४१५८ ७० १५,/५./७१७...७०१७ ४७ *१४.४१४७ (७. 600९५७७ “५-५५-/९५.८४-0५०५९५५//५-०५०/५-/४०”०५//” ४०-०४"
बसल्याप्रमाणें थरारलें, ब जाईच्या कोमल पुष्पाला आगीची झळ लागतांच तें कोमेजून जावें त्याप्रमाणें तिर्चे मुखकमल त्याच क्षणीं कोमेजून गेलें. परंतु कामांध चंदासाहेबाच्या तें मुळींच ध्यानीं आलें नाहीं; मग तिच्या अंत- रंगांतील कालवाकालवीची त्याला काय कल्पना असणार ! बाकी, मोहनेच्या मनांत त्या क्षणीं कोणतेही विचार घोळत असोत, बाहेरून दिसावयाला ती त्या अतिप्रसंगाविषयीं तिरस्कार प्रदशित करीत आहे असें सहसा कोणाच्याही ध्यानीं आलें नसतें. चंदासाहेबानें तिच्या हनुवटीला हात लावला, तो उजव्या हातानें हलकेच दुर सारीत तिनें पुन्हां एकवार त्या चित्रमालिकेकडे निरीक्षून पहातां पहातां त्या राजपुरुषाच्या चित्राकडे अंगुलीनिर्देश करून विचारलें, “दु चित्र कोणाचे ? ”
चृंदासाहेब मोहनेच्या स्कंधावर वाढत्या लडिवाळपणानें हात ठेवून उद्- गारला, “मला वाटलेंच होतें त॑ मला असाच कांहीं तरी प्रश्न विचारशीलसें. तिचें लक्ष तेथल्या चित्रमालिकेकडे पूर्णपणें वेधलें गेळें असून तिची तौक्ष्ण दृष्टि मधुपानाला आतुर होऊन ह्या पुष्पावरून त्या पुष्पावर झडप घाल- णाऱ्या भमराप्रमाणें तेथील मानिनींच्या चित्रांकडे क्रमाक्रमाने वेधलळी जात आहे हें तेव्हांच त्याच्या ध्यानी आलें. तो पुढें म्हणाला, “त्याबरोबरच हीं इतकीं सुंदर स्त्रियांची चित्रे इथें टांगण्याचें कारण काय असाही प्रश्न तुझ्या मनांत उत्पन्न झाला असेल नाहीं? ”
“ आपण एखाद्याच्या मनांतली गोष्ट अचूक ओळखण्यांत मनकवड्या- सारखे वाकबगार आहां, हें मला माहीत नव्हतें ! ” मोहना किंचित् अधोमुख होऊन आपली दृष्टि एखाद्या सर्व दिश्यांना चकाकणाऱर्या पाचूप्रमाणें नेत्रांच्या एका कोंपऱयांतून ओझरती चंदासाहेबाकडे वळवून पहात म्हणाली.
“ त्यांत एवढे अचंबा करण्याजोगे काय आहे ? स्त्रीस्वभाव हा इथून तिथून सारखाच आहे. चंदासाहेब मुसलमान असून आपल्या धर्माचा कट्टा अभिमानी आहे, व इतर धर्माचें ज्या ज्या उपायांनीं खंडन करतां येईल त्या त्या उपायांनी तें करण्यांत तो सदा तत्पर असतो, ही गोष्ट सूर्ये-चंद्राइतकी स्पष्ट आहे. त्याच्या रंगमहालांत हीं अशीं हिंदुधर्मीय व्यक्तींचीं चित्रे पाहन कोणालाही आश्चर्ये वाटणारच. हा रंगमहाल तुला नवीन आहे; व तुझ्याप्रमाणेंच ह्या चंदासाहेबाच्या प्रेमाला पात्र ठरलेल्या प्रत्येक स्त्रीला ह्या रंगमहालांतील
2० पेशवाईचें मन्वंतर
"**४-१-/४५/€४-५-४४५/१४५४४० २"-९* €४-४"-१-/"-५४१-€”" €५५-१--८४८/५-१५-४४४/-४५१/१- ०१५ -“५/१५ .»९१०//१.९४५ -/7१५./0५.०९५ ७. ०१५ ०९५७७ .“7% ०००५ ,//० »_/0५ १ (५७०१५, ७९७४०४ ४ कक टल
आ.
प्रथमप्रवेश्शाच्या वेळीं तुझ्याप्रमाणेच आश्चर्य वाटलेलें मीं पाहिलें आहे. आणि एथला हा एकंदर देखावाही आदचर्य वाटण्याजोगा आहे खरा. ” तो प्रथम त्या राजपुरुषाच्या चित्राकडे बोट दाखवून म्हणाला, “ हें चित्र ह्या देशच्या अखेरच्या राजाचें. ह्याच्याच रूपवती मीनाक्षीराणीला मीं माझ्या प्रेमपाश्यांत गुरफटून टाकून माझी नाटकशाळा बनवून सोडलें, व अखेर तिला केदखान्यांत डांबून एथल्या राजसिहासनावर आरूढ झालों. हा पहा रत्नखचित सुवर्ण- पर्यक व हें विळासोपयोगी बहुमोल साहित्य पहा! हें सारें एथे राजेश्वर्य- त्याचा भोक्ता आतां मी आहें. त्याप्रमाणेंच इथें हया इतक्या सोंदर्यसंपन्न हिंदु य्वती तेलचित्रांच्या रूपानें वास करीत आहेत ह्या सार्या माझ्या विलास- दासी शोभून गेलेल्या आहेत. एखादी मानिनी हिंदु सुंदरी ह्या रंगमहालांत प्रविष्ट होतांना रुष्ट झालेली असली किंवा लाजत असली तर मी तिला एथे आणून हा देखावा दाखवितों व अभिमानपूर्वक तिला विचारतो, (“ह्या पहा तुझ्या देशांतील थोरामोठ्यांच्या लेंकी-सुना-बायका! यांच्या हिंदुत्वाचा व पावित््याचा दिमाख जर इथें चालला नाहीं, तर तुझा तरी रुष्ट होऊन कसा निभाव लागणार ?” त्याप्रमाणेच एखाद्या सुंदरीला नीतिधर्माचिं भय वाटं लागलें व त्या भयामुळें लज्जा उत्पन झाली तर तिला मी ह्या चित्राकडे बोट दाखवून विचारतो,” -तो त्या चित्रमालिकेमधील राजपुरुषाच्या चित्रा- शेजारीं टांगलेल्या भव्य व सूंदर चित्राकडे अंगुलिनिदेश करून म्हणाला, 'ही पहा राणी मीनाक्षी. हो राणी देखील जिथे माझी विलासदासी होण्याला लाजली नाहीं, तिथे माझी विलासदासी होण्याला तृ कशाला लाजतेस?' ह्या सवे स्त्रिया मीं मोहित करून किवा बलात्काराने हरण करून आणल्या असून जव्हां जेव्हां त्यांच्या पुरुषांनी मळा विरोध केला, तेव्हां तेव्हां त्यांची कत्तल करण्यांत मीं मुळींच दिरंगाई केलेली नाहीं. ”
“ यांच्याच पंकतींत आज मी बसत आहें, असाच ना याचा अर्थ ? ” मोह- नेने चर्या गोरीमोरी करून विचारलें.
“ होय. असेंच म्हूणेनास ! ” चंदासाहेब निर्भयपणे उत्तरला.
“ आणि राणीची जी गत झाली तीच इतर स्त्रियांची झाली असेल नाहीं? ”
“ नाहीं. राणीची गोष्ट निराळी आणि त्यांची निराळी. राणीची भला
चैदासाहेब आणि भोहना ४१ अजून माझ्या कार्यासाठी आवश्यकता आहे. त्रिचनापल्लीच्या राज्याचा घांस जरी माझ्या गळ्याखालीं गेला असला, तरी तेवढ्यावरून तो पचनीं पडला अर्से म्हणवत नाहीं. तो पूर्णपणें पचनीं पडेपावेतों मला राणीची गरज आहे. म्हणनच राणीच्या अब्रला लौकिकांत धक्का लागं नये यासाठीं मीं तिला बंदिवासांत कोंडून ठेवलें आहे. पण इतर स्त्रियांपैकी कांहीं दासी बनून साझ्या बेंगमेची सेवा करीत आहेत, कांहीं अब्रसाठीं आत्महत्या करून मरून गेल्या, आणि कांहींचीं मीं बळजबरीने हाताखालच्या मसलमानांशीं कर्गने लावन दिलीं.
मग ह्या पंक््तींत माझे स्थान कोणतें? ”
“तें आतां तुझें तूं ठरवावयाचें आहे. स्त्रीजातीवर-इतकेंच काय पण त्यांतल्या निवडक भमानवती व रूपवती स्त्रियांवर विजय मिळवन त्यांना माझ्या विलासमंदिराचीं भूषणें बनवून सोडण्यांत मी किती भाग्यवान आहें याचा पुरावा हा पहा-ह्या सोंदर्यसंपन्न स्त्रियांच्या चित्रांच्या रूपानें तुझ्यापुढे उभा आहे. ह्या सर्वे स्त्रियांहून जरी तूं जास्त रूपवान नाहींस तरी तं जर माझी मर्जा राखलीस, तर तुला मी माझी मुख्य बेगम करावयाला तयार आहें.” तू माझ्या पदरीं आलीस त्याच दिवशीं माझ्या मर्जीप्रमाणे वागावयाळा तयार झाली असतीस तर आज हा 'जर' तर! चा प्रश्नच उत्पन्न झाला नसता. पण अजूनही वेळ गेलेली नाहीं! अजूनही तं मनांत आणशील तर माझी मर्जी संपादन करूं शकशील. ”
“मीं आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या सेवेंत रुजू होण्याचें मान्य केल्यावर साझा दोष कोणता शिल्लक राहिला? ”
“ माझी सेवा करावयाला तृं राजी आहेस हें एका परीने फार चांगलें झालें. पण तसें करण्यांत तू माझ्यावर कांहीं उपकार करीत आहेस असें मात्र मला मुळींच वाटत नाहीं. समज, तृं अखेरपावेतों माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याला कबूल झाली नसतीस किवा अजनही कबूल झाली नाहींस, तर सत्तेच्या जोरावर स्वतःची इच्छा पूर्ण करून घेण्याला मी समर्थ आहें. ह्या इतक्या खुबसू्रत प्यारी माझ्या विलासदासी झालेल्या तुला आढळून येतात, ह्या सर्वे मला स्वसंतोषानें वश झाल्या असें नाहीं. परंतु ज्यांनीं माझ्या खषीच्या मागणीची पायमल्ली केली, त्यांना मीं सक््तीनें माझ्या पायांशीं नमविले. हें माजे
9२ पेशवाईचें मर्न्वंतर
१८१४१४४ ९ ॥040,0060000.0090040300,000.0000000000:000 या बा कक का णाऱ्या ४४१४०५१४५४ ४४-४५-॥४५१८/ ४५४५-५५-२३ ५-/५-०-०००५०७७५ ०-४. रळ.
अमोघ सामर्थ्ये नाकबूल करण्याची तुझी छाती आहे का ? बोल. ”
नाहीं. नाहीं. साक्षात् कृतान्तकाळालाही चळचळ कांपविणारे आपण मपल्या सामर्थ्याविषयीं मी शंका कशी घेईन ? पण मी स्वखषीनें आपल्या सेवेंत रुजू झाल्यावर आणखी काय करायचें बाकी राहिलें कीं, तें केल्यावर भपण सला पुर्णपण प्रसन्न व्हाल ? ” समोहनेनें भयचकित वत्तीनें कांपत विचारलें बोलतां बोलतां तिचा स्वरहि कांपत होता, इतकें तिला चंदासाहेबाचें भय वाटत होतें
चंदासाहेब तिची ती केविलवाणी स्थिति पाहून तिच्या मनांतील भय
घालविण्यासाठी तिला जवळ ओढून आपल्या हृदयाशीं धरून सौम्य शब्दांत उद्गारला, प्यारी, अशी भिऊं नकोस. मी काय बोलतों तें नीट ऐकन घे
आपण मला अर्से तरवारीच्या धारेवर धरल्यावर मळा भय वाटणार नाहो तर काय होईल? जाईच्या कोमल फुलाचा सुवास घ्यावयाचा तर तें हलक्या हातानें तोडावें लागतें.” मोहना अश्रू पुशीत गद्गद कंठाने उदगारली
त मला कळते. म्हणूनच मी हें जाईचे फल असे नाजक हातानें खडन अलग हृदयाशीं धरीत आहें. ” चंदासाहेब तिला हृदयाशी उत्कटतेने बिलगन धरीत म्हणाला, “ पण प्यारी, तूं चतुर आहेस; तुळा एवढें कळावेयाला पाहिजे कीं मीं तुला जी मुहाम माझ्या सासुरवाडीहन सासऱ्याच्या जनान- सान्यातून इकडं आणली, ती केवळ विलास-विहारांच्या लालसेनें आणलेली नाहीं. मळा माझा हा रंगमहाल शुंगारावयाचा झाला तर ह्या अफाट राज्यांत लावण्यवति युवतींना दुष्काळ नाहीं. मी ह्या राज्याचा धनी आहें, माझ्या प्रजाजनांतील तुझ्याहून केकपटीनें सुंदर अश्या कोणाही स्त्रीला ह्या रंगमहालांत ओढून आणण्याचे मीं मनांत आणलें तर मला विरोध करणारा कोण आहे?”
मग मला इकडं आणण्यांत आपला हेतु तरी काय? ”
अशी नीट ताळ्यावर येऊन विचार. तंजावरच्या राजवाड्यांत माझ्या व्याह्याचा अर्थात् तुझ्या प्रियकराचा खून झाला, खरेंना? ”
“खरें. ”
त्या खुनाची भरपाई करून घेण्यासाठीं मला तंजावरचें राज्य धळीला मिळवावयारचें आहे; तें जिकन मला तेथल्या सिहासनावर आरूढ व्हावयाचें आहे. तू वरेच. दिवस. माझ्या व्याह्याच्या पदरीं असल्यानें तंजावरच्या सर्व
चैदासाहेब आणि मोहना ४३
१.“ “१.४ ४५५४-१५ ४४९५-५५. ८५५५१५४" ४१५०४१४४१५ 0४५८८१
वी नष शबल
४४-१0" €-0५५-४०४४शाधश “४2 -श*-ट४शा४-2४०” ४४० लनल ४४ ४०१०४४४५४०
अंतर्गत राजकीय घडामोडी तुला माहीत असल्या पाहिजेत. त्या मदान्थ प्रतापसिह राजानें माझ्या सय्यदखानाचा विशवासघातानें खून केला, याची चीड जेवढी मला आहे त्यापेक्षांही तुला जास्त चीड असली पाहिजे. कारण खान भाझा नुसता व्याहीच होता पण तुझा जिव्हाळ्याचा प्रियकर होता. एवढी कामगिरी तूं केढीस तर मी तुज्ञा नुसता प्रियकर व्हावयपालाच काय पण धर्माच्या साक्षीने तुझें पाणिग्रहण करून तुला त्रिचनापल्ली व तंजावर ह्या संयुक्त राज्याची स्वामिनी-माझी सुख्य बेगम करावयाला तयार आहें- ”
विचारी व सावधानचित्त माणसाला चंदासाहेबाच्या उपरोक्त भाषणांतील ढोंगीपणा तेव्हांच कळून चुकला असता. मोहनेला आपल्या प्रियकराच्या हत्येचा सूड घ्यावयाला सांगतांना तिला आपली प्रियतमा होण्याची विनंति त्यानें केळी. ती ऐकून मोहना सय्यदखानाची खरोखरच प्रियतमा असती तर तिला संताप आला असता. परंतु तिच्या चर्येवर तसा कोणताच भाव त्यावेळी तरी उमटलेला चंदासाहेवाळा दिसून आळा नाहीं. मग काय ? मोहनेचें तिच्या प्रियकरावर खरें प्रेम नव्हतें ? किवा चंदासाहेबाच्या संगतींत तिला त्या दु:खाचा विसर पडून चंदासाहेबाचा लळा लागला होता :
मोहनेच्या मनाची त्यावेळीं काय स्थिति होती तें एक ती जाणे व दुसरा परमेश्वर जाणे. त्या गूढावर त्या वेळेपुरता तरी पडदा पडावा असा योगा- योग असल्यामुळेंच चंदासाहेबाच्या तोंडून निघालेल्या प्रश्नवाचक उद्गारांना मोहनेकडून उत्तर ' मिळण्यापूर्वीच एक दासी आंत येऊन चंदासाहेबाला नम्रतापूर्वक अभिवादत करून म्हणाली, “ कोणी एक मुसलमान सरदार सरकारांच्या भेटीसाठीं बाहेर तिष्ठत उभा आहे. ”
त्या दासीने आपला प्रणयभंग केला असें चंदासाहेबाला वाटलें. तो रागारागाने तिच्यावर खेंकसून म्हणाला, “ दिलावर, यावेळीं तूं मरायला इकडे कशाला आलीस? ”
दिलावर भीत भीत हात जोडून उद्गारली, “ सरकार, मीं त्या सरदाराला पुष्कळ समजावून सांगितले कीं यावेळीं सरकारांची भेट व्हायची नाहीं, उद्या सकाळीं ये. खुदादादरने त्याला अशा रात्रींच्या वेळीं आंत प्रवेश दिला म्हणून त्याला देखील मी पुष्कळ रागें भरल्ये. पण तो सरदार आपणाला भेटल्या- शिवाय माघारा जायला तयार होईना, व खुदादादर्ने मला अंमळ बाजूल
४9 पेशवाईचें मन्वंतर
ळे व क ी क री र ८८८ ७.०० १८ ७ ७०७ १.५५ “0१./८%५ “० “0 ४00 0 0५ “हो, "०. “७९ क क “क 2१. “टी २ “0 १८-५४.” ५ ४. ४-४.” ४.” ९.४. २. *- ४-८ ४-८ ४ ५४% ४. ४. १९.० ९.० ४-८ ४४ ४.४४ ८८ १४८ ५.९ ७. ९-० १.० ६० ४८ २ ५. १-७ १. । ७७.७ ७ र्ल
घेऊन माझ्या कानांत सांगितलें, “-बोलतां बोलतां दिलावर मोहनकडे पाहून चपापली.
“त्यानें काय सांगितलें?” चेदासाहेवानें विचारलें.
“सरकारांनीं अंमळ बाजूला यावें म्हणजे सांगते. ” दिळावर भोहनेकडे संशयित मुद्रेने पहात म्हणाली.
" साझी अड्चण वाटत असेल तर मी बाहेर जातें. ” असें म्हणन मोहना अंतर्महालांत जाऊं लागली. |
दिलावरच्या मनांत आलेली शंका अस्थानी नव्हती. रंगमहालांत येणाऱ्या स्त्रिया आपल्या धन्याच्या विश्वासाला पात्र नसतात हुं तिला माहीत होतें.
चंदासाहेबालाही मोहनेविषयीं अजन तितका विश्वास वाटत नव्हता. इतकेंच काय पण ती त्या रंगमहालांत विलासविहारांची वांटेकरीण किवा धनीण झाल्यावर आणि तिले त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला तंजावरकडीळ महत्त्वाच्या गुप्त वातम्या पुरविल्यानंतरदेखील त्यानें तिच्यावर कितपत विश्वास टाकला असता होही एक प्रश्नच होता. परंतु मोहनेकडून त्याचा कार्य- भाग अजून साध्य व्हावयाचा होता; तोंपर्यंत तरी तिळा न दुखवण्याइतकी खबर- दारी घेणें त्याला प्राप्त होतें. गाईच्या सडांतून दूध काढून घ्यावयाचें तर तिला पसच्च करूनच तें काढून घेतलें पाहिजे हें तो ओळखून होता. मोहनेच्या मनांत दिलावरच्या बोलण्यामुळे विकल्प आला आहे असें पाहुन व तिच्याकडून तंजावरकडील बातस्या अजून काढून घ्यावयाच्या आहेत ह्या पुढील साधना- कडे दृष्टि देऊक तो दिलावरला म्हणाला, “ मोहना कोणी परकी नाहीं, ती तुझी उद्यांची धनीण आहे. लोकरच ती माज्ञी मुख्य बेगम व्हावयाची आहे. तिच्यादेखत बोलावयाला तुळा कोणतीच हरकत नाहीं. ”
चंदासाहेबाच्या तोंडचे हे उद्गार मोहनला नवीन असल्यानें ती ते एंकून आनंदित झाली. मग तो आनंद चेंदासाहेब आपल्या खासा मुठींत आला अशा कावेबाज अर्थाचा असो, कीं आपलें भाग्य उदयाला आले-आपण आतां खरोखरच एवढ्या मोठ्या राजपुरुषाची अर्धांगी होऊन एथल्या राजविला- सांची धनीण होणार अज्ञा अर्थाचा असो. पण चंदासाहेबाची ही देखत- भुलीची भाषा दिलावरच्या पुर्ण परिचयाची होती. मोहूना त्या रंगमहालां- तील नवीन उतारू होती, पण अज्ञा केक मोहना तेथें येऊन गेलेल्या दिलावरनें
चवंदासाहेब आणि मोहना ४१५
ळे त क द १८५ करिशी कळला ४-५८९४"४-४-१*- ५८-८४ ५८-०४ ५८५४-५४-५८ ४८८ ५८ ५८०८-०४-०० ५८० ७० ४८००. ८७-५५ ४८-४५ ५-० > ा मिड
पाहिल्या होत्या. अशा प्रत्येकीला वश करून आपला कार्यभाग साधण्याच्या कामीं चंदासाहेबाची बुद्धि किती चलाखीनें चालते याचे अनेक दाखले तिनें आजवर पाहिलेले असल्यानें प्रस्तुतच्या त्याच्या बोलण्याबद्दह तिला मुळींच आश्चर्य वाटलें नाहीं. पण तिला त्याच्या अंत:करणांतील कारस्थानांशीं काय करावयाचें होतें ? आपल्यावर त्याचा घुस्सा होऊं नये एवढ्यापुरती खबरदारी तिनें घेतली, तिचा कार्यभाग झाला. * इतक्या स्त्रिया आजवर फंसल्या त्यांतील ही एक एवढी मनाशीं खूणगांठ मारून ती चंदासाहेबाला म्हणाली, “तंजावरच्या राजकारणाविषयीं आपणाशीं चर्चा करण्यासाठीं तो सरदार आलेला आहे असें खुदादाद मला म्हणाला. ” तंजावरचे राजकारण... .. आणि त्याविषयी माझ्याशीं चर्चा करण्या-
साठा यंणारा तो मुसलमान सरदार कोण बरें असावा? ?” असा स्वतःच्या मनाशी प्रश्न विचारून चंदासाहेब क्षणभर स्तब्ध राहिला. त्यावेळीं त्यानें मोहने- कडे वळून पाहिलें नाहीं म्हणून! तें पाहिलें असतें तर तोच प्रश्न त्याहीपेक्षां जास्त उत्कटतेनें तिच्या मनांत घोळत असल्याचें तिच्या चर्येवरून त्याला हटकून अजमावतां आलें असतें. त्यानें लगेच दिलावरला आज्ञा केली, “त्या सरदाराला आंत पाठवून दे जा. ”
“मी आंत जात्ये. ” दिलावर बाहेर जातांच मोहना म्हणाली-
चेंदासाहेबानें स्मितहास्यपुर्वक तिला म्हटलें, “ ठीक आहे. उद्यांच्या आमच्या बंगमसाहेबा तुम्ही, यास्तव एवढा गोषा राखणे तुमच्या थोर पदवीला भूषणदायकच आहे. ”
मोहना यावर जास्त कांहीं न बोलतां अंतर्महालांत निघन गेली व तो सरदार आंत आला. ती दरवाजावरील पडद्याआडून पहात सावधपणे उभी होती. त्या सरदारानें आंत येतांच चंदासाहेबाला प्रथम लवन मजरा करून विचारलें, “ आपण मला ओळखलें नसेल! ”
चेंदासाहेबानें खरेंच त्या सरदाराला ओळखले नाहीं. तो आश्चर्यचकित मुद्रेने त्याच्याकडे पहात उभा होता. मोहनाही त्या सरदाराला पहातांच बुचकळ्यांत पडली. तिला चेहरा ओळखीचा तर वाटे. पण हा तर मुसलमान आहे. असें कसें ?-हा प्रश्न सोडवितां सोडवितां ती जास्त लक्षपुर्वक भेदक दृष्टीनें त्याच्याकडे पाहु लागली
9६ पेशवाईचें मन्वंतर
“मीं तुम्हांला ओळसलें नाहीं. तुम्ही आमच्या खानसाहेबांच्या परिवारा- कीं कोणी आहां काय? ” चंदासाहेबानें विचारलें.
“ सांगतों. पण अगोदर मला थोडा खुलासा पाहिजे आहे. मोहना ॥तां आपल्या महालांत होती ना? ”
“होय. कां बरें ?”
“ती कुठे आहे? ” |
“ कां? आंत आहे. ती तुमच्या परिचयाची आहे काय ? तिच्याविषयी हीं वाटाघाट करण्यासाठीं तर तुम्ही आलां नाहीं?” असें म्हणून त्यार्ने गें वळून पाहिलें. तों अंतर्महालाचा दरवाजा लावलेला होता. त्यानें उठून | अर्धवट उघडून आंत डोकावून पाहिलें. मोहना तेवढ्यांत बाजूला पली. पग तिची दृष्टि दरवाज्याच्या फटींतून पडद्यापलीकडे त्या सर- राच्या चर्येकडे खिळून बसली होती व तिचे टंवकारलेले कान पुढील संभाषण कण्याची आतुरतेनें वाट पहात होते. कोणीं तिला तेव्हां पाहिलें अस्ते र ती संतापाने लाळ झालेली दिसली असती. कांबरें?
०. ८८०८४५४ १-/४///७/
कोयाजी घाटगे 2
*>>€*४५.- -“*-/५-४४- ४५-५० ४-८ ५-८ ४५८ ६ ०८१८-/५-४१-/--८*०-/ ५-४" ८५-०4 ४ ९ ४7
प्रकरण ६ वें कोयाजी घाटगे
६४0४० ७-० ०८० 0००७८ १६८७१ ४७०० ७७७००0 फल ७ ४-० क. ७.९0 “0४४७ ५४
तो कोयाजी घाटगे होता, एवढें सांगितल्यावर वाचकांना त्याचा निराळा परिचय करून देण्याचें कारणच नाहीं. मोहना तेथें नाहीं असें कळल्या- वर कोयाजी म्हणाला, “ मीं मोहनेविषयीं संशय घेतल्याचें पाहून आपणाला कदाचित् विस्मय वाटला असेल. पण तिचा आम्हांला जेवढा अनुभब आहे तेवढा आपणाला खास नाहीं. विलासदासी ह्या नात्यानें त्या स्त्ी- रत्नानें आपल्या रंगमहालाला अपूर्वे शोभा आणली असेल व आपलें चित तिच्या ठायीं पूर्णपणें रिझत असेल. परंतु आपण एवढें विसरतां कामा नयें कीं ती एक जलाल नागीण आपल्या उद्याशीं आहे. ”
चंदासाहेबाला त्या गोष्टी नवीन नव्हत्या, व तो कोयाजीला वाटला तितका बेसावधही नव्हता. तो त्या वेळीं मनांत म्हणाला, “ प्रत्यक्ष अल्लावर देखील वाजवीपेक्षा जास्त विश्वास न टाकणार्या मला हा दीडशहाणा व्यव- हारज्ञानाच्या गोष्टी शिकवतो आहे! पण म्हणावें बेट्या, तू देखील कामा- पुरता मामा आहेस असेंच मी धरून चालतों हें तरी तुला कुठें माहीत आहे! ” ही अर्थात् त्याच्या मनांतली भाषा झाली. पण त्याचे दाखवावयाचे दांत निराळे होते आणि खावयाचे निराळे होते. “ तुम्हीं मला ही बहुमोल सूचना दिलीत, याबद्दल मी तुमचा फार आभारी आहें. बरें ; आणखी काय खबरबात?
“: आणखी खबरबात आहे. ती इतकी महत्त्वाची व आनंदाची आहे की ती आपणाला निवेदल करण्यापूर्वी आपण मला एक वचन दिलें पाहिजे. ”
*“ काय वचन दिलें पाहिजे? ”
“ पहिली गोष्ट, तंजावर आपल्या हातीं आल्यावर मला त्या राज्याचा मख्य प्रधान केलें पाहिजे
तुमच्या ह्या गोष्टी मला शक्य कोटींतील वाटत नाहींत. तंजावर्सर्चे
राज्य इतक्या सहजगत्या बडवितां येण्याजोगें तकलुपी आहे असे मानण्य£- इतका मी भोळा नाह
४८ पेशवाईचें मन्वंतर
म्हणूनच मी एवढी मागणी आगाऊ करीत आहें. आपणाला ज्या गोष्टी असाध्य वाटतील, त्या साध्य करून दाखविण्याचें बळ त्या श्रीरंगानें हया कोयाजीला दिलें आहे. मीं करावयाची ती सारी सिद्धता केली आहे. आतां निमित्तमात्र कांहीं गोष्टी केल्या पाहिजेत व कांहीं बाबतींत लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकली पाहिजे. तें सवे करण्याला मी समर्थ आहें. हें कार- स्थानाचे मंदिर मीं मोठ्या हिंमतीने उभारले आहे. आतां त्यावर कळस चळढवावयाचा आहे; तो आपल्या हातून चढवावयाचा.”
“ एकूण तुम्हांला वचत पाहिजे म्हणतां? ”
“ हेय. मला तंजावरच्या उद्यांच्या अधिपतीर्चे वचन पाहिजे आहे.
“हृंघ्या वचन. ” चंदासाहेबानें कोयाजीच्या हातावर हात देऊन सांगितलें,
आतां सांगा तुम्हांला काय सांगावयाचें ते. ” बाजीराव पेशवे वारले% ही ह्कोगत आपणाला कळलीच असेल. ”
“ काय, पेशवे वारले ? ” चंदासाहेब हुर्षातिरेकानें उद्गारला, “ फार छान झालें. एकूण खुदाची आमच्यावर मेहेरनजर आहे म्हणावयाची. उभ्या हिंदुस्थानांत आम्हां मुसलमानांना आजकाल खरा विरोध करणारा व दिल्लीच्या बादशाही सत्तेलादेखील पायांखालीं तुडवून पुढें जाणारा गाजी जर कोणी असेल तर तो एकटा बाजीराव पेशवा. तो खलास झाला, त्याच्या बरोबरच उगवती हिंदुपदपादशाही खलास झाली असें म्हणावयाला हरकत नाहीं.
एखाद्या कसलेल्या वीराने आपला भरधांव वारू समोर एखादें अरिष्ट पाहून एकदम आवरावा त्याप्रमाणे चंदासाहेबानें त्याच क्षणीं आपली जीभ आवरली. परंतु चोराचीं पावलें चोराने ओळखावीं त्याप्रमाणें कोयाजीनें त्याचा अर्थ ओळखून म्हटलें, “ सरकार, सरकार, आपणाला संशय उगीच आला. ”
“ नाहीं. मला संशय आला नाहीं.
४8 ३
हें पहा, असली लपवालपवीची भाषा ह्या कोयाजी घाटग्यापाशीं
% थोरले बाजीराव पेशवे ता. २६ एप्रील, सन १७४० रोजीं नर्मदा कांठीं रावेरखेड नांवाच्या गांवी मरण पावले. त्या प्रसंगावरची 'पेशवाईवरील गंडान्तर' ही कादंबरी पहा.
कोयाजी घाटगे ४९ बोलावयाचे कांहींच कारण नाहीं. आपल्या तोंडन पेशव्यांविषयीं व हिंदु- पढदपादशाहीविषयीं कठोर उद्गार निघाले, ते मला रुचणार नाहींत अशी भीति आपल्या मनांत उत्पन्न झाली आहे. खरें ना? ” यावर चंदासाहेब काहींच बोलला नाहीं. कोयाजी पुढे म्हणाला, “ ती आपली भीति अस्थानी आहे. इतर मराठ्यांविषयीं मी कांहीं बोळ दकत नाहीं. पण घाटगे हे प्रथसपासूनच पेशव्यांचे हाडवेरी व बादशाही सत्तेचे दोस्त आहेत, व ते आजपर्यंत मार्थेफिरूप्रमाणें कधींच वागलेळले नाहींत. आपणाला कदाचित् माहीत नसेल तर आठवण करून देतों, बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या शिर" जोरपणाला विदून सेनापति चंद्रसेन जाधवावरोवर थेट मोंगलांना जाऊन मिळणारे दुसरे निधड्या छातीचे वीर सर्जेराव घाटगेच होत. घाटग्यांना मराठेशाहीपेक्षां मुसलमानशाहीच जास्त प्रिय व जास्त जवळची आहे. इतकेच काय, पण पेशव्यांच्या हातून हिंदुस्थानचे रेंसभरदेखीळ कल्याण न होतां उळट वाटोळेंच होईल व त्या अनर्थापासून हिंडुस्थानाला वांचविणारी
बादशाही सत्ताच होय, असा माझा प्रामाणिक ग्रह आहे. तंजावरचे राज्य आम्हां मराठ्यांचे ना, पण तेथेंही मराठेपणाचा अभिमान न धरतां आपली सत्ता तेथें प्रस्थापित करण्य़ासाठीं काया-वाचा-मनें करून झटणार्या माझ्या- इतका एकनिख मित्र आपणाला उभ्या कर्नाटकांतदील भराठ्यांत दुसरा सांपडणार नाहीं. वाजीराव पेशव्यांच्या निधनामुळे त्यांच्याबरोबरच हिदुपदपादशाहीरचे थोतांड आतां आपोआपच कमी होणार यांत मलादेखील सनापासून आनंद आहे. याउप्पर आपला माझ्यावर विदवास बसो अगर -न बसो. ”
" तुमच्यावर माझा पूर्णे विश्वास आहे. तुमच्यासारखे जिगरदोस्त मिळाल्यावर त्यांच्या बळावर मी तंजावरचें राज्य जिकीन; इतकेंच काय पण दिल्लीचे सिहासनदेखील साध्य करूं शकेन.
त्या दूरच्या गोष्टी आहेत. आपणांला तूर्त तंजावरपुरता विचार करा- .वयाचा आहे. पेशवे निधन पावल्यामळें आम्हां सर्वांचेंच काम फार हलकें झालें आहे. या बाबतींत आमच्या थोरल्या राणीसाहेब व मीं मिळून जो बेत ठरविला आहे, त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या कामीं आम्हांला आपली मदत
पाहिजे आहे. येऊन जाऊन आपल्या वाटेतील मुख्य अडचण रघजी भोंसले शध
७० पेशवाईचें मन्वंतर
आणि मुरारराव घोरपडे यांची. पेकीं रघूजी भोंसले पेशव्यांच्या निधनाची वार्ता ऐकून ताबडतोब सातार््याकडे रवाना झाले.”अ
“ काय रघूजी भोंसले इकडील मोहिमेचें काम अर्धवट टाकून निघून गेले ?”
“ होय.
“ते कां म्हणून? ”
“ त्यांना पेशवा होण्याची हांव सुटली आहे. ”
“म्हणजे? ”
“ बाजीराव पेशव्यांच्या पश्चात्ू आपणाला पेशवाईची वस्त्रें मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे, व तीं साध्य होण्याचीं चिन्हेही दिसत आहेत. आज बरींच वर्षे त्यांचा पेशवाईपदावर डोळा आहे. पेशव्यांचा आप्त बाबूजी नाईक बारामतीकर हा घालमेल्या गृहस्थ त्यांचा साथीदार असून शाहूमहा- राजांच्या दरबारांत त्यार्चे चांगलें वजन आहे. शिवाय शाहूमहाराज आणि भोंसले हे साडू असल्यानें महाराजांच्या राणीकडून देखील त्यांचा चांगलाच वशिला लागण्याचा संभव आहे.ह्या उलाढालींत कदाचित् असेंही होण्याचा संभव आहे, बाबूजी नाईक पेशवे होतील व रघूजी भोसल्यांच्या पुत्राला शाहूमहारा- जांच्या मांडीवर दत्तक देऊन छत्रपति बनवितील. कांहीं झालें तरी नाईक आणि भोंसले ही राहु-केतूंची दुक्कळ एकदां पेशवाईच्या राशीला बसली आहे ती पेशवाईचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीं खास. आपला त्याच्याशीं अर्थाअर्थी फारसा संबंध नाहीं. आपणाला तूर्त एवढेंच पहावयार्चे कों कर्नाटकावर आलेलें मराठ्यांचें अरिष्ट देवाच्या दयेनें द्र झालें आहे; व आतां पेशवाईच्या अधिकाराबाबत मराठ्यांत लाथाळी लाग- णार असल्यानें त्यांना इकडील राजकारणांत लक्ष घालावयाळा अवसर
ईॅकणारशिर्शिशिशशिशिशिशिशशससलॅलिलॉशॉशॉ0ॉ-न-ैतैन----.._______
* थोरले बाजीराव पेशवे मृत्यु पावल्यावर त्यांची पेशवाईचीं वस्त्रें बाळाजी बाजीराव यांना न मिळतां बाबूजी नाईक बारामतीकर यांना मिळावी असा रघूजी भोंसले यांचा मानस होता. त्यामुळेंच बाजीरावाची निधनवार्ता ऐकतांच ते ताबडतोब कर्नाटकांतील मोहीम अपुरी सोडून मरा- त्यांच्या सेन्याचा तळ शिवगंगा येथें देऊन साताऱ्यास परत आले.
-॑ण्डतिहाससंग्रह, | पेशवाईवरील गंडांतर' पहा.
कोयाजी घाटगे ण१ मिळणार नाहीं. तोंवर आपणाला आपली ढांसळती सत्ता मजबत करतां येईल. एक तंजावरचे राज्य आपल्या हातीं आलें कीं आपण अर्काटच्या नबाबाचेही नबाब झालां असें समजा. मग आपणांला दिल्लीदरबारांत देखील एवढा मान मिळेल कीं त्या शिरजोर निजामाला देखील आपल्या कुपेची अपेक्षा करावी लागेल. आपणाला माझें आणि अपख्पाराणीसाहेबांचें साह्य अस- ल्यावर आणखी काय पाहिजे ? ” चंदासाहेब स्वतःशीं विचार करीत असलेला पाहून कोयाजी पुढे म्हणाला, “ आपण कदाचित् म्हणाल कौं सवे सत्ता प्रतापसिहाच्या हातीं असतांना व मराठे त्याचेच पक्षपाती असतांना हें कर्से शक्य होईल. खरें ना? ”
“ तुमच्यासारखे धोरणी पाताळयंत्री तुम्हीच, ही अडचण दूर करण्याचा मार्गदेखील तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला दाखवितां यावयाचा नाहीं.”
“तो मार्ग निश्चित करून नंतरच मी आपणापाशीं आलों आहें. प्रताप- सिंहाची आज जी एवढी घडी बसलेली दिसते, ती कशाचा परिणाम हें आप- णाला माहीत आहे? ”
“ नाहीं. पण तुमच्यासारख्या कर्त्या पुरुषांचे त्यांना पाठबळ असून थोरल्या राणीसाहेबांचीही आतांशा त्यांच्यावर कृपादृष्टि आहे असें एकतों. ”
“ आपण ऐकतां तें एका अर्थी खरें आहे. आम्हीं उभयतांनीं आमचा कार्येभाग बिनबोभाट साधावा यासाठीं तसें वातावरण तिर्माण केलें आहे खरें. आपणाला माहीतच आहे कीं आपणाला काशीला जावयाचे असेल तर रामे- इवराकडे जात असल्याचा मारे बोभाटा करावा, कों आपला शत्रू रामेश्वराच्या रस्त्याने आपल्या पाठोपाठ धावं लागतो व आपण सुखरूपपणें काशीला जाऊन पोचतो. |
“ इतकेंच काय; पण शत्रु रामेश्वराच्या वाटेला लागला कों मागाहून त्याच्यावर चाल करून त्याचा बीमोड करणें देखील आपणाला फार सोपे जातें.”
“ आतां कसें आपण ओळखले! तरवारीनें गळा कापण्यापेक्षां केसानें गळा कापण्यांत खरें कौशल्य व कमी धोका असतो. आम्ही आजवर प्रताप- सिहाचा नक्षा उतरला जावा व त्याला गादी सोडणें भाग पाडावें यासाठीं कसा व्यूह रचिला आहे हें आपण ऐकाल तर आइचयर्नि थक्क होऊन जाल. ' क
“सांगा तर खरें!”
*7%- 27%
२ पेशवाईचे मन्वंतर
“ सांगतों. पण त्यापूवी आपणाकडून खुलासा पाहिजे आहे. समजा, याचा राजमार्ग आपणाला आम्हीं दाखवून दिला, तर आपण आमच्या मागण्या पूर्ग करावयाला तयार आहां का? ” |
“ अलूबत् ! हें काय विचारणें! तंजावर माझ्या हातीं येतांच तुम्हांला त्या राज्याचे मुख्य प्रधान करावयाचें एवढीच ना तुमची मागणी? ”
“ती माझी एकट्याची मागणी झाली. परंतु थोरल्या राणीसाहेबांच्या साह्याशिवाय आपलें कांहीं चालावयाचें नाहीं हें आपण जाणतांच. यास्तव त्यांना प्रसन्न राखणें हें आपलें पहिलें काम आहे. ”
* त्यांना प्रसन्न राखण्यासाठी मीं काय केलें पाहिजे ?”
“ राजा होण्यापेक्षा राजांचा राजा होणें आपणाला जास्त आवडेल कौ नाही? ”
अर्थात!”
“ झाले तर. थोरल्या राणीसाहेबांची इच्छा राजमाता म्हणून मिरव- ण्याची आहे. ”
“ पण त्यांना पुत्र नाहीं ! मग त्या राजमाता कद्या होणार ? ”
“ कोण म्हणते त्यांना पृत्र नाहीं म्हणूनः त्यांनीं एकवार ज्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला, तो त्यांचा पुत्रच झाला. दत्तक पुत्र तरी निराळा काय असतो? आपणापाहीं म्हणून हा खरा प्रकार मीं सांगितला. एरव्हीं जगांत आम्ही तो औरस राजपुत्र असेंच सांगत असतों व म्हणूनच त्या राजपुत्राला राज्यावर बसविण्याचा आमचा बेत एकदां जरी फंसला तरी आम्ही त्या कामीं निराश झालों नाहीं. रयतेपेकींही बऱ्याच जणांचा आम्हांला पाठिबा आहे, व त्या पाठिव्याच्या जोरावर आम्ही राज्यक्रांति देखील घडवून आणु गक. पण आपला व आमचा सलोखा पुर्वीपासूनचा आहे. आपण आम्हांला पाठीशीं घातल्यास सर्व गोष्टी बिनबोभाट पार पडणार आहेत. आपण आसच्या राजपुत्राला तंजावरच्या गादीचा खरा वारस मानावयाला व त्याला न्याय मिळवून द्यावयाला तयार व्हा. भी त्या राजपुत्राच्या व थोरल्या राणीसाहेबांच्या वतीने बोलत आहें असें समजा. आपली सावेभोम सत्ता आम्हांला मान्य आहे व आपणाकडे आम्ही दाद मागण्यासाठी आलों आहों. राजपुत्र सयाजीरावाला एकदां राज्याभिषेक झाला असतांना प्रतापसिहाच्या
कोयाजी घाटगे ८५3 कारवाइन त्याला राज्यभष्ट व्हावे लागले; त्यालाच पुन्हा तंजावरच्या गादीवर आणण्याचें आपण कबूल करीत असाल तर सांगा, कीं आम्ही-थोरल्या राणीसाहेब आणि मी आपल्या साह्यार्थ सिद्ध आहों. ”
तुम्हा म्हणतां त्या सवे गोष्टींना माझी पूर्ण अनुमति आहे. ” चंदासाहूब भमान तुकवीत म्हणाला. त्याच वेळीं तो मनांत म्हणत होता, “ अपख्पा राणी काय, बोलून चालून स्त्री. मीनाक्षीसारख्या चतुर स्त्रीला देखील मी पुरून उरलों, तो ह्या राणीला थोडाच जुमानतों ! तसाच हा थेरडा, आणि ह्यानें निर्माण केलेला तो सयाजीराजा ! अपेक्षित वैभवशिखराच्या मार्गानें जातांना मार्गातील कांटे पायांना बोंच् नयेत यास्तव तेवढ्यापुरतीं पायीं घालावयाचीं पादताणें हीं ! आपलें कार्य ज्ञालें कीं तीं फेकून दिलीं! ”
“ नुसती अनुमति देऊन चालावयारचें नाहीं. माझ्याबरोबर चला, आणि मलिदींत उभे राहून मला अगोदर तसें वचन द्या. ” चंदासाहेबाची चर्या ते अपमानकारक शब्द ऐकून कांहींशी कडवट झालेली पाहन कोयाजी पुढें म्हणाला, “ केवळ एवढ्याचसाठीं आपण वाहेर यावें असें मी म्हणत नाहीं. प्रताप- सहाच्या यद्याचे मम कशांत आहे हें मीं अजून आपणाला सांगितलेले नाहीं. त्याच्यापाशीं दोन प्रासादिक तरवारी आहेत व त्या तरवारींच्या प्रभावानेंच तो आजवर निर्भयपणें राजवेभव भोगीत आहे हें मीं आपणाला मागेच सांगि- तले होतें ते आठवते का? ”
“हो! आठवते.
“त्या तरवारी घेऊन थोरल्या राणीसाहेब आपल्या भेटीला आलेल्या आहेत. त्या नगराबाहेरील एका ग॒प्त ठिकाणीं सध्यां थांबल्या आहेत. त्यांची मी आपणाला भेट करून देणार आहे व त्या तरवारी स्वत: राणीसाहेब आपणाला अर्पण करणार आहेत. परंतु आपण प्रथम मशिदींत माझ्याबरोबर येऊन शपथ घेतली पाहिजे. आपलें ठरल्यावर ह्या कारस्थानाला आरंभ कोठून करावयाचा याविषयींही आमचा नक्की बेत ठरळा असून तो वेत्ही आपणाला थोरल्या राणीसाहेब कळवतील. ”
शपथा घरणे आणि शपथा मोडणे हा चंदासाहेबाच्या हातचा मळ होता. तो कोयाजीच्या शब्दाला तेव्हांच कबूल झाला व तसाच त्याच्यावरोवर निघाला.
रु ६2 पेशवाईचे मन्वेतर
८ कक.
दोन प्रहर रात्रीच्या घुमाराळा चंदासाहेब माघारा आला. मोहूना अर्थर्तत् तोंवर जागी होती. ती अंतर्महालांतील एका मऊ मऊ पण पायां- सळ्ठऱर्च्या गालिच्यावर पहुडल्या पहुडल्या विचार करीत होती. चंदासाहेवाला ययटलळे, ती आपलीच मार्गप्रतीक्षा करीत आहे. ती आपल्या विचारांत इतकी गळून गेली होती कीं चेंदासाहेब आंत केव्हां आला याचीदेखील तिला दाद नर्डली. त्यानें आंत येतांच तिला गालिच्यावर पहुडलेली पाहून तिच्या जवबळ'च गुडघ्यांवर बेसून तिचा उजवा हात आपल्या उजव्या हातीं घेऊन अपल्या गळ्यापाशी नेत तिला विचारलें, “ प्यारी, तू इतका वेळ माझी काट पहात जागी राहिलीस ? ”
मोहना उत्तरली, “ आम्ही बायका. वेलीचे वृक्षासाठीं अडते, तसें वक्षाचें
वेळो साठी कुठे अडतें! 7
*“* पण त् अशी खाली झोंपलेली कां? हा रंगमहाल आतां तुझा आहे. हा फर्यक तुझ्यासाठी आहे ! त्याचा उपभोग तं नाहीं घ्यायचा तर दुसर्या कोप्णीे घ्यायचा? ” चेंदासाहेबानें तिचा हात आपल्या गळ्यांत घालून तिच्या पुली गालांना हाताचा स्पर्धे करीत विचारलें.
ली. उत्तरली, “ खाविद, देजापात्रांतळें पुजासाहित्य देवाची पुजा करण्या- साठीं असतें, स्वत:ची देजा बांधून घेण्यासाठीं नसतें. मी आपली दासी आहें. अआपफणांपुर्वी मी एकटीने हेथा शय्येचा उपभोग घेतला तर मीं आपला आणि त्या शाय्येचादेखील अपमान केल्यासारखें होईल. ”
एवर्ळे त्या दोघांचे संभाषण चाललें आहे तोंच खुदादादनें भरजरी मखमली म्यानांनी वेष्टित अशा दोन तरवारी तेथे आणून ठेवल्या.
मोहनेनें थोड्या वेळापूर्वी कोयाजीच्या तोंडून तरवारींविषयीं वृत्तांत ऐंकल्काय होताच. परतु तिनें पुन्हां चंदासाहेबाला विचारलें, “ ह्या तरवारी कसल्या ? ”
“* प्यारी, मला कर्नाटकचा बादशहा आणि तुला बादश्याहीण बनवून सोडणप्णारीं हीं प्रसादचिन्हे आहेत. तू सय्यदखानाच्या पदरीं असतांना अनेक वेळां यांच्च्या प्रभावाविषयी ऐकलें असशील. ”
“* होय . पण त्या आपणाला कला मिळाल्या ? ” चंळासाहेबानें अपरूपाराणी व कोयाजी' यांच्याशी तंजावरच्या राजकारणा-
४४-४४ .। १२८” ४.- 00९. 709५ ५. “0$-८४-/१५> १८०५-१७, ल
कोयाजी घाटगे "ण्
३ ४७/४६/४४४७ ४.७७.” ७ १४.४१. ”0५-४--”- *%>.”/*६. ८९ . १, “९४९. “१..४१./५... “१७ ४४.
बाबत झालेल्या वाटाघाटी मोहनेला निवेदन केल्या. त्यावरून अपख्पा राणी व कोयाजी ह्या दोघांनीं गफलतीनें त्या तरवारी तंजावरच्या राज- वाड्यांतून चोरून आणून चंदासाहेबाच्या स्वाधीन केल्या हें तिला कळून आलें. त्याविषयीं तिला मनांतून कांहीं का वाटेना ! बाह्यात्कारी ती एवढ मात्र म्हणाली खरें, “ एकूण माझा पायगुण इतका शुभकारक आहे !
“ आहे खरा. ही वेळाच एकंदरींत शुभ वेळा आहे, म्हणूनच माझ्या कर्नाटकांतील साम्राज्यस्थापनेंच्या महत्त्वाकांक्षेला मूर्तेस्वरूप देण्याला व त्या अनरोधानें राजकारणाचे डाव खेळण्याला याच मुहर्तापासून मी प्रारंभ करणार आहें. पेशवे मेले, त्याबरोबरच आमच्या सर्वे अडचणी मेल्या असें मानावयाला हरकत नाहीं. कारण त्यामुळें रघूजी भोंसले इकडील मोहिं- भेची आवराआवर करून साताऱ्याकडे निघून गेला, आणि आम्हांला कर्ना- टकचें सारें रान मोकळें सांपडलें. नाहीं म्हणावयाला मुरारराव घोरपडे तेवढा शिरजोर आहे. त्याला एकदां जाळ्यांत अडकवून नेस्तनाबूत करून सोडला कीं काम झालें.
*“ घृण त्याला अडकवणें हेंच तर महाकर्म कठीण आहे. आपणाला वाटतो तितका तो भोळा नाहीं. ”
“ त्याला अडकवण्याची बेमालूम युक्ति अपख्पाराणी व कोयाजी यांच्या विचारानें मीं शोधून काढली आहे. ” चंदासाहेब लगेच बाहेर जाण्यासाठीं उठतां उठतां म्हणाला, “ मीनाक्षी राणीला मीं आजवर जिवंत कां ठेवली यांतलें रहस्य प्यारी, तुला मी आणखी एका घटकेनें सांगतों.
चृंदासाहेब एवढें बोलून बाहेर निघून गेला. मोहना मात्र तेथेंच विचार करीत स्वस्थ बसली. बराच वेळपावेतों ती तक्षा स्थितींत विचार करीत बसली होती. तिला कळेना कीं चंदासाहेब अश्या अपरात्री मीनाक्षी राणीकडे कश्यासाठीं गेला असेल !
६ पेशवाईचे मन्वंतर
न. क कक (७ ० वक ७७ वळ जक 2: ओक ०2 कज न. (७२? (७0% कक, ४७७ ०७%. कटे जह सक ळक क चळे १५ ८ ५५ ४-० ५.० ९ २ १-० ब“ ४८ << २८: 5९
भ्रकरण ७ घें
मीनाक्षी राणांचा बंदिवास
वुपाळी वेंदिवास आल्या दिवसापासून तीं तीन वर्षे मीनाक्षी राणीतें किती हालअपेष्टांत काढलीं असतील, तें तिचे तीच जाणे ! चंदासाहेबा'वे- तिच्या विश्वासघातकी प्रियकराचे पाय त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्याला अधिकृत रीत्या लागले, त्याच दिवशीं सूर्यास्ताच्या सुमाराला त्या दोघांची जी भेट झाली, त्या दिवसापासून पुढे तीन वर्षांत चंदासाहेबानें तिचें मुखावलोकन देखीळ केलें नव्हतें. रयतेनेंही त्या इुराचारी स्त्रीची फारशी चौकी पुढें केली नाहीं. केदेत असतांना ती सर्व पकारच्या राजोपचारांना सर्वस्वी मुकली होठी. इतकेंच काय पण तिला जरूरीपुरत्या अनवस्त्रासाठीं देखील अत्यंत आबाळ सोसावी लागे. अद्या हालअपेष्टांत मला कुजत ठेवण्यापेक्षा एकदां गोळी पाठून ठार तरी करा अशी तिनें अन्नपाणी यावयाला येणार्या नोकरांच्या हातीं चंदासाहेवाला अनेकवार विनवणीही केळी. पण त्या विनवणी'चा देखील कांहीं उपयोग झाला नाहीं. ती चंदासाहेबासारख्या यवनाच्या प्रेम- पाशयांत सांपडून पतित झाली होती, ही एक गोष्ट बाजूला ठेवली, तर तौ. एरव्ही फार देवभोळी होती. किल्ल्यांतील एका अत्युच्च शिलाखंडाच्या अप्रपृष्ठावर नायक राजांच्या कोणा शिवभक्त एर्वेजानें एक सुंदर शिवमंदिर बांधलें होतें; त्या मंदिरांत रोजच्या रोज शिवदर्शनाला जाण्याचा तिचा नियम होता, व ती अपरिहार्य कारणाखेरीज तो नियम कधींही मोडीत नसे. घाईच्या वेळी ती दुरून तरी शिवमंदिराच्या शिखराचें तरी दर्शन घेत असे. पण वंदिवासांत पडल्या दिवसापासून ती त्या शिवदर्शनाला आंचवली होती. तरी त्यांतल्यात्यांत तिचें सुदेव एवढेंच कीं तिला शिवमंदिराजवळच किंचित्
व तेथें केदखाना म्हणून जी एक लहानशी खोली तिच्या वांट्याला आली होती, त्या खोलीला असलेल्या झरोक्यांतून तिळा शिवमंदिराचा सुवर्णाचा कळस दिसत असे. त्या कळसाकडे पहात्र तिने रोजच्या रोज त्या झरोक्याशीं बसावें,
मीनाक्षी राणीचा बंदिवास प
*५८ * ८0% /क् अँ २ 0०४७८ -४१-्टी च ५-५ ४५-४१ 0१० १ -“श४ ला 0 ९०-- क्र
व प्रहरचे प्रहर घळघळा अश्रू ढाळावे. पण त्या अश्रुपातांतही तिला समाधान ए वढेंच वाटे कों आपण सोहवश होऊन एका अविधाधमाच्या संगतीने बाटलो व देद्याचा सर्वस्वी नाश होण्याला कारण झालों, त्या महत्पापाचा आपल्या चारित्र्यावरचा डाग धवन काढण्यासाठींच परमेश्वराने आपणाला अक्या केदत तीन त्रिकाळ रडत वसविले आहे!
अद्या प्रकारे राणी मीनाक्षी तीन वर्षांतंतर एकरे दिवशीं मध्यरात्रीच्या सुमाराला त्या झरोक्यांतून चांदण्याच्या प्रकाशांत त्या महादेवाच्या% शिखराचें दर्शन घेत बसली असतां एकाएकीं तिच्या वंदिखान्याच्या दरवाजाची कडी वाजली. इतक्या अपरात्री आपणाकडे कोण आलें अर्से मनाशीं म्हणून मीनाक्षी एकदम दचकून दरवाजाकडे पाहु लागली. प्रथम तिला वाटले कीं या वेळीं अक्या अपरात्री आपणाकडे कोण येणार ? कांहींतरी भास झाला असेळू. त्याच वेळीं दुसर्याच क्षणाला पिश्याच्वलीलेची कल्पना तिच्या डोक्यांत येऊन तिला भयही वाटलें. तेवढ्यांत दरवाजाच्या फटींतून बाहेरील प्रकाश आंत डोकावूं लागलेला पहातांच तिची ती भीति दूर झाली. पण तेवढ्यांत त्याहूनहि दारुण अक्षी नवी भीति तिच्या मनांत उत्पन्न ज्ञाली, “ त्या चांडाळ नरपचूर्ने माझा घात करण्याचें तर योजिले नाहीं ता ? एरव्हीं इतक्या अपरातचीं माझ्याकडे कोण येणार? '
मीनाक्षीची ही भीति अगदींच अयथाथे होती असें नाहीं. चंदासाहेबानें यापूर्वी आपल्या कांहीं प्रतिस्पर्थ्यांचा कडेलोट केला होता तो अक्षया मध्यरात्रीच्या वेळींच केल्याचे तिळा माहीत होतें. तिला ज्या महालांत कोंडन ठेवण्यांत आलें होतें, त्याच महालांत आणखीही कांहीं राजवंदी पूर्वी होते. त्यांपैकी कांहीं स्वतः तिनें केदेंत कोंबलेळे होते, व कांहींना चंदासाहेबानें ती शिक्षा दिली होती. त्यांपैकीं दरएकाला केदखान्यावाहेर काढण्यांत आलें तें अशा मध्यरात्रीच्या वेळींच काढण्यांत आल्याचें तिला माहीत होतें, व तितक्या सर्वांचा उजाडण्यापुर्वी कडेलोट झाल्याचेंही तिनें रोज अन्नपाणी द्यावयाला यंणार्या दासदासींकडून ऐंकले होतें. त्यांच्या कडेलोटाविषयीं यापेक्षां जास्त कांहीं माहिती तिला नव्हती. परंतु केदसान्यांत कोंडण्यांत आलेली
_* *त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्यांत मध्यभागी एक प्रेक्षणीय खडक उचच्या एक प्रेक्षणीय खडक उंचच्या उच उभा असून त्या खडकावर पुराणप्रसिद्ध असें हें महादेवाचे मंदिर आहे.
ण्ट पेशवाईचे मन्वंतर
२०%.” -/% “९५-४९ १४५ “0५५-/४५५-% “५८% ४६/४६/०१५४ ८0५५८५0११0 ४00७७७ हहत पत्लतो अलीच्या
१४१४४४४ १४५.४४७. ४९०७४१४.“ 09.“ ४८-0७,” ४.४१. 00 “४ 0१७ .00, . ४७/५७/१७६७. ७७ ७७.४ “0.०, > ७०७ _७७९, र.
सारीं नररत्नें अतुल स्वार्थत्यागी व परम राष्ट्रतिष्ठ होतीं हें तिला माहीत होतें. अशा पुण्यशील जीवांच्या कपाळीं कडेलोटाची शिक्षा आली, ती त्यांच्या अढळ राष्ट्रनिष्ठेमुळेंच होय, अशी मीनाक्षीचीच काय पण कोणाचीही स्वाभाविकपणे कल्पना झाली असती.
तेच दुर्धर भोग आपल्या वांट्याला आले कीं काय असें वाटून मीनाक्षी भयचकित मुद्रेने दरवाजाकडे पहाते, तोंच दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर दरवाजाच्या आंत पाऊल टाकणार्या व्यक्तीकडे ओझरतें पाहून ती स्वतःच्या मनाशीं म्हणाली, “ आला-काळ आला ! ”
तो काळ-नव्हे, कर्दत काळ एका काळीं मीनाक्षीचा प्रियकर असलेला चंदासाहेब ! होता मीनाक्षीला त्याचें मुखावलोकन देखील करूं नयेसें वाटलें, म्हणून तिर्ने तोंड बाजूला फिरविलें. चंदासाहेबानें तें पाहिलें. पण त्या- विषयीं मनाशीं मुळींच पर्वा न करतां बेदरकारपणें तो आपले दोन्ही हात कमरे- वर ठेवून आढयतेनें दरवाजांत उभा राहून हंसत हंसत म्हणाला, “ मीनाक्षी, आज तीन वर्षांनंतर प्रथमच अक्या रात्रीच्या वेळीं मी तुझी भेट घेत आहें, हें पाहून तुला आश्चर्य वाटत असेल, नाहीं ?” ह्यावर मीनाक्षी कांहीं बोलते किवा कसे तें पहाण्यासाठी तो कांहीं क्षण स्तब्ध राहिला. पण मीनाक्षी कांहीं ने बोलतां जास्तच तिरस्काराने त्याच्याकडे पाठ फिरवून उभी राहिली तें पाहुन तो चार पावलें पुढें जाऊन पूर्ववत् हुंसतमुखानें म्हणाला, “ मीनाक्षी, तुला त्या प्रसंगापासून माझ्याविषयीं संशय वाटं लागला असेल व माझा तुला रागही आला असेल. तुला मीं एकाएकीं ह्या तुरुंगवासांत डाम्बून तुझ्याशी विश्वासघात केला हें कांहीं अंशी खरें आहे. पण तो प्रसंगच असा होता कीं मला त्यावेळीं त्से करण्याशिवाय गत्यंतर नव्हतें. माझा सासरा किती कडवा मुसलमान होता हें तुला माहीत आहे. दक्षिणेतील सर्वे हिंदू राज्यें नामदोष करून आपली एकतंत्री सत्ता दक्षिणेंत स्थापन करावयाची, ह्या महत्त्वा- काँक्षेच्या भरीं पडूनच त्यानें त्रिचनापल्लीच्या राजकारणांत माझा हात शिरकवून दिला होता. त्यावेळीं जर मी तुझ्या तंत्राने वागलो असतों, तर त्या क्ूरानें मला जबरदस्त शासन करून वर आणखी तुझ्या राज्याची पाळें- मुळे खणून काढण्याला कमी केलें नसतें. इतकेंच काय पण तुला देखील त्यानें आपल्या जनानखान्यांतली बटिक बनवून सोडलें असतें. मी प्रारंभापासूनच
मीनाक्षी राणीचा बंदिवास ५९ त्रिचनापल्लीच्या हिदु राज्याचा पुरस्कर्ता आहें अशी त्याची खात्री असल्या- मुळेंच त्यानें एथील घडामोडींच्या बाबतींत माझ्यावर सर्वेस्वीं विश्वास न टाकतां आपल्या मुलाला सफदरअल्लीला माझ्याबरोबर पाठविलें होतें. तो मेहुण्याचा कांटा मीं माझ्या वाटेतून दूर सारला. पण नबाबापुढें माझा नाइलाज झाल्यामुळें मला तुझ्या बाबतींत आजवर इतकें निष्ठुर व्हावे लागलें. अल्लाच्या कुपेनें तोही कांटा मराठ्यांनीं परस्पर माझ्या वाटेतून दूर केला आहे. आतां माझ्याशीं शत्रुत्व करावयाला सफदरअल्ली तेवढा जिवंत आहे. पण मरा- ठ्यांच्या हातीं त्याची देखील परस्पर चांदी आटेल अशी तजवीज करण्या- साठींच मी एथें आलों आहें. एवढें माझें कारस्थान सिद्धीला गेलें, कीं अर्काटरचे राज्य त्रिचनापल्लीच्या हुकमतींत आणून मी तुला त्या संयुक्त राज्याची मुख्य राणी करावयाला व तुझ्या हुकमतींत तुझा मांडलिक या नात्यानें दोन्ही राज्यें सांभाळावयाला माझी तयारी आहे. हे सर्वे मनोरथ तडीला जाणें अथवा न जाणें आतां केवळ तुझ्यावर अवलंबून आहे.” लगेच त्यानें आपल्या अंगरख्या- च्या खि्यांतून एक कागद काढून तिच्या हातीं देण्यासाठीं पुढें करीत म्हटलें, “हया कागदावर मला तुझी स्वदस्तुरची सही पाहिजे आहे. ”
मीनाक्षीचें मन चंदासाहेबाविषयीं आतां मुळींच अनुकूल नव्हतें. तशांत त्यानें आपल्या सासऱ्याच्या नाशाविषयीं संतोष प्रदर्शित केला, व मेहुण्याच्या नाशाचा नवा व्यूह रचण्याच्या बेतांत तो आहे असें त्याच्या तोंडून कळतांच तर ती मनांत म्हणाली, हा मनुष्य आहे कीं राक्षस आहे? परंतु तिनें तो कागद वाचून पाहिल्यावर स्त्रीच ती, आणि ईदवराच्या घरचा योगा- योगही तसाच होता, त्यासरसा तिला मोह पडला कीं यांतच आपलें खरें कल्याण आहे. ती तो कागद वाचं लागली तेव्हां चंदासाहेब मशालजीच्या हातांतील मशाल आपल्या हातीं घेऊन तिच्यापाशी उभा राहिला; व वाचतां वाचतां मधून एकदोन वेळां तिनें वर मान करून त्याच्याकडे पाहिले तेव्हां त्यानें अशा कांहीं स्नेहपूर्ण-प्रेमपु?्णे कोमल नजरेनें तिच्याकडे पाहिलें कीं त्यासरशी मोहिनी तिच्या मनावर पड लागावी. पण ती आपल्या मतें फार सावधानचित्त रहाण्याचा प्रयत्न करीत होती. आपण एकवार त्या विश्वास- घातकी अविधाच्या मायावी बोलांना व विषारी सौंदर्याला भुलून फंसलो, त्यामुळें आपल्या राज्याची-अब्रूपरी अत्रूची-सर्वस्वाची राखरांगोळी होऊन
६० पेशवाईचे मन्वंतर टया तुल्गवासांत कुत्र्याच्या सोतीनें आयष्य कंठणें आपल्या नगिबीं आलें याचा तिला विसर पडणें तर शक्यच नव्हते. त्या अनुभवाचा उपयोग करू नच पुढ वागावयारचें हा सावधगिरीचा विसर त्या क्षणालाही तिच्या डोक्यांत बोळत होता. तद्या स्थितीत तिर्ने तो कागद वाचला तेव्हां आापण आजवर अविचारानें केलेल्या अक्षम्य दुकाच अंशत: तरी परिमार्जन होण्याला हा उपाय चागला उपयोगी पडेल व आपणाला आजवर सववस्वी बडविणाऱर््या नराधमाला यथायोग्य शासन देखील दवदया झाली तर आपण करूं शक झं अश्या आज्या तिला वाटं लागली माणसाच्या मनांतील विचाराचे प्रतिविम्ब याच्या चयवर उमटलेले अनेकवार आढळन येते, व चंदासाहेबासारख्या रेत माणसाला तर तें अचूक ओळखतां येत असे मीनाक्षीची समाधानवत्ति तिच्या चर्येवर प्रतिबिम्बित शालला तो आपल्या तीक्ष्ण नजरेने लक्ष्यपू्वेक पहात होता. त्यावरूनच त्यानें जापल्या भनाशीं खूणगांठ मारली कीं आपलें काम ज्ञाळे; भोळी रागी पन्हा आपल्या माहूजालात सांपडली यांत संशय नाहीं. जर राणीवर आपला पगडा वसला नाहीं तर तिचा त्याच घटकेला कडेलोट करण्याची त्याची तयारी होती, व वहुशः आपणाला त्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार अत्या भाःवदन त्याने कडेलोटाच्या कामांत निर्ढावळेल्या बेरड क्षिपायांनाही आपल्याबरोबर आणलें दात. परतु आतां आवश्यकता नसल्यामुळें त्यानें त्या शिपायांना रजा दिली. तेवढ्यांत मीनाक्षीने तो कागद वाचून संपविला ब ती त्याची घडी करीत होती त्यादरून अंदाजून ह्यानें तिला विचारलें, “माझी हो याजना तुला मान्य आहे ना? ” इगडाखाय सांपडळेला हात मोकळा करून घेणेच शेयस्कर असतें, हा
व्यवहारशास्त्रांतील सामान्य नियम गीनाक्षीला त्या वेळीं अचक आठवला तिनें मागील सार्या गोष्टी विसरून चंदासाहेबाला होकार डिल तर मग त्या पत्रावर स्वाक्षरी करायला तुळा कांहीं हरकत नाहींना! ” मा एक यःकरिचत दुबळी बायको साणस माझ्या विनंतीला मरारराव तारपड्यासारखा कतेबगार व चतुर रणझंज्ञार कितपत मानील याचा पाजझ्ञा मलाच भरंवसा वाटत नाहीं. त्यापेक्षां तुम्ही थोर, ते थोर ! तुम्ही सत्ताधीश, ते सत्ताधीश! तुम्हींच त्यांच्याशीं सालोख्याची भाषा काढळी त्र त्याचा जास्त उपयोग होईल असें मला वाटतें ”
नाक्षी राणीचा वंदिवास ६१
“खरे; पण मरारराव घोरपडे हा उघड उघड मराठ्यांचा पक्षपाती आहे, व सर्वे मराठे अर्काटच्या नबाबाचे प्रतिस्पर्धी असल्यानें स्वाभाविक- पर्णेच ते माझाही दृेंष करतात. ते माझ्या शब्दावर विश्वास कसा ठेवतील? तुझ्या मध्यस्थीने त्याचा व माझा विश्वास एकवार पटला कीं मगच्या गोष्टी सोप्या आहेत. तोंवरच काय ती खरी अडचण आहे. ”
यावर मीनाक्षीनें जास्त आढेवेढे धेतले नाहींत. चंदासाहेबाने स्वाक्षरी करण्याचें साहित्य वरोबर आणविलेंच होतें, ते घेऊन तिनें स्वाक्षरी केली
या क्षणापासून त् तत्त्वत: बंधमुक्त झाली आहेर. ” तो कागद काळजी- पुदेके आपल्या ताव्यांत घेऊन म्हणाला, “परंतु राजकारणाच्या दृष्टीनें तुला वंधमुकक्त करण्याची वेळ अद्यापी न आल्याने मी तुला आणखी कांहीं दिवस प्रतिवंधांत ठेवं इच्छितो. ”
स्हणजं ? ” मीनाक्षीने विस्मयचकित दृष्टीने त्याच्याकडे पहात विचा- रले, “ मीं तुमचे इतके अपराध सहन करून देखील तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या हातांतील कळसूत्री बाहुलीप्रमाणें तुमच्या शब्दावरहुकूम वागल्ये, त्याचें हे फळ वाटतें ! ”
“मीं तुला एकवार सांगितलें ना; हें राजकारण आहे. राजकारणाचे अवघड डाव अद्याच डावपेचांनीं खेळावे लागतात. तुझा नेम काय? पुन्हां तू माझ्यावर उलटून माझ्या शत्रशीं सलोखा करून माझ्या नाद्याचीं कारस्थाने उभारणार नाहींस कशावरून ? यास्तव तुला इरेला घालून माझ्या सर्वे प्रतिस्पर्ध्यांचा मोड माझ्या हातून होईपावेतों आणि त्रिचनापल्ली, अर्काट व तंजावर हया तिन्ही राज्यांवर माझा एकतंत्री अंमल प्रस्थापित होईपावेतो तुझी मुक्तता होणार नाहीं. ”
मीनाक्षी त्या क्षणीं खवळलेल्या वाघिणीसारखी चंदासाहेबाच्या अंगावर चवताळून गेली. त्या आवेद्याच्या भरांत तिनें वेळीं त्याच्या नरडीलाही हात घातला असता इतकी ती संतापली होती. पण चंदासाहेबार्ने तिकडे यत्किचित् देखील लक्ष न देतां बाहेर जाऊन आपल्या सेवकांना आज्ञा केली, “ कोट- डीचा दरवाजा पूर्ववत् बंद करून घ्या. ”
शिपायांनी त्याच क्षणीं कोठ्डीचा दरवाजा वंद करून त्याला कुलूप ठोकले, व किल्ल्या चंदासाहेबाच्या हातीं दिल्या. चंदासाहेब लगेच तेथून निघून
६२ पेशवाईचे मन्वंतर
“१ -“*.
*५ .४४-९.४/ ५ ५१५१४४९ “% “१४% ४0१९-४१. 0५-८४. “१४ “१ -टो£टी “२२४४-५०-0० “9
राजवाड्यांत गेला. मीनाक्षी ह्या देवदुविलासाबहल त्या अंधारकोठडींत दरवाजाला डोकें टेकून कितीतरी वेळां ओकसाबोकशी' रडत होती. चंदासाहेबानें आपला कांट्यारने कांटा काढण्याच्या कामीं मोठ्या धूर्तपणानें उपयोग करून घेतला असें तिला आतां कळून आलें. पण तें ठेंच लागल्यानंतरचें शहाणपण होतें. ठेंचाळण्याच्या वेदना हलक्या करण्याच्या कामीं त्याचा थोडाच उपयोग व्हावयाचा होता !
त्या यातनामय बंदिवासांत देखील निद्रा घेण्याची संवय जरी मीनाक्षीला गेल्या तीन वर्षांत झाली होती, तरी आज तिला उभी रात्र झोंप कशी ती आली नाहीं. बराच वेळपावेतों ती आपलीं पूर्वकर्म व त्यांचे परिणाम आठवून रडत बसली असल्यानें रडून रडून तिचे डोळे सुजले होते. कधीं कधीं असेंही होतें कीं मानसिक श्रमांचा अतिरेक झाला कीं त्यांतच माणसाचा क्षणभर डोळा लागतो. तशा पहाटेच्या दोन घटका रात्रीला मीनाक्षीचा डोळा अंमळ लागतो न लागतो तोंच तिच्या कोठडीचा दरवाजा पुन्हां कोणीतरी उघडूं लागल्याचा भास तिला झाला. मसौीनाक्षीच्या छातींत धस्स झालें; तो काळ पुन्हां एखाद्या नव्या उपायानें छळण्यासाठीं आला कीं काय?
तोंच दरवाजा उघडला गेला, व एक वुरखेवाली व्यक्ति हातांत एक मंद प्रकाश देणारी दिवटी घेऊन आंत प्रविष्ट ज्ञाली.
सातार््याकडील वर्तमान ६३
"४४४४४४१४५४ ५९ ४८४८ ९८ ८८४५-४८ ४८ ४८८८ ५८८५५५ -८-८५-४५-४५-/५८-५८-/५--८५-८१५-/५-/५/४-५-/५-/५-/५४४-/५-/१-/५-८५/१८--०८/-- ५८८४ ४४४४४शथ्ट४१ ४४४४४१0 ५"५0५१४५४९१"४/४४”*
प्रकरण ८ वें सातार्याकडील वतेमान
(वडडड ळ अह 000 आच. 0 हि अय हवगाकळन
ज्या कर्नाटकांतील पूर्वोकत घडामोडींना मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारी सातारा एथील मराठ्यांची वधिष्णु साम्राज्यसत्ता ऊफे हिदुपदपाद-
शाही होय, त्याअर्थी आपणाला आतां तेथील राजकारण समजावून घेण्या- साठीं तिकडे वळणें प्राप्त आहे. त्या वेळीं साताऱ्यांत चाललेल्या राजकीय घडामोडीदेखील कांहीं कमी महत्त्वाच्या नव्हत्या. एक तर बाजीराव पेश- व्याच्या मत्यनंतर सर्व शहर वास्तविक ढःखसागरांत ब॒डन गेलेलें असावयाचें किवा आतां नवीन पेशवे अधिकारारूढ होणार म्हणून सवंत्र आनंदी आनंद दिसावयाचा. मृत पेशव्यांच्या परचात् नवीन पेशवा अधिकारारूढ होणार ही गोष्ट परंपरेने ठरल्यासारखीच होती; आणि नानासाहेब पेशवे हे शाह महाराजांचे अत्यंत आवडते, लहानपणापासूनच महाराजांच्या कटिखांद्यावर खेळलेले व अंमळ मोठे झाल्यापासून राजकारणांत मुरलेले असे असल्यानें त्यांनाच महाराज पेशवाईची वस्त्रें देणार याविषयीं सामान्य प्रजाजनांत झुळींच दुमत नव्हतें. परंतु इतर अनेक भानगडी ज्या राजधानींत व राज- धानीबाहेर निरनिराळ्या ठिकाणीं उपस्थित झाल्या होत्या, त्यांनींच तर नानासाहेबांना पेशवाई मिळण्यांत खो पडण्याचा मुख्य संभव होता
त्या सुमाराला कोल्हापूरकर संभाजी महाराजांचेंहि सातार्यांतच ठाणें होतें* याप्रमाणेंच राजवटीचे इतर अनेक मात्तबर सरदारहि नव्या पेशव्यांच्या अधिकारदानाच्या सोहळ्यासाठी म्हणून सातार््यांत एकत्र जमले होते.
*सातारकर आणि कोल्हाफ्रकर छत्रपती यांच्या या भंटीची कांहोंशी हकोगत का. सं. प. या. लेखांक ४२९ च्या शेवटच्या कलमांत देण्यांत आली आहे. कोल्हापूरकर संभाजीराजांच्या ह्या आगमनांतील हेतु जरी कोठें स्पष्टपणे उपलब्ध नाहीं, तरी याच प्रसंगीं शाहूमहाराजांच्या पश्चात संभाजीराजांनीं गादीवर बसावें असा बारा कलमांचा गप्त करार नानासाहेब
आणि संभाजीराजे यांच्यांत झाला, तो वरील पुस्तकाचा लेखांक ४२८ मध्यें दाखल आहे .
६9 पेशवाईचे मन्वेतर रघूजी भोंसले आणि वाबूजी नाईक हेहि कर्नाटकांतील यशस्वी स्वारी अर्धैवरट टाकन व तिकडील बंदोबस्ताचा सर्व भार मुरारराव घोरपड्यांवर सोंपवन घाईघाईने साताऱ्याकडे आले ते बाजीराव पेशव्यांचे निधन व त्यांच्या ज्येष्ठ चिरंजिवांना अर्थात् नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे मिळण्याची शक्यता या दोन गोष्टी एंकनच आले होते. भोंसळे आणि नाईक यांचा निरनिराळया कारणांसाठी पेशवाईवर कसा डोळा होता हें वाचकांना या- पूर्वी कळून चुकलेंच आहे. नाईक आणि भोंसळे जे सातार्यांत आले, ते मुख्यतः त्याच गोष्टींविषयी वाटाघाट करूं लागले. गहू महाराजांची आव- डती रक्षा लक्ष्मीबाई ही त्या दोघांना प्रथमपासूनच सामील होती आणि या त्रिकुटांत आणखी इतर चिल्ह्र चळवळ्यांची भर पडून नानासाहेबांना पेशवाई मिळण्याच्या विरुद्ध तो एक भयंकर गुप्त कटच उभारला गेला होता. नाईक आणि भोंसळे सातार््यांत येतांच त्यांची व शाहू महाराजांची प्रथम गांठ पडली आणि नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे देण्याविषयींचा महाराजांचा मनोदय त्यांना स्पष्टपणे कळून आला. तेव्हांपासून तर त्या राजकारणाला अत्यंत मह- त्वाचा रंग चढू लागला. बाह्यात्कारी या मंडळींना शाहु महाराजांच्या इच्छेला विरोध जरी करतां आला नाहीं, तरी पडद्यामागून गोळ्या झाडून हा बेत फिसकटून टाकण्याचे कार्य साधण्यासाठी ज्याची त्याची आपापल्या परी शिकस्त चालली होती. मात्र आदचर्याची गोष्ट ही कीं लक्ष्मीबाई, नाईक आणि भोंसले यांची पेशव्यांविरुद्ध जरी गट्टी जमली होती तरी त्या तिघांचे | नानासाहेबांना पेशवाईपद न देतां तें बाबजी नाईक बारामतीकर यांना दयावे, अशी खटपट बाजीरावाच्या मत्यनंतर रघजी भोंसले यांनीं केली सन १७४० त रघूजी भोंसले कर्नाटकांतील स्वारींत असतां तिकडेच बाजीरावाच्या मृत्यूची बातमी त्याला समजली. त्यावरोबर स्वारीचे काम अधेच टाकून तो लगेच पेशवाईच्या खटपटीसाठीं उतावळीनें साताऱ्यास आला. नानासाहेबांना पेशवाई मिळूं नये अशी खटपट करणारांत भोंसळे व नाईक यांप्रमार्णेच महाराजांच्या राण्याही सामील होत्या असें इतिहास सांगतो. रघूजी भोंसले शाहुमहाराजांचा चुलत साड असल्यामुळे व वाबूजी नाईक हे पेशव्यांचे सावकार असल्यामळें दोघेही ह्या पेक्षवाई प्रकरणी नानासाहेबांना चांगलाच शह देऊं ककले. तो शह पुढे फळाला आला नाहीं ही गोष्ट निराळी
सातार््याकडील वर्तमान ६५ अन्तस्थ कावे एकमेकांविरुद्ध आणि अगदीं निराळे असे होते. लक्ष्मीबाईला आपला वेडगळ मुलगा पुढें छत्रपति होण्याला मदत करील असाच पेशवा पाहिजे होता, व ती मदत करण्याचें वचत त्यांना बाबूजी नाईकांनी दिलें असल्यामुळें बावूजी चाईकांना महाराजांनीं पेशवा करावें असा तिचा महा- राजांना आग्रह सुरू होता. याच्या उलट रघूजी भोंसल्यांना आपला मुलगा छत्रपति व्हावयाला हवा होता व ती गोष्ट नाईकांच्या सहाय्याविना तडीला जाणें शक्य नाहीं हें हेरून त्यांनीं नाईकांची कांस धरली होती. प्रसंग पडल्यास पेशवेपदाची ज्षूल नाईकांच्या पाठीवर घालण्यासाठी महाराजांपाशीं आपलें आणि आपल्या बायकोचे शकय तेवढें वजन खर्चे करण्यासाठीं त्यांनीं चंग बांधला होता. रघूजी भोंसल्याची बायको ही शाहू महाराजांची चुलत मेहुणी असल्यामुळें व शाहू महाराजांच्या कारस्थानी' राण्यांना पेशव्यांचा कारभार डोईजड वाटूं लागल्यामुळें रघूजी भोंसल्यांच्या इच्छेला राणी- वश्ांत मान्यता मिळणें मुळींच अवघड गेलें नाहीं. तात्पर्य, भोसल्यांचा हा डाव जर साधला असता तर भोसल्यांचा मुलगा महाराजांच्या एखाद्या आवडत्या राणीच्या मांडीवर बसवून भविष्यकाळीं सातारचा छत्रपति झाला असता. |
मात्र मौजेची गोष्ट ही कीं ह्या पक्षाचे हे बेत जसे बाहेरील जगापासून तसेच अंन्तःपुरांत लक्ष्मी बाईपासूनहि अत्यंत गुप्त ठेवण्यांत आले होते. यांत
अत्यंत कुचंबणा कोणाची होत असेल तर ती बिचाऱ्या बाबूजी नाईकांची! : भोंसले स्वतः पेशवे होणार म्हणून म्हणाले तरी त्यांना नाहीं म्हणण्याची नाईकांची छाती नव्हती. निदान मग दुय्यम कारभार तरी आपल्या हातीं येईल, व भोंसले हे शिपाईगडी असल्यामुळे आपल्यासारख्या कलम- कसायाची पेशवाई-राज्यकारभारांत त्यांना अवश्य गरज लागेल, असा नाईकांचा होरा होता. भोसल्यांचा. मुळगा पुढेमागे छत्रपति. झाला तर त्यावेळीं त्या छत्रपतींच्या नांवावर सर्वे राज्यकारभार आपल्याला गुंडाळून पदरीं घेतां येईल अशीहि त्यांना हांव होतीच. पण भोंसल्यांचा हा डाव नक्की साधेल्वच अशी नाईकांची खात्री नसल्यामुळें व विशेषतः शाहूमहाराजांचा स्त्रेगपणा$ लक्षांत घेऊन त्यांनीं लक्ष्मीबाईपाशीं पूर्ववत् संधान राखले होतें,
पणा 0 ---*-.न०० कापा ीणणणापा ण? णी फनी
कनाल ऑप लनन चा
$ शाहुमहाराजांना अनेक राण्या व रक्षाही होत्या हें इतिहासांत महशूर ण
६४ पेशवाईचें मन्वंतर
४.४५./२५/४५-/ ४.४४.
१४-७७ *./४ ४७ ५८.४१ ./"१० ०८४. /0१./४ ७.//१४ ४१९७ ८१९ .४७...४११./४0७ .»7%, //७ , ०१... ७...
*,/१-४१../४ ./ ४. '- ५1४/%४ १ ४0४. ५५५/१%.५४४.” *.४१- €% ८४.” ४. ५ 0 ४0%. १४१.”
लक्ष्मीबाईची अट एकच, कीं आपला मूलगा भविष्यकाळीं छत्रपति व्हावा. आणि नाईकांनी ती अट मान्यहि केली होती. दुर्देवाची-नव्हे मराठ- शाहीच्या दृष्टीनें सुदेवाची गोष्ट एवढीच कों नेहमीं बायकांच्या तंत्राने वागणारे शाहुमहाराज ह्या पेशवेधदाच्या एका बाबतींत मात्र तितक्या ढिलाईनें वागण्याला राजी नव्हते. त्यांनीं मनांतूत नानासाहेबांना पेर- वार्दचीं वस्त्रे देण्याचा निर्धार केला होता व इतर कारभारी मंडळींच्या विरुद्ध आग्रह परोपरीने पडला तरीसुद्धा त्यांचा तो बेत बदलला नाहीं. त्या विरोधापासून फलनिष्पत्ति एवढीच झाली कीं पेशवाईचे अधिकारदान जें ताबडतोब व्हावयाचे तें एक दोन आठवड्यांनी लांबणीवर पडलें.
ह्या इतर चळवळ्या मंडळींची गोष्ट सोडली तर खुद नानासाहेब तरी महाराजांच्या या कृपेबद्दल भरपूर स्वामीभवतीचा मोबदला त्यांना द्यावयाला तयार होते किवा नाहीं हाहि एक विचार करण्यासारखाच प्रश्न होता. कोल्हापूरकर संभाजी महाराजांनीं सातार्यांत महाराजांचे पाहुणे या नात्यानें जें ठाणें दिलें होतें तें बाह्यात्कारी भलेपणाचें द्योतक असलें तरी त्यांतील 'आन्तरः को$पि हेतुः ' निराळा होता व तो जर कोणाला माहीत असेल तर तो एकट्या नानासाहेब पेशव्यांनाच. कारण इतिहास सांगतो कीं, याच सुमा- राला पेशवाईचीं वस्त्रे कोणाला द्यावीं या भानगडी राजदरबारांत जोरानें वाळू असतांना व नानासाहेबांनाच पेशवाईपद द्यावयाचें असा प्रयत्न शाह महाराज जिवाभावानें करीत असतांना नानासाहेब तिकडे कोल्हापूरकरांशीं गुप्त दोस्तीचा तह करण्यांत गढून गेले होते.*
आहेच. त्यांच्या राण्यांनीं राजकारणांत माजविलेळे केक अस्थानी घोटाळे इतिहासांत प्रामुख्यानें नमूद आहेत. शाहूमहाराज हे करड्या स्वभावाचे व पूर्ण कर्तव्यनिष्ठ असते तर त्यांच्या राज्यकारभारांत स्त्रीसाम्राज्य कधींच माजलें नसतें. सुदेवानें विरूबाई ही त्यांची रक्षा अत्यंत सुशील व समजूत- दार होती. तिच्या ह्यातीपर्यंत राणीवश्यांतील बखेडा मराठशाहीला फारसा विघातक होऊं शकला नाहीं. पण तिच्या पड्चात् त्या बखेड्यांनीं जोरानें वर डोकें काढलें व त्या बखेड्यांच्या आगीची झळ मराठदाहीला चांग- लीच भोंवली.. ।
“ह्या महत्त्वाच्या करारनाम्याचा ओझरता उल्लेख पूर्वी करण्यांत आलाच आहे. तो करारनामा नानासाहेब व त्याचे चुलते चिमाजीआप्पा
साताऱ्याकडीळ वर्तमान ६७ नानासाहेबांचें कोल्हापूरकराशीं पूर्वोक्त संधान सुरू होतें याची शाहू महाराजांना अथवा इतर दरबारी मंडळींना दखळगिरी नव्हती असें नाहीं. नाईक, भोंसले वगेरे कारभारी मंडळी; त्याप्रमाणेंच महाराजांच्या राण्या आणि रक्षा लक्ष्मीबाई ही सर्व मंडळी नातासाहेवांच्या वर्तनांत त्यून सांपडतें कोठें आणि नानासाहेबांविरुद्ध महाराजांचे मन कलुषित करण्यांत त्याचा उपयीग आपण करून घेतों केव्हां यासाठीं अगदीं डोळ्यांत तेळ घालून टपून बसली होती. प्रत्येकाचे गुप्त हेर नानासाहेबांच्या पाठीवर होते. त्या हेरां- माफत नानासाहेब आणि कोल्हापूरकर संभाजी यांचें रहस्य जुळल्याची बातमी हां हा म्हणतां नानासाहेबांच्या प्रतिस्पर्ध्यांना कळून षट्कर्णी ज्ञाली व ती शाहू महाराजांच्या कानांपर्यंतहि गेळी. महाराजांनीं या बाबतींत नानासाहेबांना बोलावून त्यांचा जाब विचारला. परंतु नानासाहेब हे अद्या अनेक घडामोडींच्या प्रसंगांतून पार पडण्याच्या बाबतींत पक्के तरवेज होते. एकोणीस वर्षांच्या पोरवयांत त्यांनीं आपल्या कारवाईने मराठ्यांच्या राज- कारणांत पुष्कळच महत्त्व संपादन केलें होतें व म्हणूनच महाराजांचा विश्वास इतर सर्व मंडळीविरुद्ध त्यांच्याच शढावर बसणें क्रमप्राप्त होतें. दुसरी गोष्ट, आपणांवर एखादा आरोप येतांच त्याची निरवानिरव कशी करावी हें तानासाहेब पूर्ण ओळखून होते. त्यांनीं महाराजांना स्पष्टपणें सांगितलें, ह्या दोघांनीं कोल्हापूरकर संभाजी राजांना लिहून दिला आहे. (का. सं. प. या. लेखांक ४२८) या करारनाम्यांतीलळ आशय पुढीलप्रमाणे आहे. “सातारचे राज्य स्वामींचे (संभाजीराजांचे) व एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजीराजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे, तों बाहया- 'त्कारी आम्ही त्यांचे सेवक, परंतु अंतर्यामी स्वामींचे. शाहूमहाराज यांनीं केलासवास केल्यावर दोन्हीं राज्यें स्वामींची, आणि आम्ही सेवक स्वामींचे. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करूं शी शपथ घेतली होती. त्याभमाणें दोन्हीं राज्ये एक करून एकछत्री स्वामींचा शिक्का चालावा; आणि आम्हीं शाहूमहाराज यांचे कारकोदीप्रमाणें सेवा करून असावें, हें प्रमाण. यासी अंतर करणार् नाहीं. ” शाहूमहाराजांच्या भृत्यूपुवी नऊ वर्ष पेशव्यांनीं हा ठराव संभाजीराजांशीं केला होता; आणि शाहूमहाराजांच्या मृत्यनंतर तो पुन्हां पेशव्यांनीं ताजा करून दिला. पुढे रामराजाची स्थापना होऊन हें . कारस्थान संपळें, तेव्हां पेशव्यांना हा करार पाळण्याची आवश्यकता राहिली नाहीं हें उघड आहे.
६८ . पेशवाईचें मन्वंतर
“आपण मला पेशवाईची वस्त्रे देणार हें ज्या मंडळींना सहन होत नाही त्या मंडळींनी आपल्या कानीं माझ्याविषयीं वीष ओतण्याचा हा नवा उपाय शोधून काढला आहे.”
“ मृग काय; तुमचा कोल्हापूरकर महाराजांशी कांहींच संबंध नाहीं ? " महाराजांतीं आश्चर्ययुक्त मुद्रेने विचारलें |
“ नाहीं कसा? संबंध आहे; आणि जोंवर मला इमानेंइतबारे महा- राजांच्या चरणांची सेवा करून राजवटीची इभत अबाधित राखावयाची आहे तोंवर राजवटीच्या सवे शत्रुमित्रांशी सलोखा ठेवणें मला प्राप्त आहे. महाराज मला पेरवाईचीं वस्त्रे देणार किवा नाहीं हा प्रश्न महाराजांच्या मर्जीचा आहे. परंतु माझ्या वाडवडिलांतीं राजकारणांत जें अनुसंधान राखलें तं राखण्याला मी महाराजांच्या आजवरच्या उपकारांबदहल उभा जन्म बांधळेला आहें. कोल्हाप्रकरांचें आणि आपलें वेमनस्य मला माहीत नाहीं असें नाहीं. असें असतां मी कोल्हाएरकरांशीं ये जा ठेवतो, त्यांच्याशीं गोडी राखतों, यांतील अर्थ काय असेल हें महाराजांनींच ओळखावे. कोल्हा- पूरकर जे नेमके या वेळीं येथें आले ते पेक्षवाईवरील संकटाचा फायदा घेऊन येथल्या राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी आले असले पाहिजेत हें माझ्यासारख्या मुठीएवढ्या मुलानें महाराजांसारख्या मुरलेल्या राजकारण- पटला सांगितलें पाहिजे असें मुळींच नाहीं.”
नानासाहेव जरी अंतःकरणापासून बोलत होते तरी महाराजांच्या चर्यकडे त्यांची दृष्टि तीक्ष्मतेनें वेधून राहिली होती. मनुष्याच्या चर्येवरून त्याच्या अंतःकरणांतदील निगडित भावना ओळखण्यांत नानासाहेब फारच तरबेज होते आणि त्यांतल्यात्यांत महाराजांशीं' पेशव्यांचा गप्त बातमीदारा- च्या नात्यानें त्यांचा नहमींच संबंध असल्यानें* महाराजांच्या प्रत्येक हाव-
“'६.//% .»7*. “क “"% “%* १ “0 ४0 “7 /४९..//११../ १५ ५९७७
णणणापण ण थिशिपि0िणिणिपणणिणा िशिरशिशिशिणिणाणिणीणाणीणा
*बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या कारकीर्दीप्रमाणेंच शाहूमहा- राजांच्या कारभारी मंडळींतील इतर कारभारी पेशव्यांना कांहीसें पाण्यांत पहात असल्यामळे आणि श्रीपतराव प्रतिनिधि वगेरे वयस्क क्छणान- बंधी कारभाऱ्यांचें शाहुमहाराजांपाशीं बरेंच प्रस्थ असल्यामुळें पेशवे नेहमीं सातारच्या राजदरबारीं आपले प्रतिस्पर्धी कारभारी काय उलाढाली करतील याविषयीं साशंक असत. त्या उलाढालींवर नजर ठेवण्यासाठी पेशव्यांचे गप्त
साताऱ्याकडीळ वर्तमान ६९
हि “6 4. "7१% € १.८१. ४१४ ४१५१.” १.४ शं ४२. २४४१४ ४.७ ४ ४. “.७१७४ ४००” 4“ २... ४५.” ४-0. >€%.४ “४-४. /7*. “१५ *््&€ च क. त क) त
भावाचा, प्रत्येक नंत्रकटाक्षाचा, प्रत्येक अंगविक्षंपाच[ा-फार काय, त्यांच्या प्रत्येक इवासोच्छवासाचा गूढार्थ काय हें ओळखण्यांत नानासाहेबांचा हात धरणारा तेव्हांच्या दरवारी माणसांत दुसरा कोणी नव्हता. गोड आणि एखाद्याच्या अंतःकरणाला पटेल असें भाषण बोलण्यांत आणि त्याप्रमाणेच छेखणीनें कमालीची साखरपेर करण्यांत नानासाहेबांनी इतर कसलेल्या 'कलमबहाहरांना व वाचानिपुणांना हार खावयास लाविलें होतें. एखादा निष्णात वेद्य ज्याप्रमाणें रोग्याच्या मुखचर्येवरून त्याच्या रोगाची चिकित्सा करून योग्य ती उपाययोजना करितो त्याप्रमाणेंच नानासाहेब महाराजांच्या . नुसत्या हाळचालीवरून त्यांच्या मनांतल्या गुप्त गोष्टी सहज ओळखूं शकत व तझ्या प्रसंगीं महाराजांना पटेल तेंच बोलून किवा करून महाराजांची मर्जी अधिकाधिक संपादन करीत असत. आजहि त्यांनीं तसेंच केलें. महाराजांना आपलें बोलणें पट लागलें असें पाहतांच त्यांनीं जाणखी एका पाऊलानें पुढचा पल्ला गांठला, “ ओघाला आलें म्हणन बोलणें प्राप्त झालें; महाराजांना पुत्रलाभ व्हावा व मराठेशाहीची भरभराट व्हावी अशी मंगळ इच्छा मनांत बाळगणारे महाराजांच्या जिव्हाळ्याच्या मंडळींतहि सध्या फारच थोडे- कोणाची पेटे दाढी आणि कोण पेटवी विडी या न्यायानें नाईक काय, भोंसठे काय आणि % % % पण महाराजांच्या राणीवंशांतील स्त्रिया मला मातेसमान पूज्य आहेत, त्यांच्यावर कृष्णकारस्थानाचा आरोप करून मी माझ्या बाल- पणाला दोष लावूं इच्छित नाहीं. त्या चुका झाल्या तरी राण्यांच्या अथवा महाराजांच्या प्रियतमांच्या आहेत व त्या चुकांबद्दल त्यांना दोष देणें म्हणजे अप्रत्यक्षपणे महाराजांनाच दोष देणें होय असें मला वाटतें, म्हणून मी बोललों हे शब्द देखील माघारे घेतों व भलतेच शब्द तोंडावाटे
निघाल्याबददळ महाराजांची दोन्ही हात जोडन क्षमा मागतो. ” असें म्हणन नानासाहेबांनी महाराजांना हात जोडन आपलें मस्तक त्यांच्या पायांवर न्म्त्र
दूत सातारला व अन्यत्रही पसरलेले असत. नानासाहेब हे त्यांपेकीं एक दूत- प्रमुख बातमीदार असून लहानपणापासून त्यांनीं सातार्यांत ठाणें दिलें होतें त्यांनीं बालळवयांतही आपलें अनसंधान राखण्याचें काम बेमालम केलें व आपल्या डावपेचांनीं शाहुमहाराजांची' मर्जी संपादन केळी. तीच पुढे त्यांना पेशवाईपद मिळण्याच्या कामीं उपयोगी पडली
७० पेशवाईचे मन्वेतर
“१.४४ /१% “१ /7४ ८» ७ १ .“५ ८४.७ ८" /% »% ५ /* * “१.५५ /* ८५ ८१ // “€% ५४% ५» * “४.९७ /09.१७ / ७८0७ /
महाराजांनीं लगेच म्हटले, “ तुम्ही इतके कचरतां कां? आम्हो तर म्हणतों कीं तुम्हांला आमच्या घरोब्यामुळें आमच्या राण्यांचीच काय पण आमची देखील चूक दाखविण्याला पूर्ण मुभा आहे. तुमच्या कानीं जें काय आलें असेल तें स्पष्ट बोळून दाखवा. ”
“ परंतु राजवटीची कारभारी मंडळी ही मला माझ्या तीर्थख्पांच्या ठायीं पुज्य आहेत. त्यांच्याविषयीं उणेदुणे बोळ मीं बोलावे तरी कसे ? माझ्या- सारख्यार्ने ल्हान तोंडीं मोठा घांस घेणें बरें नव्हे! ”
नानासाहेबांच्या पुर्वीच्या भाषणांत जो धूर्तपणा प्रतिबिबित झाला होता तो या भाषणांतही होता. पहिल्या वेळीं त्यांनीं आपल्या एका वाक्याच्या फटकाऱ्यासरसे महाराजांच्या राण्या व लक्ष्मीबाई यांच्याविषयी प्रामाणिक मताचे विषविद्ध महाराजांच्या मनांत ओतले व या दुसर्या वाक्याने कारभारी मंडळीविषयीं भलताच कितु त्यांच्या मनांत आणून दिला. महाराजांना त्यांचे हे डावपेच कळणें शक्यच नव्हतें. त्यांनीं जास्त आग्रहपूर्वक सर्वे खरा प्रकार काय आहे तो स्पष्ट करण्याबइळ नानासाहेबांना सांगितलें. नानासाहेब नाहीं नाहीं म्हणून विनयाच्या लटक्या आविर्भावाने उत्तर देण्याची टाळाटाळ करूं लागले, तेव्हां महाराजांनीं आपुलकीने संतापून त्यांना स्पष्ट सांगितलें, “असले मनदुबळे पेशवे आम्हांला नको आहेत. आमच्या सारख्यांचें छत्र शिरीं असतां घरच्या गुन्हेगा रांचे गुन्हे प्रत्यक्ष आमच्यापाशीं-राजवटीच्या
१
धन्यापाशीं बोलून दाखवावयाला ज्याला धीर होत नाहीं असला बावळट मनुष्य उद्यां पेशवा होऊन मोठमोठीं राजकारगें काय तडीला नेणार? ” अर्से म्हणून महाराज नानासाहेबांकडे पाठ फिरवन रागानें अंमळ
गप्प बसले.
प्रकरण नववे सातार््याविषयी आणखी थोडे.
प गा.. > । य...
र्ऱा पल्यावर ही इष्टापत्तीच कोसळली असें नानासाहेबांना वाटलें. त्यांनीं त्या संधीचा फायदा घेऊन भोंसळे,नाईक,उभयतां राण्या व लक्ष्मीबाई . यांच्या कारस्थानाविषयीं शाहू महाराजांची जितकी म्हणून खात्री करणें शक्य होतें तितकी करण्याला कमी केलें नाहीं. सुव्यावरोबर ओलेंहि जळतें या न्यायाने प्रतिनिधींवरहि त्यावेळीं त्यांनीं चार शिंतोडे उडविले. पण ते फार सौम्यपणाचे होते. कारण एक तर प्रतिनिधि हे. शाहूमहाराजांच्या गळ्यांतील ताईत. त्यांना दुखविणें म्हणजे प्रत्यक्ष शंकराच्या दर्शनाला जाऊन नंदीला लाथा मारण्यासारखेंच होतें. दुसरें असें कीं प्रतिनिधींनी या वेळीं तरी पेशव्याची बाजू उचलून धरली होती. यांतहि प्रतिनिधींचा कांहीं कावा नसेल असें नाहीं. त्यांना मनांतून असें वाटत असावें कौं नाईक किवा भोंसळे असला परका सनुष्य पेशव्यांच्या गादीवर येऊन डोईजड होऊन वसण्यापेक्षां नाना- साहेबांसारखा कोवळा तरुण पेशवा झाल्यास तो शक्य तों आपल्या तंत्राने चाळूं लागेल व त्याळा आपल्या मुठींत ठेवणें आपणाला सोपेंहि जाईल. *
असो. महाराजांच्या मनावर ह्या स्पष्टीकरणाचा संभाव्य तोच परिणाम झाला. त्यांनीं नानासाहेबांना पुन्हां वचन दिलें, “ हीं पेशवाईचीं वस्त्रे कांहीं झालें तरी तुमच्याशिवाय अन्य कोणालाही आम्ही देणार नाहीं. त्याबरोबरच त्यांनीं इतर अनिष्ट गोष्टींचा बंदोबस्त करण्याचें ठरवून त्या 000 1 य का स
*थोरल्या बाजीराव पेशव्यांना श्रीपतराव प्रतिनिधींनी प्रसंगीं राष्ट्रकार्याची हानि करूनहि कसा जबरदस्त विरोध केला हें इतिहासांत मझहशूर आहेच. थोरल्या बाजीरावांच्या पश्चात् पेशवे आणि प्रतिनिधि यांच्यामधील हो तेढ तात्पुरती तरी मिटण्याचें कांहींच कारण नव्हतें. परंतु ती तेव्हां तशी मिटली गेली व श्रीपतरावांनीं त्या वेळेपुरता नानासाहेबाच्या पक्षाचा अंगिकार केला. यांतील हेतु वर निदिष्ट केला आहे त्यापेक्षां विराळा असणे मुळींच संभवनीय नाहीं.
७२ पेशवाईचे मन्वंतर
६.४५. «९ २ ७ /0७ ७९५ ८७८९५7 ४.५ ०0, .2:५ »7९ ८१-५५ ८१२ ४४ “४ “१ ८0-८५ ५०% १५८ ०५ “५.०७ ४९... » ४४१७४१४ ४४-”% ४४५१ ४0४, ६.०० १_/ "०.४५... ०. > *-१ ७४४ ४ केरल ७८४ ७५०७१७४७४१ ८०१७८४७८४७ “0. कका
चौकशीची जबाबदारी नानासाहेबांवरच टाकली. असे दिवसांभागून दिवस कोटतां लोटतां अखेर महाराजांनीं आपल्या कारभाऱयांच्या संमतीने नाना- साहेबांना पेशवाई बहाळ करण्याचा शुभ दिवस मुक्रर केळा. नाईकांनी अखेरचा रामबाण उपाय म्हणून पेशव्यांकडे असळेली आपली जुनी कर्जाऊ रक्कम एकदम मिळविण्याविषयीं नेमका त्याच वेळीं तगादा लावला. परंतु प्रतिनिधींसारख्या प्रौढ मंडळींनी मध्यें पडून ऐन वेळीं नानासाहेबांना जरूर तें आथिक साह्य करून नाइकांचा तोहि डाव हाणून पाडला. नाइकांना कर्ज परत मिळालें; पण दरबारीं त्यांची जी फजीति झाली तिची भरपाई त्या कर्जाच्या रकमेच्या अनेक पटींनींहि होऊं शकली नसती. अखेर एकदांचें ठरले दिवशीं नानासाहेबांना भर दरवारांत महाराजांनीं पेशवाईपद दिलें च वस्त्रे अर्पण केलीं. त्या समारंभाला कोल्हापूरकर संभाजी राजे व दर- बारांतील इतर मातबर मंडळीदेखील हजर होती. परंतु तो त्यांचा केवळ जुल्माचा रामराम होता. संभाजी राजे मात्र नानासाहेबांच्या अन्त:करणाची आणखी एकवार ओळख पटवून घेण्यासाठीं कदाचित् त्या ठिकाणीं हजर असतील
महाराजांनीं पेशवाईची वस्त्रें नानासाहेबांना अर्पण करतांना त्यांना कळकळीचा उपदेश केला, “ नाना, तुमच्या आजोबांनी आणि वडिलांनी राजवटीची अमोल सेवा करून राजवटीची भरभराट व स्वतःची अपरंपार कोति यांचा यशोदुंदुभि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत दुमदुमता केला आहे; त्यांचेच पुत्र तुम्ही आहांत. तुमच्या घराण्याचा आणि आमचा आज तीन पिढ्यांचा ऊणानुबंधा'वा संबंध आहे. तो संबंध चिरकाल टिकवून गादीची इमानेंइतबारें सेवा करणें व राष्ट्राच्या आबादानीसाठीं आजोबा आणि तीर्थरूप यांच्या पावलांवर पाऊल टाकून झटणें हें तुमचें कर्तव्य आहे. तुम्ही पोरवय म्हणून इतर मातबर मंडळींनीं तुमची प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष उपेक्षा केली असली तरी ती तुम्हीं मुळींच मनावर घेऊं नये. त्यांना तुमची खरी पारख असणें शक्य नाहीं. कारण त्यांचा तुमचा तेवढा सहवास नाहीं. आणि दुसरें, त्यांनीं जो थोडाफार विरोध केला असेल तो केवळ महाराष्ट्राची आबादानी इच्छूनच केला असेल. ”
नाइक, भोंसले वगेरे मंडळी त्या दरबारांत हजर होतीच. त्यांची कारवाई त्यांच्याच मनाला खात होती. ते मनांत ओळखून चुकले होते कीं शिमगा
सातार््याविषयीं आणखी थोडें ७३
>>*./९.०./४५५./५/०५/५/५./५४-/५/५./४१./१ /४९ ४.८१ /१ ४४५ ४४.१४ ४४४४११ ४४-४१-४४४४-०/४€४/१ १ २८९०४९. .४% »४५.५४. ४४४८-१४-४१ 0४८१४१ २.१९. 0 09 ह$
जातो आणि कवित्व राहतें त्याभ्रमाणें पेशवाई आपल्या हातची गेली आणि आतां नानासाहेबांना आपण केलेल्या विरोधाचे कवित्व तेवढे शिल्लक राह- णार. आजवर नानासाहेब ही एक उपेक्षणीय व्यक्ति आहे असे ते मानीत होते. परंतु इतक्या कारवाईतूनहि नानासाहेबांनीं घिम्मेपणानें मार्ग काढून पेशवाई संपादन केली या एकाच गोष्टीवरून त्यांच्या चारित्र्याची व कर्तबगारीची ओळख इतरांना पटण्यासारखी होती. आणखी असें कीं हें सर्पाचें पिल्ल मोठें झाल्यावर संधि साधून दावा धरून आपला कधीं चावा घेईल याविषयींहि विरोधी मंडळींना भरंवसा वाटत नव्हता. महाराजांनीं तरी त्यावेळीं सामोप- चाराचे जे उद्गार काढले ते “रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति' याच न्यायाने काढले. त्याबरोबर नाइक घाईने आपल्या बसल्या जागेवरून उठून महा- राजांना हात जोडून म्हणाळे, “ महाराज अगदीं आमच्या मनांतली गोष्ट बोलले. नानासाहेबांना पेशवाई मिळण्याच्या बाबतींत मीं व भोसले यांनीं विरोध केला असें जगाला दिसलें खरें. पण त्याच्या मुळाशीं कोणती भावना होती हें सहजासहजीं कोणाला कळणें शक्य नाहीं. नानासाहेबांना पेशवाईचीं वस्त्रें मिळू नयेत असाच केवळ आमचा हेतु नव्हता. राज्याची आबादानी तर आमच्या ध्यानीं होतीच. पण त्यापेक्षांहि महत्त्वाची अशी एक भीति आम्हांला होती ती ही कीं साऱ्या कारभारी मंडळींत पेशव्यांच्या विरुद्ध जें काहुर उठलें होतें व जें अजनही आहे त्याचा निरास करून देण्याचें काम आमच्यासारख्यां- शिवाय दुसर्या कोणाच्या हातून आणि तेंहि असे डावपेच लढविल्याशिवाय तडीला जाणें शक्यच नव्हते. ” आपण कितीहि बोललों तरी ऐनवेळी कर्जे परत मागून पेशव्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न जो आपण केला त्याचें समर्थन होणें शक्य नाहीं हें मनांत पक्के माहीत असतांहि फाजील आज्ा- वादित्वाला बळी पडून ते पुढें म्हणाले, “ आम्ही पेशव्यापाशीं ऐनवेळी कर्जाची मागणी केली ती तरी पेशव्यांचे आणि आमचें एकमत नाहीं असं पेशव्यांच्या विरोधकांना भासवून त्यांच्या पोटांतील काळेबेरें काढून घेण्यासाठींच होय. आणखी असें को नवीन पेशवा गादीवर आल्याक्षणापासूनच कर्जबाजारी असावा ही गोष्ट जितकी पेशव्यांना लांछनास्पद आहे, त्यापेक्षांहि त्यांचे निरंतरचे हितकर्ते या नात्यानें मलाहि लांछनास्पदच आहे.
नाइकांची चर्पटपंजरी अक्लीच आणखीही कांहीं वेळ चालूं शकली असती?
७४ पेशवाईचें मन्वंतर परंतु इतर दरबारी लोकांना ती ऐकावयाला नको आहे असें अंदाजून त्यांनीं स्वत:च आपले भाषण आवरतें घेतलें. लगेच भोंसल्यांनींहि उठन आपल्या परीने आपल्या उपदृव्यापांचें लंगडें समर्थन केलें. परंतु त्याचाहि कोणाचे मनावर फारसा परिणाम झाल्याचें आढळून आलें नाहीं. नानासाहेब लगेच उठून महाराजांच्या उद््गारांवर उत्तरादाखल बोलले, “ महाराजांनीं अत्यं कुपाळू होऊन माझ्या वाडवडिलांचें पेशवाईपद मजकडेच चालविलें याबद्दल भी महाराजांचा जन्मोजन्मी कणी आहें. मला या अधिकारप्राप्तींत व्यक्तिश:वेगण्य वाटत असेल तर तें एवढेंच कों वंशपरंपरेने ही पेक्वाई माझ्याकडे येत आहे, त्यापेक्षां मला अगोदर राजवटीची सेवा करण्याची संधि मिळन त्या पराक्रमाच्या जोरावर जर मला हें यश संपादन करतां आलें असतें तर मी स्वत:ला आजच्या पेक्षांही धन्य समजलों असतों. ” नानासाहेबांचें पुरतेपणी बोलून झाले नाहीं तरीही खाई त्याला खवखवे या न्यायानें नाईक आणि भोंसले यांच्याच्यानें स्वस्थ राहवेना. ते एक- सेकांच्या कालांशीं लागून कांहींतरी पुटपुटळे आणि लगेच नाईक आपल्या बंठकीवरून उठून नम्रतापुर्वक महाराजांना म्हणाळे, “ हीच आमचीदेखील छच्छा होती. पेशवाईपद मला किवा भोंसल्यांना कोणालाहि प्राप्त झालें असतें तरी तें पेशव्यांच्या वतीनें तारण म्हणनच आम्हीं रक्षण करणार होतों स्पग पेशव्यांनीं आतां इच्छिल्याप्रमाणें स्वत: पराक्रम गाजवून तें पद संपादन वेले असतें तर त्यांच्या शत्रूलाहि त्यांच्याविरुद्ध तोंडांतून ब्र काढण्याला अवसर इिळाला नसता. ” नाइकांना पुरतेपगानें बोलूं न देतां महाराज मध्येंच म्हणाले, “ नाना- साहेबांच्या क्तेबगारीची ओळख आम्हांला पूर्ण आहे. म्हणूनच आम्हीं न्होणाच्या विरोधाला न जुमानतां त्यांना पेशवे नेमलें आहे. नानासाहेबांना दुधांत साखर पडावी त्याप्रमाणें महाराजांच्या आतांच्या उद्गारांनीं पूर्वीच्याहन जास्त आनंद झाला. आणि तो त्यांनीं यथोचित राब्दांत व्यक््तहि केला. याविषयीं त्या बेठकींत कोणाला विदोष आढचर्य वाटलें असेल तर तें कोल्हापूरकर संभाजी राजांना. त्यांना हेंच कळेना कीं सा माणसाला परमेश्वरानें दोन अंत:करणें दिलीं आहेत कीं कसें? कींयाचे व्हाखवावयाचे दांत निराळे आणि खावयाचे निराळे आहेत ? त्यांना भय
क य ची 4४ “7 “५ “0५ “0७ “१ /700. ८१५ ०७ “१ “४५-९६ - ५ “६.
सातार््याविषयीं आणखी थोडें ७५ गाटत होतें याचें कारण नुकतेंच नानासाहेबांनी त्यांच्याशीं परस्पर गुप्त शोस्तीचा तह केला होता, ब त्या तहांत आपण यावज्जन्म सेवक स्वामींचे (संभाजी महाराजांचे) असून वरपांगी आपणाला शाहू महाराजांची सेवा करणें प्राप्त आहे, असे म्हटलें होते. या उद्गारावर विश्वास ठेवूं जावें तर नानासाहेबांचें आतांचें आचरण त्या उद्गारांशीं पूर्णपणें विसंगत होतें. तरी पण त्यांतल्यात्यांत संभाजीराजांना जिवाचा विरंगुळा करतां आला तो एव- ढाच कीं, नानासाहेबांनी आपल्याशीं केलेल्या कारारनाम्यांत शाह महाराजांशी स्वतःची वागणूक केवळ वरपांगीयणाची राहील असें जं म्हटलें आहे त्याचेच प्रतिबिंब हें त्यांचें वतेन नसेल कशावरून ! नानासाहेबांनी कांहीं महित्यां- पुर्वी राजकारणांत पुढाकार घेऊन थोरल्या बाजीराव साहेबांना-प्रत्यक्ष आपल्या पित्याला घरगुती भांडणांत कसें धाय मोकलून रडावयाला लावले, आणि त्या महापुरुषाला आपल्या पुत्राच्या कारस्थानासमोर हार जाऊन कसें परागंदा व्हावें लागलें, ही गोष्ट तेव्हां जगजाहीर होऊन चुकली होती. थोरामोठ्यांच्या घरच्या गोष्टी म्हणन लोक उघडपणे नानासाहेबांची चूक बोलून दाखविण्याला धजत नसत. पण मनांत ते ओळखून होते कीं हें सर्पाचें पिल्ल आहे; व्यव्ति सामान्य नाहीं. ते प्रतिस्पर्ध्यापेकीं कोणाचा कधीं व कसा निकाल करतील याचा कांहीं नेम नाहीं. प्रत्यक्ष पित्याविषयीं जर नानासाहेबांची वर्तणूक अशी, तर राजाला ते काय जमानणार, हें संभाजी महाराज ओळखून होते. तरी पण त्यांना असेंहि वाटत होतें कीं पेशव्यांनी आपल्याशीं जो गुप्त तह॒ केला आहे, व त्या तहान्वयें सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही गाद्यांचे एकीकरण करून त्याची मालकी छत्रपति बा नात्यानें आपणाकडे देण्याचें जें गभितपणें सूचित केलें आहे, त्यांत त्यांचा स्वतःचा स्वार्थ एवढा मोठा जबरदस्त आहे कीं त्याच्या सिद्धीसाठीं तरी त्यांना आपल्याशी इमान राखलेंच पाहिजे. नानासाहेबांना सातारा, कोल्हापूर ह्या संयुक्त मराठी सास्रा- ज्याचा सर्वाधिकारी पेशवा बनावयाचें आहे, व तेवढ्यासाठी आपल्या मार्गातील शाहू महाराज ही बोलतीबालती प्रचंड धोंड युक्तीने बाजूला लोटून देण्याला ते कमी करणार नाहींत, एवढा संभाजीराजांनी त्या करार- नाम्याचा निष्कर्ष काढला होता. या मनोमनच्या विचारांनीं त्यांचे त्याच क्षणीं परस्पर समाधान झालें; आणि कांहीं कितु उरला असल्यास तो नाना-
भल
७६ पेशवाईचे मन्वंतर
"/१४-४ ५४४४१. ४४-१९ ५-/४१-४ ४८७ ५४.०४. ९.४. २११, /_/./ ९.९.” २. १.०५, ९.५४ * “२.८५ ४.४ / ४.८”५../१७_.%,”४ ८7%, ७५ ५.१९ ./४./”५..” १-४ १.०७५.८ १.१४ ४१../११ / १० ७.
“७
साहेबांची त्यांच्याशीं दृष्टादृष्ट होतांच दूर झाला. नजरेला नजर भिडली आणि मुके बोल बोलून गेली कों, हा सारा घेतल्या सोंगाचा साजरेपणा आहे. संभाजी राजे तें सारें नानासाहेबांच्या चर्येवरून ओळखून चुकले व त्यांनीं तसें समाधानपूर्वक आपल्या दृष्टिक्षेपार्ने नानासाहेबांना भासविलेंहि !
पेशवाईपद कोणाला द्यावयाचें या निमित्ताने सातारा राजधानींत उठलेले वादळ अश्या रीतीनें श्यांत झालें व आपापल्या डावपेंचांत पराभूत झालेल्या प्रतिस्पर्थ्यांना-विशेषतः नाईक आणि भोंसळे यांना आतां तेथें राहण्यांत स्वारस्य वाटेनासे झाळें. त्यांतूनहि ती मंडळी दुधाच्या हंड्यांत मिठाचा खडा टाकून आपल्या वेयक्तिक हट्टासाठीं राष्ट्राचा कार्यना्य करण्याला मिणारी नव्हती. किंबहुना तसे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. परंतु आणखी एका विचित्र योगायोगामुळें आपोआपच त्यांच्या कृष्णकारस्थानाच्या चालत्या गाड्याला. खीळ पडली. त्या विचित्र योगायोगाचें स्पष्टीकरण पुढें होणार आहेच.
शरकरण १० वें दोन अभागिनी
मनातली राणी त्या बरखेवाल्या व्यक्तीला पाहन एकदम दचकून 'भय- चकित अन्तःकरणाने त्या कोठडीच्या एका कोपऱयांत अत्यंत सावधपणातें
उभी राहिली व तिनें खदिरांगाराप्रमाणें लाल झालेल्या दृष्टीनें समोर पहात त्या व्यक्तीला कठोर प्रश्न केला, कोणतं? ”
ती बुरखेवाली व्यक्ति कांहीं न बोलतां स्तब्धपणें क्षणभर तशीच उभी राहिली. तें पाहून जास्त संशय आल्यामुळेंच कीं काय त्या व्यक्तीवर झडप घालण्याच्या हेतूलें मीनाक्षी राणीनें दोन पावलें पुढें सरून पूर्वीपेक्षांहि कठोर स्वरांत पुन्हां विचारलें, “ कोण तूं ? बोलत कां नाहींस ? तुझी ही स्तन्घ- ताच तुझ्या पापी अन्तःकरणांतील दुविचारांची साक्ष देत आहे. ”
ती बरखेवाली व्यक्ति न डगमगतां पवित्र्यावर उभी राहून निस्पृहपणे उद्- गारली, “ अभागी राणी, ज्याला त्याला आपल्यासारखेंच सारें जग दिसतें पण तं एवढें ध्यानीं ठेवलें पाहिजेस कीं ह्या त्रिचनापल्लीची एक राणी कपाळ- करंटी निघाली, तिनें आपल्या बद्चालीर्ने आपल्या राज्याचा सत्यानाश केला आणि विषयवासनेला बळी पडन हिंदुत्वविध्वंसक अविधाचीं पदलांछ्ने या मातभमीच्या मस्तकीं उमटविलीं म्हणून या राज्यांतील प्रत्येक स्वा तशीच स्वाभिमानशन्य आणि पशवत्तीची आहे असें तुला समजण्याचे कारण
नाहीं. ” त्या व्यक्तीला आणखीहि कांहीं बोलावयाचे होतें. परंतु संतापा-
तिरेकानें तिचा कंठ दाटून आल्यामुळें ती एकाएकीं स्तब्ध राहिली.
तारतम्यज्ञानानें मीनाक्षी राणीने ओळखलें कौं आपणासमोरील बुरखे- वाली व्यक्ति स्त्री आहे. तेवढ्यानेंच अंमळ तिच्या मनाचा विरंगुळा झाला आतां त्या बरखेवाल्या स्त्रीचे ते बोळ अत्यंत अपमानकारक होते हें तर खरेंच व ते ऐकन सामान्य परिस्थितींत कोणालाहि चीडच आली असती. मग प्रत्यक्ष मीनाक्षी राणीला चीड आली असल्यास नवल नाहीं. तरी पण
७9८ पेशवाईचे मन्बेतर सत्याचे तेज आणि सामर्थ्य हें कधींहि असत्याच्या काळवंडलेल्या छायेखालीं सांकळें जात तसतें. मीनाक्षी राणीतें त्या व्यक्तीच्या उदगारावरून एवढं ओळखले कीं ती स्त्री असादी; आणि म्हणनच तिच्या उद्गाराचें राणीला वेषम्य वाठावयाचें बाजूला राहुन उलट कौतुक वाटलें. एवढं मात्र खरे कीं राणीचे अंतःकरण पशचात्तापाच्या प्रायश्चितानें पावन क्ाल्यामुळेंच विश्वां- तील सत्य, शिव आणि संदर कोणतें हें ओळखण्याइतकी मागसकी तिच्या ठायीं उत्पन्न झाली होती. ती गंभीर स्वरातें त्या स्त्रीला म्हणाली, “ बाई तुम्ही कोणीहि असा. पण तुमचे आत्मविश्वासाचे बोळ एंकून माझ्या मनाला अत्यंत संतोष बाटला कों अशी एक तरी पुण्यशील स्त्री माझ्या राज्यांत आहे आणि तिच्या पुण्याईच्या बळादरच माझ्या पापांच्या परवडी नाहीशा होऊन माझ्या देशाला आणि माझ्या धर्माला कांहीं बरे दिवस येण्याची आश्या आहे. ” राणीच्या मनांतून त्या ब्रखेवाल्या स्त्रीशी पुढे बोलावयाचें होते. पण एक धाव दोन तुकडे करावेत त्याप्रमाणे ती स्त्री मध्येंच वीज कडाडल्या- प्रमाणें उद्गारली, “ तुझा देश आणि तुझा धर्म-अभागी राणी, आपलें जीवनसर्वेस्व तृ त्या राक्षसी अविधाच्या पायीं अर्पण करून आपल्या राज्याला, पावित्र्यापरी पावित्र्याला, लौोकिकापरी लौकिकाला, धर्मापरी धर्माला आणि अब्रूपरी अब्रूला-सर्वेस्वाला गमावून बसली आहेस. तुझ्यासारख्या पापि- णीला देवाधर्माचा उच्चार करण्याचा तरी काय अधिकार पोंचतो ? इतकेंच काय पण तू जरी बाह्यात्कारी पश्चात्तापाचे बोळ बोलून दाखविलेस तरी या क्षणीं तुझ्या अन्तःकरणांत आपल्या देशाचें व आपल्या धरमरचिं वाटोळे करण्याचा घातकी विचार ठाणें देऊन बसला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ”
“ त्याला इश्वर साक्ष आहे. ”
ईरवर कशाला? त्याला तुझे अन्तःकरण साक्ष आहे. विश्वासघातकी स्त्रिये, आतांच कांहीं प्रहरांपूर्वी तू आपल्या राज्याच्या,-आपल्या धर्माच्या मानेला नवा फांस लावला नाहींस काय ? यच ती स्त्री क्षणभर गप्प राहून राणीच्या मुखाकडे पाहुं लागली. राणी त्यावर कांहीं बोलेना, तेव्हां लगेच ती व्यक्ति पुन्हां म्हणाली, “ आतां बोलावयाला तुला लाज कां वाटते ? बोल, थोड्या वेळापूर्वी तूंच मुरारराव घोरपड्यांना गोत्यांत आणून मराठ्यांच्या ह्या प्रांतांतील स्वराज्यविषयक दीर्षोद्योगाचा फडशा करण्याच्या कामीं
दोन अभागिनी ७९ त्या नीच चंदासाहेबाला सामील झाली नाहींस काय? बोल-मला या क्षणीं ह्या प्रश्नाचें उत्तर पाहिजे आहे. तं विचारशील कीं ह्या आगळकोबद्दल भला जाब विचारणारी तं कोण ?-तर मी आतांच सांगून ठेवते, ज्या ज्या ठिकाणीं मानवांनी निर्माण केलेले कायदे हे परमेश्वरी सत्याच्या शाश्वतीला बाघ आणूं पाहतात आणि सृष्टीवर परोपरीच्या हिडीस पापांची परवड रचू लाग- तात त्या त्या वेळीं सत्याचा जय करून मानव जातीला शक्य तों सुखांत लोट- ण्यासाठीं-मानवी अत्याचारांना आळा घालण्यासाठीं स्वयंस्फूर्तीने पुढें येणें हें प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाचे पवित्र कर्तव्य असतें. तें कर्तव्य बजावण्या- साठीं पुढें आलेली मी एक ह्या अभागी देशाची नम्बर सेविका आहे. तुला कदाचित् वाटेल कीं चंदासाहेबाचा या चत्रिचनापल्लींत एवढा जंबरदस्त दंरारा असतांना आणि हिंदूंना एक रेंसभरहि डोकें दर काढावयाला या वेबंदशाहींत वाव नसतांना चंदासाहेबाच्या अधिकाराला लाथाडून इतक्या निघड्या छातीनें मी पुढें कशी येतें ? मला शासनाचे भय कर्से वाटत नाहीं ? तर त्याचें उत्तर मीं आधींच देऊन ठेवत्ये, अभागी स्त्रिये, एवढा चवदा चव- कड्यांच्या राज्याचा धनी रावण पण तो सत्याला लाथाडून सत्तेच्या जोरावर अनन्वित अत्याचार करूं लागला आणि प्रत्येक जीवाला त्याच्या अत्याचारा- सुळें दे माय धरणी ठाय होऊन गेलें; त्यादेळीं त्याचा नाश करण्यासाठीं परमे- शवरानें यःकश्चित् वानरांच्या बाहूंमध्येंही वज्जदेही वीराग्रणींचें सामथ्ये उत्पन्न केलें, आणि श्रीरामांनी त्या सामर्थ्याच्या जोरावर सत्याच्या मार्गानें त्या रावणाला धुळीला मिळवून देशाचें दास्य ल्याला नेलें. पुराणांतरीं अक्षया मदांध राजांचा शोककारक दोवट झाल्याचीं ढळढळींत उदाहरणें अस- तांना मला त्याच सत्याच्या मार्गानें जातांना भय कोणाचें ? ” बोलतां बोलतां त्या वुरखेवाल्या स्त्रीने आपला बुरखा बाजूला सारून आपल्या कमरपट्ट्यांतील जंबिया सरैकन् बाहेर काढीत राणीला विचारलें, “ पण त्या अवांतर गोष्टी बोलण्याची ही वेळ नव्हे. मीं आतां विचारलें त्याचा मला या क्षणीं स्पष्ट खुलासा पाहिजे आहे.
“ तुम्हाला कसला खुलासा पाहिजे आहे ? ” राणीनें त्या स्त्रीच्या चेहर््या- कडे दिरखून पहात भयभीत चित्ताने विचारलें. ती एक सुमारें अठरा वर्षांची गौरवर्ण व निताम्तसुंदर अश्ली युवति होती. तिच्या लावण्यानें राणीदेखील
८० ._ पेशवाईचे मन्वंतर
नट .»५०”१% “0 ४.“ '< "०-५ “१५% क्क 20 27%... “0१-१७ ८१.११ »/४ १6% 7 >” “९ २. ८१७ “७ नः ५.८१ /१४७/१५-४७ १00५८५ ११०४१४॥ दे "२
क्षणभर स्तिमित ज्ञाली. मग तें लावण्य अन्य ठाय़ीं पुरुषी जगांत अत्यंत प्रभावशाली ठरत असेल यांत नवल काय? त्या युवतीच्या ललाटाकडं राणीनें सहज पण लक्षपूर्ण न्याहाळून पाहिलें तेव्हां तेथें कुंकुमतिळक झळकत असलेला तिला स्पष्ट दिसून आला. तो पाहून राणी पुढें म्हणाली, “ मुली, त हिंदू आहेस; मग तुला अज्ञा वेळीं ह्या धोक्याच्या जागीं येण्याची वासना कां बरें झाली?
“ माझ्या देशाच्या आणि धर्माच्या कल्याणासाठी, त्याप्रमाणेच माझ्या देशाच्या आणि धर्माच्या शात्रर्चे निर्दालन करण्यासाठीं पुढे पाऊल टाकतांना मला साक्षात् कळिकाळाचेंहि भय वाटत नाहीं.
“ मली, तुला चंदासाहेबाच्या राक्षसी स्वभावाची कल्पना नाहीं म्हणून तं निर्भयपणें असें बोलं शकतेस. पण प्रत्यक्ष माझें उदाहरण पहा ! स्वतःच्या चारित्र्यावर विसंबन राहणारी व बड्धिबळाच्या पटावरील मोहऱ्यांप्रमार्णे दूर देशच्या राजकारणी पुरुषांना खेळविण्याची ईर्षा बाळगणारी, ही या त्रिचनापल्लीची अभागी मीनाक्षी राणी त्या चांडाळाच्या मोहपाशयांत सांप- डत फंसून कशी बापुडवाणी बनली आहे पहा! ”
ती यवति इतक्या वेळांत मीनाक्षीराणीच्या सौजन्यपूर्णे वर्तेनानें जरा समाधान पावन किचित् बहुमानपूर्वेक उद्गारली, “ पण राणीसाहेब, मीं मधघाशींच आपल्याला सांगितलें ना; कीं ह्या देशांतील सर्वेच स्त्रिया राणी मीनाक्षीसारख्या दुबळ्या अन्तःकरणाच्या नाहींत. कदाचित् असाहि योगा- योग असेल कीं आपल्यासारख्या भल्या साध्वीला ज्या चंदासाहेबार्ते विश्वास- घातानें फंसवून स्वतःचा डाव साधला, त्याला त्याच्या पापार्चे प्रायश्चित्त देण्यासाठींच परमेदवरानें मला जन्माला घातलें नसेल कशाकरून ? ”
“< तसें असेल तर मी म्हणेन कीं जगामध्ये अजून परमेश्वर आहे, व सुष्टांचें पालन आणि दृष्टांचें निर्दालन करून सृष्टीर्चे यथान्याय नियंत्रण करण्याचें सामर्थ्यं अजून त्याच्या अंगीं आहे.
त्या तरुणीचें अंतःकरण राणीच्या ह्या उद्गारांमुळे आणखी द्रवलें. तिनें आपला जंबियाचा हात किचित् मार्गे घेतला. तिचा संतापहि थोडा ओसरला आणि कंठ सहानुभूतीच्या गद्गद् भावनेने दाटून आला. त्यामुळे ती अम्मळ घोगऱ्या स्वरानें राणीला म्हणाली, “ राणीसाहेब, मी ज्या कठोर निश्चयानें
"दोन अभागिनी ८१
४५.४१... /€% /00.//
"१५-५४. %७./४४./४४../ ४५/४४/१५४७. “४.” ११.४
१-१ ४१%, १ ४७, ५१७./०७ 0७ “0७.४ २.४७ ४0 ४७५ ९९.०४. “१९४७ ४१%, ४१४७७७७९९७. ४०७९५४ “४0.४७ ७४ ४७/७९ ४0८ ३.
या ठिकाणीं आलें तो माझा निश्चय प्रत्यक्ष तुम्हांला पाहुन आणि तुमचे कळकळीचे बोल ऐकून बराच पालटला आहे. पण ईश्वर करितो तें बर््या- साठींच असा माझा त्याचे ठायीं पूर्ण भरंवसा असल्यामुळें या निश्चयाच्या पालटण्यामध्येंहि कांहीं मंगळ अशी घटना निर्माण करण्याचें त्या परमेश्वराचे मनांत असेल असेंच आपण घरून चालूं. आतां आपण मला पूर्वीइतक्या परकी वाटत नाहीं. त्याअर्थी मला माझी ओळख देण्याला कांहींच हरकत नाहीं. एका दृष्टीने आपण आणि मी सारख्याच अभागी आहोंत. ”
इतक्यांत रामस्वामी घाईघाईने दरवाजा उघडून आंत डोकावून म्हणाला, “ बाईसाहेब, किती वेळ हा ! पहांटेची वेळ होत आली. तुरुंगावरील पाहरा बदलण्याची वेळ झाली. आपण कोणाला न कळत इकडे आलला आहांत हें विसरतां कामा नये! न जागो आधींच आपले ग्रह सध्यां वाईटा आहेत; आपण इकडे आल्याची व मीं, आपणाला या कोठडीचा दरवाज मोकळा करून दिल्याची नुसती चाहूल कोणाला लागली तरी राईचा पवेत होऊन अनर्थ व्हावयाचा !' लोकर आटोपा- ”
“ खरेंच; बोलण्याच्या भरांत वेळ केव्हां निघून गेला हेंच मला समजलें बाही. आणि मी मुख्यतः ज्या कामासाठीं आलें तें काम तर तसेंच राहून गेलें आहे. राणीसाहेब, आतां आपण मुकाट्याने याच पावलीं माझ्या मागो- माग चला. शत्रूच्या दृष्टीआड झाल्यावर आपणाला मनमुराद बोलतां येईल.”
“ पृण आपणाला आतां कोठे जावयाचे? ”
“ परमेश्वर रस्ता दाखवील तिकडे जावयाचें. सदिच्छा आपल्या अन्तः- करणांत आहे, परशचात्तापाची नवी पुण्याई आपण जोडली आहे आणि सत्या- चरण हा आपला मार्गदर्शक आहे; यापेक्षां आपणाला आणखी कोणाचें साहाय्य पाहिजे ?; आपण मुकाट्याने माझे मागोमाग चला. ”
प्रकरण १९ वें बंधमुक्त
स्य क्तप्याता कन
"्हू| णी तें ऐकून क्षणभर स्तब्ध राहिली. तिला त्या तरुणीच्या मनांतल्या
योजनेची कांहींच कल्पना करतां येईना. उलट ही बातमी जर चंदासाहेबाला कळली तर तो आणखी काय काय अनर्थ घडवून आणील या भीतीच्या दडपणा- खालीं त्या बिचारीच्या अंतःकरणाचा अगदीं चक्काचूर होत होता. त्या तरुणीच्या सद्भावनेविषयीं तिळा जरी यत्किचित शंका नव्हती, तरी ती. तरुणी केव्हां कशी फंसेल याविषयीं तिला भरंवसा वाटत नव्हता. त्या तरुणीनें राणीच्या अंतःकरणांतील हो कालवाकालव अंदाजाने ओळखली थाणि म्हटलें, “ राणीसाहेब, आपण कृपा करून एवढेंच करा; माझ्यावर आणि परमेद्वरावर पूर्ण भडीभार घालून ह्या पावलीं माझ्याबरोबर बाहेर चला. आपल्या मातृभूमीवर व आपल्या धर्मावर कोसळणारें संकट कसें टाळावें या विषयींची उपाययोजना मीं माझ्या मनाशीं या पूर्वीच ठरविली आहे. मात्र तिची सुलभ रीतीनें अम्मलबजावणी होण्यासाठीं मला आपल्या साहाय्याची अत्यंत आवशयकता आहे. ”
आपण इतकी कानींकपाळीं ओरड्न समजत घातली तरीहि राणीसाहेब बाहेर पडावयाला धजत नाहींत असें पाहून मात्र ती तरुणी संतापली आणि त्या मरांत आपला जंबिया राणीवर रोखून कळवळ्यानें उद्गारली, ” राणी- साहेब, अजूनहि माझ्या शब्दावर तुमचा विश्वास बसत नाहीं, तर मग आपण भाझ्या शत्रू आहांत असें मानून मला माझ्या ध्येयाच्या मार्गाने जातांना प्रथम हा आपला कांटा वाटेतून दूर करावा लागेल! ”
राणी सोम्यपणानें म्हणाली, “ मुली, तुझ्या इतर्के अलौकिक धेय माझ्या अंगीं नसलें तरी तूं ज्याला भितेस तसला अप्रामाणिकपणा मात्र माझ्या अंगीं मुळींच नाहीं. भो त्या; नरपशूला-ज्यानें माझ्या सर्वस्वाचें वाटोळे करून: मला धुळीला मिळवले त्या' चांडाळाला अजूनहि वश्य असेल असें तुला वाटतें काय ? तर लक्षांत ठेव, ही राणी अधोगतीच्या गर्तेत कितीही खोल गाडली
बंधमक््त ८२
येळी असली तरी ती हाडामांसानें हिंदू आहे. तिच्या नसानसांतून अद्यापिहि बहिदुधर्माचा अभिमान सळसळत आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळें मी फंसून दुबळी झाल्यें असल्यानें स्वाभिमानाचे बोळ बोलणार्या माझ्या वाणीमध्यें सामर्थ्य उरलें नसळें तरी माझी इच्छादक्ति कांहीं अजून मेलेली नाहीं. इतकेंच काय पण आजवरच्या कट् अनुभवाने त्या इच्छाशक्तीच्या-त्या स्वाभि- मानाच्या-त्या धर्माभिमानाच्या तरवारींना नवें पोलादी पःणी मिळालें आहे. ईरवराची कृपा होऊन मी यावेळीं मोकळी असतें तर अळौकिक गोष्टी करून मीं माझ्या पापाचे परिमाजेन केलें असतें, आणि माझ्या मायदेश्याचे पांग 'फेडले असते. पण आज परमेश्वर माझ्यावर कोपला आहे. मुठींत सोनें घरले तरी त्याची माती होईळ इतकें माझें दुर्देव आज बलवत्तर झालें आहे. ने जाणो, कदाचित् सी तुझ्याबरोबर आलें तर माझ्या पापाग्दीची झळ तुला रछागून तुझ्याहि घ्येयसाधनांचा सत्यनाश होईल, म्हणून म्हणतें, मुली, तुझ्या धर्मासाठी, तुझ्या देशासाठी आणि इच्छा असेल तर या अभागी राणीसाठीं छे जे काय करावयादें असेल तें तें तू खुशाल कर. तुला माझा पूर्ण आशीर्वाद आहे. मी शरीरानें नाहीं तरी मनानें तुझी पाठीराखीण, तुझ्या पाठीमरगें उभी आहे. ” राणीच्याने पुढे बोलवेना. तिचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांत आंसवे उभीं राहिलीं. शोकाचा कड तिला आवरेनासा झाला. 'ती पदरानें तोंड झांकून घेऊन एका कोपऱ्यांत डोकें खुपसून स्फुंदून रड लागली. 'ती तरुणी तो प्रकार पाहून भगदीं किकतेव्यमूढ होऊन गेली. तिच्याच्यानेंहि कांहीं बोलवेना.
इतक्यांत रामस्वासीनें पुन्हा एकवार किलकिल्या दरवाजांतून आंत डोका- चून पहातां पहातां भीतिदायक कांपर्या स्वराने विचारलें, “ बाईसाहेब, आपली इच्छा तरी काय आहे? आपल्या आणि माझ्या मानेला आपण एक- दमच तांत लावणार आहांत काय ? हे पहा पहारेकरी बदलले देखील. आतां इतक्यांत केद्यांची तपासणी सुरू होईल आणि जर का हा प्रकार उघडकीला आला तर आपणां तिघांचाही सत्यनाश ज्ञाला असें समजा. मनुष्याची इच्छा नुसती पवित्र आणि बलवत्तर असून यशाची जोड मिळवितां येत नाहीं; त्याला तारतम्य आणि प्रसंगावधान यांची जोड अवश्य पाहिजे असते. सारा- सार विचार न करतां दिव्यावर उडी घालणार्या पतंगाप्रमाणें आपण उज्वल
८9 पेशवाईचें मन्वंतर
१३.2 /€./”१७. १७ / 00९ » ४. “00७. ४09 . 0: .»०१ ५ /५ ,४% .७७ ३ - ५९. 000 “0 पी. च जि “*%”/१% ४७ ८0५ /% *४..४४% /00 १ “0७ /%, ७ »रर १ /४- ८५ “७ ८१५, १ /०१६, 7 >”. “१.७ /"
स्वाभिमानाच्या कथानिरुपणांत हा कसला अविचार मांडला आहे? प्रथम बाहेर पडा, मी दाखवितों त्या गुप्त मार्गानें निर्भय स्थळीं चला आणि मग काय करावयाचें तें करा किवा बोलावयाचें तें बोला. ”
रामस्वामीचे ते कळवळ्याचे बोल मात्रेच्या वळशाममाणें लागू पडले. आपला हा पुरातनचा सेवक चंदासाहेबाला फितूर झाल्यामुळेच तर एथे अशी लाजिरवाणी नोकरी करीत नसेल ना; असा तिला जो पुसट पुसट संशय' होता तोदेखील आतां निःशेष झाला. त्या तरुणीचा रामस्वामीच्या ठायी पूर्ण विश्वास होता हें तर सांगावयालाच नको. एरव्हीं तिला त्यानें अया अपरात्री, आज तीन वर्षांत ज्या मीनाक्षी राणीला बाहेरील निर्जीव जगाचे ओझरतें दर्शन घेण्याळाही चंदासाहेबानें पुर्ण प्रतिबंध केला होता त्याच राज- बंदी राणीची भेंट त्या तरुणीला कशी घेऊं दिली असती ! आणि त्या तरु- णीला तरी आपला जीव थोडाच भारी झाला होता! ती रामस्वामीवर प्णे विश्वास असल्याशिवाय अज्या वेळीं त्या बंदिशाळेंत येणाऱ्या निमित्ताने काळाच्या जबड्यांत चाठून जाईल !
तरीही मीनाक्षी राणीनें पुन्हां एकवार मनाची खात्री करून घेण्यासाठीं रामस्वामीला विचारलें, “ रामस्वामी, तूं अजूनही पुर्वीप्रमाणेंच माझा विश्वासू सेवक आहेस काय? ”
रामस्वामी गंभीर स्वरानें उद्गारला, “ राणीसाहेब, पापाची पुटे माण- साच्या मनावर बसलीं कीं त्याच्या मनींमानसीं विश्वासाची दुनिया नाहींशी होते. स्वामिभक्तीची दिव्य ज्योत ह्या रामस्वामीच्या अंतःकरणांत जर अहनिश तेवत नसती तर अद्या लाजिरवाण्या परिस्थितींतून तरणोपायाचा मार्गे शोधून काढण्यासाठी अविधांचें दास्य पत्करण्याची त्याला कांहींच गरज नव्ह्ती. यावरून आपण काय तें समजा आणि बाईसाहेबांच्या शब्दावर विश्वासून मुकाट्याने अगोदर पाय बाहेर काढा.”
“ एकूण ह्या तरुणीवर देखील तुझा पुर्ण विश्वास आहे म्हणावयाचा ! ” राणीनें पुन्हां विचारलें. रामस्वामीनें तोंडानें त्या प्रश्नाचें उत्तर मुळींच दिलें नाहीं; तरीही त्याच्या चर्येवरील समाधानवृत्तींत राणीला काय उत्तर मिळावयारचें तें मिळालें. आपणाला जिचें नांवगांवसुद्धा माहीत नाहीं अद्या एका अज्ञात स्त्रीबरोबर आपण निघून जाण्याचें धाडस केलें तर तें आपणाला
बंधमक््त टप
0२.५१.” ७४
'१.५४%०४४४.०/ ५,०७९...
दी डी डी
'नव्या संकटाच्या गर्तेत लोटावयाला कारण होईल कीं काय, या भयानें ती हा वेळपर्यंत आढेवेढे घेत होती. पण आतां तिनें मनाचा निर्धार केला व त्या तरुणीला आणि रामस्वामीला म्हटलें, “ इतकें ज्याअर्थी तुम्ही दोघेही आग्र- हाचे सागत आहां, त्याअर्थी तुमच्या शब्दावर मला विश्वास ठेवलाच पाहिजे, 'न जाणो, परमेश्वराच्या मनांतून मला पुन्हां साह्याचा हात द्यावयाचा असेल स्तो तुम्हां दोघांच्या मुखीं उभा राहुन मला तारण्यासाठीं पुढें आला असेल! त्याचा अव्हेर मीं तरी कां करूं! चला, ही मी तुमच्याबरोबर निघाले. ” असें म्हणून राणी मनांतून परमेश्वराची करुणा भाकून त्याच पावलीं त्या सर्णीसह कोठडीच्या बाहेर पडली “चला, माझ्या मागोमाग या. ” असंम्हणून रामस्वामी पुढें चाल लागला. ती पुढें व त्या दोघी त्याच्या मागाहून चालत असतां रामस्वामीनें मधन मधून माग वळून पहाण्याचा क्रम सुरूच ठेवला होता राणी मीनाक्षी आणि ती तरुणी यांता आतां जास्त बोलण्याला अवसरच नव्हता. कारण काळ त्यांच्यापुढे जबडा पसरून उभा होता. राणी निमट- पण त्या तरुणीला म्हणाली, “ चल बाहेर. ” पुन्हां ती क्षणभर गोंघळल्या- सारखी होऊन म्हणाली, “ पण भी आगींतून उठून फोफाट्यांत पडलें अशी 'तर माझी अवस्था तुझ्या संगतींत होणार नाहीं ना? ” “राणीसाहेब,पिशाच्चाला नेहमीं रामनामाचे भय वाटणें स्वाभाविक आहे. पण आपल्या मनाची ही चळबिचल आपल्या चित्ताच्या परिवर्तनाची साक्ष देत आहे. समजा, मीं विदवासघात केला तरी आपला आजवर झाला आहे यापेक्षां आणखी सत्यानाश काय होणार आहे? आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि मनाशीं असा तिर्धार करा कीं आजवरची ती. परोपरीचीं पापें पुजणारी मीनाक्षी राणी नामदेष झाली, आणि ही मीनाक्षी राणी नवा जन्म घेऊन, प्रभु श्रीरंगाला साक्षी ठेवून नवा अवतार घेऊं पहात आहे. ” यापेक्षां आणखी कांहींहि संभाषण करण्याच्या भराला न पडतां त्या दोघी दरवाजाच्या बाहेर पडल्या. राणीच्या मनांतून त्या तरुणीर्चे नांव तरी विचारून घ्यावयाचे होतें. परंतु अशा घाईच्या वेळीं तें विचारणें तिला अनुचित वाटलें. मात्र दरवाजाबाहेर येतांच तिने रामस्वामीला विचारलें रामस्वामि आतां तूं आम्हांला कोणत्या मार्गानें बाहेर काढून देणार ?”
८६ पेशवाईचे मन्वंतर
रामस्वामी त्या प्रश्नाचा अर्थ ओळखून चुकला. आपण योग्य रस्त्याने राणीला पाठवून देतों किवा नाहीं याविषयीं शंकित होऊनच राणीने हा प्रश्व विचारला असावा हें ओळखून तो म्ह्णाला, “ आईसाहेब, आपणाला आपल्या राजवटींतळा एकूण एक गुप्त मार्ग माहीत आहे हें मी जाणतों. परंतु त्या ग॒प्त मार्गापैकीं कोणता मार्ग आजच्या परिस्थितींत आपल्याला सुखकर आहे हें अजमावण्यासाठीं आपण माझ्या शब्दावर विसंबून राहिलें पाहिजे.” राणी किचित् खोंचक स्वरांत उद्गारली, “ सारी सृष्टि माझ्याविरुद्ध फिरली असतां आणि माजे सारे नोकर खाल्ल्याघरचे वांसे मोजणारे निमक- हराम निपजले असतां रामस्वामी, तृंच तेवढा एकटा प्रामाणिक कसा राहिला यारचें मळा आश्चर्य वाटतें. आजवर पूर्वीच्या नोकर चाकरांवर विद्वासून मी' अनेक वेळां फंसले आहें. त्याच आपत्तीची पुनरावृत्ति इथे होणार नाहीं ना?” ती तरुणी मध्येंच म्हणाली, “ राणीसाहेब, त्रिचनापल्लीच्या राणीने दानत्त सोडून सं्वेस्वाचें वाटोळे करण्याचा प्रसंग आणला असतांही आज त्रिचना- पल्लीच्या राज्यांतील प्रजेमध्यें स्वाभिमान, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान जीव धरून आहे, तो केवळ रामस्वामीसारख्या निमकहलाल नोकराच्या' पुण्याईवरच होय.” ती तशीच रामस्वामीकडे वळून म्हणाली, “ चला लवकर आम्हांला मार्गाला लावून द्या. ”
“ वला. ” असें म्हणून रामस्वामी घाईघाईलें कोठडीचा दरवाजा लावून त्या दोघींसह डाव्या बाजूच्या वाटेनें चालू लागला. वास्तविक त्याला उजव्या बाजूच्या वाटेने. जावयाचें होतें. परंतु त्या बाजूनें तुरुंगावरील' बदललेले पहारेकरी तपासणीकरतां जवळ जवळ येत असल्यामुळें त्याला विरुद्ध दिशेने जाणें भाग पडलें,
“ तृ मळा आतां कोणत्या वाटेनें नेणार ? ” राणीनें पुन्हा विचारलें.
रामस्वामी उत्तरला, “ येथून जवळच पलीकडच्या भितींतून भूयाराचा एक मार्ग थेट किल्ल्याच्या तटाबाहेर जाऊन पोंचतो. तो भापणाला माहीत आहे ना? ”
“ दोय. ” राणी उत्तरली
बँंधमक््त ८७
“ त्याच मार्गानें भापल्याला आतां जावयाचें आहे. ” रामस्वामी म्हणाला.
“ पण पुढें काय ?” राणीनें प्रश्च केला.
“ पुढची काळजी या क्षणीं काय म्हणून करतां? परमेश्वर आपला - साहयकर्ता. आहे. भगवंताच्या कृपेनें आपोआप आम्हांला पुढचा मार्गे दिसून येईल. ” तो तरुणी म्हणाली. आणखी थोड्या वेळानें रामस्वामी पुढें आणि त्या दोघी मार्गे अश्लीं तीं तिघेंहि त्या विवक्षित भुप्राराच्या तोंडापाशीं येऊत पोंचलीं तोंच तेथें मूतिमंत अरिष्ट उभें असलेलें त्यांना दिसून आलें. राणीच्या अमदानींतला एक जुना पहारेकरी त्या भुयाराच्या तोंडाशीं खडा पहारा करीत होता. त्यानें ती मंडळी तेथें आलेली पहातांच व विशेषतः: रामस्वामी त्यांच्याबरोबर आहे हें पाहुन खंवचटपणाच्या वृत्तीने चेहरा अंमळ गोरामोरा केला. रामस्वामीनें अंदाजाने ओळखले कीं हा पहारेकरी बखेडा करण्या- साठीं येथें उभा आहे. तो निर्भयपणे त्या पहारेकऱ्याला दरडावून म्हणाला, “ हरिसिंग, मार्गातून बाजूला हो. ”
“ सी वरिष्टांच्या हुकुमाचा ताबेदार आहें. मला बाजूला होतां येत नाहो. ” इरिसिंग उत्तरला.
राणीनें त्याला ओळखले, आणि अधिकारयुक्त वाणीने त्याला आज्ञा केली, “ हरिसिंग, मी ह्या व्रिचनापल्लींची राणी, तुझी धनीण तुला आज्ञा करतें, तू बाजूला हो आणि आम्हांला मार्ग मोकळा करून दे. ”
“ राणीसाहेब, मला क्षमा करा. ” हरिसिंग दोन्ही हात जोडन म्हणाला, “ जोंवर आपली सत्ता या राजवटींत चालू होती तोंवर मीं इमानेइतबारे आपली सेवा केली. परंतु आतां तो मनू पालटला आहे. आतां मी आपल्या हुकुमाचा ताबेदार नाहीं, आणि आपणहि येथील रागीसाहेब नाहीं. ”
रामस्वामीला हरिसिगाचे ते बेपर्वाईचे बोळ ऐकून इतकी चिड आली काँ, त्याचक्षणी त्यानें आपल्या कमरेची कट्यार उपसून ती ह्रिसिंगाच्या छातींत खुपसून म्हटलें, “ निमकहराम, दगलबाज, खाल्लेल्या घरचे वांसे मोजणार्या तुळा हीच शिक्षा योग्य आहे. ”
त्या वारासरसा हरिसिंग प्राणांतिक वेदनांनी ओरडत जमिनीवर पडला. तरीहि पडत पडत त्यानें आपल्या कमरपट्टयांतील कट्यार काढून रामस्वासी- बर वार करण्याला कमी केलें नाहीं. रामस्वामीला सुदैवाने तो वार ओझर-
ट्ट पेशवाद्ेचे मन्वंतर
४५० ७-७४0 ७९०१०१००१७...
१५८४. ६.५०.” ९. ७,५७१... ५५४0४३. ४ ७७८७५७७ ७.१७ .४ 0८० ७७१७८० १७४९७७७... २. ७.७७ ३, ७७७. ७७३. 4९१९..७०११. /९९ 0 १.७
90१./००५/७१७१५. ४५७५७०७०७५ ४०६ ण. ४ ली री
ताच लागला. त्याला जखम झाली, पण हरिसिगाप्रमाणे जमिनीवर लोळण घेण्याचा प्रसंग परमेश्वरानें त्याजवर आणला नाहीं. त्यानें सभोंवार पहात हरिसिगाचा अर्धमेला मुडदा दोन्ही हातांनी ऊचळून दूर फेकून दिला व त्याच्या कमरेच्या किल्ल्या जवळच पडल्या होत्या त्या घेऊन भुयाराचा दर- वाजा मोकळा करून तो राणी आणि ती तरुणी या दोघींना म्हणाला, “ अगोदर आंत चला. ” हरिसिंगाच्या ओरडाओरडीनें आजबाजचे पहारेकरी सावघ होऊन त्या जागीं येऊं लागलेले पाहतांच राणी व ती तरुणी या दोघींचेंहि चित्त बावरलें. रामस्वामी मनांतुत भ्याला कीं आतां आपली घडगत नाहीं- परंतु त्या भीतीचा लवलेशहि आपल्या चर्येवर न दाखवितां त्यातें त्या दोघींना देंडाला धरून बळेंच त्या भुयारांत लोटले व आपल्या हातांतील पलिता त्या तरुणीच्या हातीं देऊन सांगितलें, “ प्रथम भूयाराचा दरवाजा आंतून बंद करून घ्या आणि मग मार्गाला लागा. राणीसाहेबांच्या हा भार्ग चांगला पर्रि- चयाचा आहे. आपण एकवार किल्ल्याच्या तटाबाहेर पडलां कीं आपले साह्य- कारी तेथें हजर आहेत. आपण कांहीं काळजी करूं नका. ”
“ पण तुझी वाट काय ? ” राणीनें भयचकीत स्वरांत विचारलें.
“ माझी वाट परमेश्वर दाखवील ती. ”
“ पण तूं आमच्याबरोबर कां येत नाहींस? ”
“मी भलों असतों. परंतु संकटाचा लोंढा आपणांवर जोराने चालन येण्याचा हा समय आहे. अश्या वेळीं मला येथेंच राहून तो लोंढा थोपवून धरण्याची पराकाष्टा केली पाहिजे. ”
इतक्यांत पांचसहा लोक तेथें येऊन पोंचले. तोंच त्या दोघी भुयाराच्या दरवाजाच्या आंत गेल्या व दरवाजा आंतून बंद झाला. रामस्वामीर्ने' घाईघाईने भूयाराचे प्रवेशद्वार बाहेरून बंद करून घेतलें आणि सभोंवारचे रोक हा काय प्रकार आहे अशी आइचर्यपूर्वक भावनेने चौकशी करीत भसतर्व' त्यानें प्रथम अर्ध मेल्या हरिसिगापाशीं जाऊन त्याचें नरडें कापलें. सर्वे लोक क्षणभर स्तंभित होऊन तो भयंकर देखावा पहात उभे राहिले.
प्रकरण १२ वे: रामस्वामीचें चातुयं
आडत,
| तत्याभीने इतकी खबरदारी घेतली तरी त्या प्रकाराचा गवगवा व्हाव- याचा तो झालाच. मात्र सुदेवानें तीं पांचसहा माणसें तेथें येईतो काय
प्रकार घडला हें एकट्या रामस्वामीशिवाय दुसऱ्या कोणालाहि माहीत नव्ह्ते. कदाचित् हरिसिगार्ने त्या गौप्याचा परिस्फोट केला असता या भयानेंच रामस्वामीतें प्रसंगावधान राखून त्याला या जगांतून नाहींसा केला होता. अर्थात् आतां रामस्वामी सांगेल तोच खरा प्रकार होता. रामस्वामी हा मीनाक्षी राणीच्याच नव्हे तर तिच्या पित्याच्याहि अमदानीपासूनचा अत्यंत स्वामितनिष्ठ असा राजसेवक होता. आणि खुद्द त्याच्यारिवाय व "फार तर दसऱ्या परमेदश्वराशिवाय कोणालाहि माहिती नाहीं अर्से एक रहस्य रामस्वामीच्या जीवनाशीं निगडीत झालें होतें. तें रहस्य हेंच कों रामस्वामी इतक्या सायासानें चंदासाहेबाच्या अस्मानी सुलतानींत नाक मुठींत धरून राजवाड्यांतील सेवेकरी होऊन राहिला होता, तो आपल्या स्वामिनीचें अंदतः तरी क्ण फेडण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पहाण्यासाठींच होय
त्या सहा पहारेकर्यांपैकीं प्रत्येकाने रामस्वामीला तेथल्या एकंदर प्रकारा- विषयीं नाना तर्हेचे प्रन विचारून अगदीं भंडावून सोडलें. पण रामस्वामी अश्या सर्वांना पुरून उरणारा होता. त्यानें त्या सवे घडामोडींच्या अपेशाचें खापर 'हरिसिंगाच्या माथी फोडून दांत ओंठ खात सर्वांना सांगितलें, “त्या बदमाषा- नेंच ही दगलबाजी केली आहे. मला त्याचा पुरा सुगाला लागला नाहीं हें खरें, परंतु मी रात्रीपासून पहातों आहें, याच्या चोरट्या घडामोडी एक- -सारख्या चाल होत्या. आज बरेच दिवस मला संशय आहे कीं हा चोर बंदि- वान् राणीचा साथीदार आहे, पण तो खाशा स्वारीचा अत्यंत विश्वासू सेवक श्पडला; त्याच्या विरुद्ध मीं कोणत्या तोंडाने ब्र काढावा ?”
इतकें झालें तरी भुयारांत कोण मंडळी गेली हा मुद्याचा प्रश्न तसाच
९० पेशवाईचे मन्वंतर शिल्लक राहिला. कारण रामस्वामीनें त्या बाबतींत पर्णपर्णे कानावर हात ठेवला. इतर पहारेकरीहि वो अज्ञात प्रकार पाहून कांहींसे गोंधळून गेले राजवाड्यांत चंदासाहेबानें चालविलेले कठोर कारस्थान त्यांना माहीत होतें. त्या कारस्थानाशीं संबंध असणारी कोणी तरी महत्त्वशाली व्यक्ति तेथून पसार झालो असावी असा सर्वांचा तके झाला. परंतु त्याचा दोष आपणां सर्वांच्या माथी येईल कीं काय या भयानें त्यांनीं आपसांत ती गोष्ट छपवून टाकण्याचे ठरविलें. त्यांपैकी एकानें शक्कल काढली कीं आपण चंदासाहेजाला हा प्रकार सांगून आपल्यावरील जबाबदारींतून मोकळें व्हावें. परंतु अजून थोडीशी रात्र होतीच; व चंदासाहेबालाही मीनाक्षी राणीशीं राजकारणाच्या वाटाघाटो करण्याच्या निमित्ताने अगोदरच जागरण घडलें होतें. अश्या स्थितींत त्याची झोंपमोड करण्याचें धैय कोणाला कसें व्हावें! रामस्वामीला ती सवे परिस्थिति फारच सोयीची वाटली. त्यानें आपली स्वामिसेवातत्परता दाखविण्यासाठीं त्या योजनेला मनमोकळेपणाने मान्यता दिली. कारण चंदासाहेबाळा तरी फार लौकर म्हणजे प्रातःकाळींच हा प्रकार कळणार होता. त्याच्या नंतर चौकशी होऊन खऱ्या अनर्थाचा शोध लागणार, तोंवर मीनाक्षी आणि ती तरुणी सुखरूपपणें आपल्या निर्भय मार्गाला लागतील याविषयीं रामस्वामीला मुळींच शंका नव्हती.
आणि पुढील प्रकारही थेट रामस्वामीच्या कल्पनेप्रमाणेंच घडून आला, चंदासाहेबानें प्रातःकालीं उठल्याबरोबर प्रथम मीनाक्षी राणीच्या सहीचा खलिता घेऊन आपल्या तफच्या वकिलाला सुरारराव घोरपड्याकडे रवाना केला. त्या मराठा रणमर्दाला कारस्थानाच्या जाळ्यांत अडकवण्याची तरतूद झाल्यावर अवान्तर गोष्टींकडे लक्ष देण्याला चंदासाहेबाला फावले, तेव्हां कोठे पहांटेंचा गलबला त्याच्या कानीं गेळा. आणि आईचर्याची गोष्ट ही कों ती तक्रार करण्यांत रामस्वामी हाच प्रमुख होता ! रामस्वामीनें 'अश्या कांहीं विलक्षण आवेद्यानें बोल बोलून चंदासाहेबाला जादूगाराप्रमाणें भारून टाकळे कों त्या भरांत हरिसिंगाचा आपल्या हातून खून झाला हें सांगूनहि त्याबद्दल त्यानें चंदासाहेबाकडून शाबासकी मिळविली! पुढील प्रसंग ओळखून कीं काय, रामस्वामीनें आपल्या निवेदनाला आगाऊच पुस्ती' *नोडून ठेविली होती, “ मालीक, माझ्या हातून रात्रीच्या पहाऱ्यांत थोडी
00 0011 अ र
४१-४४ ५०% १. €४..५/४../* .“ ७५.४९ ./”२./७७ ४९.४१ ४०७ ४ /१४ /%/११./
रामस्वामीचें चातुर्य ९१ कसूर झालो आहे त्याबद्दल मला क्षमा करावी. पहांटेच्या प्रहरीं मीं माझा पहारा सोडला व हरिसिंग त्या कामगिरीवर रुजू झाला, त्यावेळीं त्यानें ज्या काय भानगडी केल्या असतील तिकडे माझें लक्ष नव्हतें. ”
“.त्या भानगडींबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्त अल्लानें दिलेंच आहे. तूं त्याबहल कां फिकोर करतोस ? ” चंदासाहेबानें विचारलें.
“ तसें नव्हे मालिक, मीं एरव्हीं फिकीर केली नसती. परंतु मला आज बरेच दिवस असा जबरदस्त संशय येंत होता कीं हरिसिंग हा बंदिवान् राणीचा पक्षपाती असावा आणि त्या भुयाराच्या वाटेनें कोणती मंडळी त्यानें बाहेर काढून दिली हें जरी सला माहीत नाहीं, तरी आतां मला जास्तच संशय येऊ. लागला आहे कीं त्यानें राणीलाच बंधमुक्त करून बाहेर लावून दिलें कौं काय! ”
राणीचें नांव निघतांच चंदासाहेबाच्या डोक्यावरचे केंस ताठ उभे राहिले; ठो आइचर्य आणि संताप यामुळें थरारणार्या वाणीनें उद्गारला, “ काय, 'राणी बंधमुक्त झाली ? . चळ अगोदर माझ्याबरोबर. मला त्या गोष्टीचा तपास केलाच पाहिजे. ” असें म्हणून चंदासाहेब त्याच पावलीं बंदीशाळेकडे निघाला. तो जाऊन भुयाराचा दरवाजा उघडून पहातो तों आंत राणी कोठें आहे! अर्थात् राणी निसटून गेली हें तर ठरळेंच. रामस्वामीनें तो भुयाराचा संशयित मार्गही चंदासाहेबाला दाखवून दिला. चंदासाहेबानें तेथें जाऊन आपल्या नोकरामाफंत तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्त केला, परंतु आंतून कडी असल्यामुळें तो उघडला गेला नाहीं! अखेर कुऱ्हाडी आणून दो दरवाजा फोडून काढावा लागला. परंतु आंत दहाबारा पायर्या उतरून गेल्याबरोबर त्या लोकांना तेथें पाणीच पाणी असलेलें आढळून आलें. इतकेंच नव्हे, पण भरतीच्या वेळीं समुद्राचा किनारा पाण्याच्या वाढत्या लाटाबरोबर झांकत जावा त्याप्रमाणें त्या भुयाराची एकएक पायरी आंतील जलप्रवाहानें हळूहळू. झांकली जात होती. त्यामुळें त्या लोकांचा अगदीं नाइलाज झाला. त्यामुळें तेथें चंदासाहेवाची मति कुंठित झाली. तो रामस्वामीला म्हणाला, “हा मार्गे तर जलमय दिसतो! असें कसें? ”
रामस्वामी गंभीर चर्या करून म्ह्णाला, “परमेश्वर जाणे ! मीं आजवर हा मार्गे कधींच पाहिला नव्हता. ”
“ तरी पण तूं किल्ल्यांतला अत्यंत जुना नोकर आहेस. हृदया रस्त्याचा
२७ पेशवाईचें मन्वंतर
“११०८७९१७८१ ९७० १६८०९११००0...
५८८९०५७७०८... ४९९७. “0२. ४७८५७४ ४ “१० १०/१७/६१५७ ७८४०
मानाची जागाहि मिळेल. परंतु याद राखून ठेवा, राणीचा शोध जर लागला नाहीं, तर मी तुम्हां सर्वांचा महादेवाच्या टेकडीवरून कडेलोट करण्याला कभी करणार नाहीं. ”
यंदासाहेब आपल्या शब्दाला जागण्याइतका निर्दंय मनाचा होता हें सर्वांना माहीत होतें. आणि म्हणूनच ते आपल्या जिविताची आशा सोडून सभय चित्ताने राणीच्या शोधार्थ दहा दिशांना निघून गेळे. मात्र जातांना त्यांनीं आपल्या मनाशीं खूणगांठ मारली कों, राणीचा शोध लागला तर पुन्हां ह्या किल्ल्याला आमचे पाय लागतील, नाहींपेक्षां जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा. हा त्यांचा एकएकट्याच्या मनाचा निर्धार झाला, परंतु त्यांचीं बायकापोरें तेथेंच बिर््हाडांत अडकलीं होतीं, त्यामुळें परागंदा व्हावयाचें झालें तरी बायकापोरांची काय वाट करावयाची हा प्रश्न ओघानेंच त्यांच्या समोर उभा राहिला, व त्यांनीं थोड्याशा विचारांती आपसांत संगनमत करून, आपल्या मागोमाग आपल्या बिऱ्हाडांचें चंबूगवाळें आटोपलें जाईल अशी तरतूद केली.
चंदासाहेब बंदिशाळेतून माघारा राजवाड्यांत जाऊन पोंचला व घड- "लेला एकंदर प्रकार मोहनेला निवेदन करण्यासाठीं तडक तिच्या महालांत गेला. परंतु मोहना त्याला तेथें आढळून आली नाहीं ! त्याबरोबर तर त्याचें अंत:करण आदचर्याच्या धरणीकंपारने पुरें हादरून गेलें. तो स्वतःशी दांत ओंठ खात उद्गारला, “ हिंदू-हिंदू ! ही हिदंची अवलाद पट्टीची विश्वासघातकी निमकहराम आहे. मोहने, तूं अखेर मला फंसविलेस काय?” इतक्यांत त्यालाच वाटलें कीं, न जाणो मोहना कोठें तरी आजूबाजूला राज- वाड्यांत किवा उद्यानांत फिरत असेल; म्हणून त्यानें तिच्या महालांतील दासींपाशीं चौकशी केली. तेव्हां तिच्या तैनातींत असणार्या एका दासीने सांगितलें, “ बेगमसाहेबा प्रहरभर रात्रीला ज्या महालाबाहेर पडल्या त्या पुन्हां महालांत म्हणून आल्या नाहींत. आम्ही त्यांचीच वाट पहात आहो. ” तोंच दुसरी दासी पुढें येऊन म्हणाली, “ बेगमसाहेबा खाविदांच्या महालांत गेल्याचे मळा माहीत होतें, म्हणून मीं त्यांचा फारसा तपास केला नाहीं. ”
चंंदासाहेबानें जास्त संशय घेऊन मोहूनेचा सार्या राजवाड्यांत कसून -तपास केला. परंतु ती कांहीं त्याला सांपडली नाहीं. ती 'काफर' असल्या- मुळेंच तिनें आपणाला दगा दिला, असें त्याच्या मनानें पक्के घेतलें व आतां
बिचारा रतनसिंग ९५९
१०९९००९९१७
कोणत्या रीतीनें शोध करून तिच्यावर सुड उगवू असें त्याला होऊन गेलें. इतक्यांत त्याच्या हृदयाच्या जखमेवर मीठाचें पाणी शिपडण्यासाठींच कीं काय, त्याचा एक विश्वासू हुजर्या यामीन घाईघाईनें घाबरट चर्या करून तेथें आला व त्रिवार त्रिवार मुजरा करून रडक्या स्वरांत उद्गारला. “ मालिक, आपण रात्री माझ्या हवालीं केलेल्या त्या दोन तलवारी कोठेच सांपडत नाहींत.”
“ हरामखोर ! ” चंदासाहेब चिडलेल्या वाघाप्रमाणें यामीनवर डरकणी फोडून म्हणाला, “ बदमाष, तूंच शात्रूला सामील आहेस ! ” त्यानें एका झडपेसरशी यासीनची मान पकडून त्याला गदगदा हलवीत विचारलें, “ बोल, त्या तलवारी तृं कोणाच्या स्वाधीन केल्यास ? ”
यामीन बिचारा गर्भगळित होऊन गेला. त्याच्या तोंडांतून शब्दच उम- टेना. चंदासाहेबाच्या संशयग्रस्त मनाला वाटलें कीं हा आपणापासून तल- वारींचा प्रकार छपवून ठेवितो आहे. म्हणून त्यानें संतापातिशयाच्या भरांत कमरेचा खंजीर उपसून तो यामीनच्या छातींत जोरानें मारून म्हटलें, “ निमकह्राम, तृंच त्या तलवारी शत्रूच्या स्वाधीन केल्या असल्या पाहिजेस. तुला हेंच शासन योग्य आहे. ”
यामीन खंजिराच्या वारासरसा गतप्राण होऊन धाडकन् खालीं पडला.
तो सारा दिवस चंदासाहेबाची अवस्थ) एखाद्या मार्थेफिरूप्रमागें झाली होती. काय करूं आणि काय न करूं असें त्याला होऊन गेलें होते. कावीळ झालेल्याला सारेंच पिवळें दिसतें. त्याप्रमाणेंच त्या एका घटनेमुळे त्याला सर्देच हिंदूंचा जबरदस्त संशय येऊं लागला होता. तद्ांत, आतां लवकरच राणी मीनाक्षी आपल्या हिंदू अनुयायांना गोळा करून, आपले गेलेलें राज्य परत मिळविण्यासाठी कसोशीने सामना देणार आहे अश्याहि बातम्या वारंवार कानीं येऊं लागल्या व वार्याच्या सोंसाट्यासरसा आगीचा झोत पसरत जावा त्याप्रमाणे त्या बातम्यांनी सारें त्रिचनापल्लीनगर दुमदुमून गेलें. त्या बातम्या अगदींच खोट्या होत्या असें नाहीं. काय असेल तें असो, परंतु चंदा- साहेबाला त्या दिवशींच्या घटनेमुळे जितका संताप भाला होता, तितकाच प्रसभतेचा सुधावर्षाव तेथल्या हिंदू रयतेच्या व -लहान मोठ्या सर कारी हिंदू अधिकाऱ्यांच्या हृदयावर झालेला सर्वच आढळून येत होता. चंदासाहेबानें आपल्या हाताखालील सर्वे विश्वासू मुसलमान अधिकाऱ्यांना
९६ पेशवाईचें मन्वंतर सभोंवारच्या परिस्थितीचा बंदोबस्त व मोहना आणि मीनाक्षी सांचा शोध हीं दोन कामें निक्षून सांगितलीं. ते अधिकारीही आपल्या कार्यांत चुकवा- चुकव करणारे नव्हते. ते बहुतेक 'कलमी' अर्थात् बाटून मुसलमान झाळेले होते एवढें सांगितलें म्हणजें त्याच बाटगेपणाच्या जोरावर त्यांला सरकार, दरबारीं मान्यतेच्या नोकऱ्या मिळालेल्या असून त्याच मार्गानें बढती िळण्या साठीं त्यांचा अट्टाहास सुरू होता हें नव्यानें सांगावयाळा नको. त्यांना प्रथम वाटलें कीं आपलें नशीब काढण्याची ही खास पर्वणी आली, पर्टलु रो मत्यक्ष कार्याला लागतांच त्यांना अनुभव मात्र विपरीत येऊं लागला. छते दिवस चंदासाहेब व त्याचे अविध अधिकारी यांच्या ताटाखालील मांजरांप्रसाण दुबळे होऊन बसलेले हिंदू लोक आज कसे न कळे,एकाएकीं घिटाईनें वागू ळाराळे. फार काय, त्या मुसलमान अधिकाऱयांच्या हाताखालील दुय्यम लोकदेखी लक--अर्थात् ते बरेचसे हिंदु होते-आपलें काम नेहेमीप्रमाणे झटून करण्याला तयारच छोेनात; जणूकाय या रेंवटच्या चक्रापासून चंदासाहेबाचें राज्ययंत्र बिघडून बंद जडण्याच्या पंथाला छागलें. सूर्योदयाच्या सुमाराला फक्त मोहना आणि मीन्राव्ली हवा दोघीच गुन्हेगार होत्या, तीच संख्या सूर्य चार घटका वर येईतो सहज सक्षासांवर गेली; आणि तरीहि चुगलखोर स्वार्थेसाधूंच्या आगलावेपणामुळे ली. राख्या सारखी फुगतच होती. असें असूनहि आश्चर्याची गोष्ट ही को, सकुकारच्या दृष्टीनें अपराधी ठरलेले फारच थोडे लोक त्या दिवशीं सरकारी अधिका ऱ्यांच्या हातीं लागले.
चंदासाहेबाला कळून चुकले को, आपला बोज आतां पूर्ववत् कायम राहिल, नाहीं. काफर अर्थात् हिंदू आपली आज्ञा उघड उघड पायांखालीं लुड्यू लागटे हें पाहुन त्याला पराकाष्टेचा विषाद वाटला व तितकाच संतार्पाषडि आला . “काय, ज्या चंदासाहेबानें या त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत पाऊल ठढाकल्या' पासून आपल्या इच्छेसमोर साक्षात् अल्लालाहि वांकायला लास्वळे, पंच महाभूतांचें एकवटलेलें सामर्थ्ये ज्या ह्या माझ्या वाणींत आजवर खांठवलेले होतें, माझी नुसती नजर फिरल्याबरोबर जेथें सर्व लोक अत्यंत आलज्झाधारक पणानें माझी जुलमाची आज्ञादेखील शिरसामान्य करावयाला खुषीोर्ले किव सक्तीने तयार असत, त्याच मला आज येथें कोणीहि जुमानीत नाहीं ना! बरेच दिवस या काफर हिंदूंच्या अंतःकरणांत माझ्याविषयीं ध्युमसगणार
बिचारा रतनसिंग ९७
'“.. ल0.क रीओ कसिशबकय्क्कल्काककाक्कका १४-११" ९४४४४१४" ९१४४५४५१४९१५-४-४-//% ४० ४४-८५ ५५.५५ /५.८0 ५.८५ “००/५०/९५८५ ./१०.०५ ०५ ०५.० -.“<
व्व्वानल आज शांति सोडून पेट घेऊं पहात आहे. पण त्यांना म्हणावें, माझा व्हा तानल एकदां भडकला म्हणजे तुमची सारी जात तुमच्या देवाधर्मांसह रव्रेचिराख करून सोडील. ” हे त्याच्या मनांतले विचार झाळे; त्याच वेळीं स्याएच्या कोपाची वीज प्रथम किल्ल्यांतल्या टेकडीवरील महादेवाच्या देवळा- व्यार कडाडली. आपण काफरांना त्यांच्या सर्वस्वासह पायांखालीं कसें सुड वूं शकतों याचा सर्वांना धडा शिकविण्यासाठी त्यानें आपल्या हाताखालील स्टव्का सेनापतीला बोलावून आज्ञा केली, “रतनसिंग, आज सूर्यास्ताच्या आंत जर "यकय्णी मीनाक्षी, मोहना आणि माझ्या राजवाड्यांतून चोरीला गेलेल्या त्या दोन सतरत्वारी पुन्हां माझ्या हातीं आल्या नाहींत, तर सर्व हिदु रयतेला आज ज्वाहीर करून ठेव कों उदईक सूर्योदयाच्या वेळीं ह्या अत्याचाराचा मोबदला अ्छप्णून हिदूंच्या महादेवाच्या देवालयाचा विध्वंस करण्यांत येईल. ”
रतनसिंग चंदासाहेबाचा विश्वासू सेवक खरा, पण तो रक््तानें हिद्र होता. आ्वन्हानें किंचित् दुबळा पडला म्हणून तेथल्या परक्यांच्या सेवेला चिकटून राहिला त्वारी' इतका अमानुष जाच व इतकी अवहेलना सहन करण्याइतका तो नामर्द न्वख्छता. तरी त्यानें मनांतला क्रोध मनांत दाबून चंदासाहेबाला विचारिले, “<स्व्ाविद, पण आपला हिंदूवरच एवढा राग कां? तेच गुन्हेगार आहेत असें उयपण कशावरून म्हणतां?”
““समजलों-समजलों, तूं देखील त्यांतलठाच काफर आहेस आणि तुझ्या स्कंयांत अभिमानाचे वारे आतां संचारू लागलें आहे. यावेळीं मी गय केली तर स्कल्त्ा ती डोईजड जाईल. ठिणगीचा हां हां म्हणतां वणवा पेटतो, म्हणून ठिण- गवि प्रथम विझवून टाकिली पाहिजे. मला भळे बोल शिकविणाऱ्या नादान म्हा फासा, थांब. उदईक सूर्योदयाच्या वेळीं महादेवाची विटंबना करतांना, त्कुस्सर््च्या हिंदु-धर्मांत कोणत्याही सत्कार्याच्या प्रारंभीं देवाला सुपारी' ठेवण्याची च्वााव्क आहे त्याप्रमाणें प्रथम महादेवाच्या टेकडीवरून तुझा कडेलोट केला जाणपल, आणि मग इतर गोष्टी.” एवढें बोलून चंदासाहेब एखाद्या दुखवलेल्या स्वपपासारखा फणफणत तेथून निघून गेला. रतनसिग मात्र किकतंव्यमूढ सये स्कन किंचित् काल तेथेंच उभा होता. इतक्यांत अकस्मात चंदासाहेबाच्या अ"रव्वी शिपायांनी पुढे येऊन त्याला गिरफदार केलें. रतनसिग आपल्या मनांत'
ऊोव्ठखून चुकला कीं, आपल्या आयुष्याचा कारभार आतां आटोपला. च्प्ळे
प्रकरण १७ चें ९ बळ सपे दुखावला गेला! पलक तासात
संध्याने संशय वाढत गेला; चंदासाहेबातें त्याच रात्रीं मुरारराव घोर-
पड्यांकडे मीनाक्षी राणीच्या सहीचा खलिता रवाना केला होता, त्याचा तरी दृष्ट उपयोग होतो किंवा नाहीं याविषयीं त्याला खात्री वाटेनाशी साली. परंतु आपणाला तो प्रकार ओघानें कळणारच आहे. तोंवर राणी मीनाक्षी आणि तिच्या बरोवरची ती कोण तरुणी, त्याप्रमाणेंच रामस्वामी यांची पुढें काय गत झाली हें आपणांला प्रथम पाहिले पाहिजे.
तो भुयाराचा मार्ग मीनाक्षी राणीच्या चांगलाच परिचयाचा होता. तिचा पति त्रिचनापल्लींत राज्य करीत असतां कांहीं घरगुती भांडणांतून उत्पन्न झालेल्या महत्संकटामुळें त्या पतिपत्नींना त्याच गुप्त वाटेने आपल्या प्राण- रक्षणासाठीं एकदां बाहेर जावें लागलें होतें. तो मार्ग बराच अवघड होता. भुया- राच्या तोंडाने आंत गेल्यावर निरनिराळ्या बाजूनें आंत भुयाराला अनेक फांटे फुटलेले असून त्यांतला कोणता फांटा कोठें जातो हें फक्त माहितगारा- . शिवाय इतरांना कळणें शक्य नव्हतें. त्यांतले दोन फांटे तर थेट यमाच्या दरबारीं पापिष्टाला नेऊन पोंचविणारे होते. एका वाटेच्या तोंडाशीं अत्यंत खोल व निबिड अंधःकारानें व्यापिळेली अशी एक विहीर होती व त्या विहिरींत कांटेकुटे, लोखंडी खिळे, मोडकों हत्यारें वगेरे प्राणघातक साहित्य भरपूर टाकण्यांत आलें होतें. दुसर्या रस्त्याच्या तोंडाशीं एक खोलच खोल अंध:- कारमय गुहा होती. अपरिचित मनुष्य त्या मार्गाने जातांच हटकून पाय चुकून आंत पडावा अशीच घोटाळ्याची रचना तेथें करण्यांत आली होती. त्या भुयाराच्या तळाशीं भयंकर लांबच लांब असे लोखंडी सुळके उभे ठेवण्यांत आले असल्यामुळें, मनुष्य एकवार आंत पडला कीं तो जिवंत सांपडण्याची आश्याच नसे. केक पिढ्यांपूर्वी त्रिचनापल्लीला कोणीएक व्यसनी व जुलमी राजा होऊन गेला; त्यानें आपल्या गेरमर्जीतल्या लोकांना शासन करण्याचा हा राक्षसी उपाय योजून ठेविला होता.
सर्प दुखावला गेला ९९ असो. राणी आणि ती तरुणी मार्ग न चुकतां त्या भुयाराच्या वाटेने इष्ट स्थळीं जाऊन पोंचतांच प्रथम त्यांना भुयाराच्या दुसर्या तोंडाचा दरवाजा खळा होईना. त्या दोघींनींहि शक्य तेवढ्या जोराने दरवाज्यावर आघात करून तो उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अगदीं वाया गेला. जसजसा त्यांना तेथे चास होऊं लागला व बंधमुक्त होण्याच्या आशेचा किरण मुळींच दिसेना, तसतशा भळलभलत्या कुरांबा त्यांच्या मनांत डोकावं लागल्या. राम- स्वामी शत्रूला तर फितूर नसेल ना, असा विचार मनांत येण्याइतकी त्या तुदांकांची मजळ जाऊन पोंचळली. चंदासाहेबाने आपला नायनाट करण्याची ही बेमाळूम यृुकिति शोधून काढली असें राणीने त्या तरुणीपाद्ली बोलूनहि दाखविळें. अशा वांहीं बेळ त्या दोघीही चितानलांत होरपळत तेथें उभ्या असतांना, एकाएकीं तो दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर तेथल्या दार- सक्षकार्ने राणीला पहातांच तिच्य़ा चरणांवर मस्तक नम्र करून आपणाकडून झाळेल्या दिरंगार्ईबहल तिची क्षमा मागितली. त्या तरुणीकडे मात्र त्यातें बारंबार भेदक दष्टीनें निक्षून पाहिलें. राणीला त्याचा संशय येऊन तिने त्याला विचारलें “ कां? तुला बा मुलीचा संशय येंतो का ? ”
“ तसं नव्हे. पण आमच्या राणीला एका यःकशिचित् कलावंतिणीच्या हातांत हात घाळून दहा दिशांना भटकण्याची पाळी यावी, या देवदुविलासाचें मला आइचर्ये वाटतें आहे. “ तो द्वाररक्षक उद्गारला. त्मा तरुणीने त्याच क्षणीं ळाजेनें खालीं मान घातली. राणी तो प्रवार पाहून आश्चर्यचकित मद्रेने त्या दोघांच्याही तोंडाकडे आळटून पाळटून टकमवां पाहु लागली. तिनें त्या तरुणीला बिचारळे, ' तूं कोण? ”
ती तरुणी कांहींही बोलली नाहीं. तो हाररक्षक पुन्हां तिच्याकडे तीक्ष्ण दृष्टीनं पहात राणीला म्हणाला, * राणीसाहेब, ही आपणाला जन्मांतून उठवणाऱ्या संतानाची रखेली आहे,ब आपणाला या जगांतून नाहींशा करण्यांत तिना स्वार्थ आहे, हें आपणाला माहित नाहीं काय ? ” राणी पुन्हां संशयित मद्वेनें त्या तरुणींच्या च्येकडे पाह लागली.
तो द्राररक्षक क्षणभर थांबून पुन्हां त्या तरुणीचे ताडण करूं लागला, “ मोहने, बोळ-चांडाळणी, त मोदृनाच ना? श्रीरंगाच्या देवळांतील कलावंतीण ती तूंचना ? ”
१०० पेशवाईचें मन्वंतर
“ होय, मी मोहना. ” असें म्हणून मोहनेनें आपलें अश्र॒ पुशीत राणीकडे वळून स्फुंदत स्फुदत उद्गार काढले, “ राणीसाहेब, हा हाररक्षक म्हणतो. त्याप्रमाणें मी पतिता नारी आहें हें तर खरेच. परंतु यानें मल आपली प्रतिस्पर्धी स्त्री ठरविलें यावर मात्र आपण कृपा करून विश्वास ठेवं नका. मी' परमेश्वराला साक्ष ठेवून पुन्हां सांगते, ती मोहूना-श्रीरंगाच्या देवाल्यां- तुन त्या नराधम सय्यदखानार्ने बलात्काराने ओढून नेऊन बाटविलेली मोहना वस्तुतः असहायपर्णे ज्या दिवशीं बाटली त्याच दिवशीं या जगांतून नाहींशी झाली; आणि ह्या जुलमाचा सूड घेण्यासाठीं अहनिश तळमळणारी ही नवी मोहना त्याच क्षणाला जन्माला आली. सय्यदखानाच्या सहाय्यानें त्या नर- पशु चंदासाहेबाने मला आपल्या विलासमंदिराचा दरवाजा दाखविला, आणि मीहि फारसा प्रतिकार न करतां मुकाट्याने आंत चाळून गेलें खरी; परंतु ती त्या अविधाची नाटकशाळा होण्यासाठीं नव्हे, तर संधि सांपडेल तेव्हां सांपडेल तसा फांसा टाकून त्याचा सत्यानाश करण्यासाठीं. डोळ्यांत तेल घालून टपून बसणारी ही' आपली हाडवेरीण त्यानें मूढपणानें आपल्या विलास मंदिरांत आपल्या शेजारीं उभी करून ठेविली होती. आतां परमेश्वराची कृपा झाली तर माझी इच्छा सफल होईल. आपलाहि त्या सदिचन्छेला आलि वाद आहेच. माझ्या कारस्थानाचा धागादोरा आपणाला अद्यापि मुळींच कळलेला नाहीं. या द्वाररक्षकाला देखील माझी ओळख न पटण्याइतका माझ्या कारस्थानांचा गुप्तपणा अभंग राहिला गेला आहे यांतहि मला संतोषच आहे. आतां आपण बंधमक्त झालांच आहां; आणखी थोड्या वेळानें मी काय म्हणतें याचें प्रत्यंतर आपल्या मनाला पटेल. ”
इतक्यांत यावनी पेहराव केलेला एक सेनिक आपला घोडा भरधांव फेकीत तेथें येऊन पोंचला व त्यानें तेथें येतांच मोहनेला प्रथम वंदन करून दोन्ही हात जोडन विनंति केली, “ बाईसाहेब, मी रामस्वामीच्या अनुज्ञेवरून येथे आपला मागंदर्शक म्हणून आलों आहें. ' इतक्यांत जवळच उभ्या असलेल्या राणीकडे त्याचें लक्ष गेलें; त्याबरोबर त्यानें राणीच्या पायांवर मस्तक ठेवून प्रणिपातपूर्वक उद्गार काढले, “ आईसाहेब, प्रथम मी आपणाला ओळ- खलें नाहीं याबहृल मला क्षमा करा. आपण बंधमुक्त झालां यावरून आमच्या या अभागी देशाचें भाग्य आज पुन्हां उदयाला येऊं घातलें आहे असेंच मी
सर्प दुखावढा गेला १०१
। ह ७७0१ १०४०५०७ ४०४१५० ४.४७ ६८७९ ४.७१. ७..४९१..४ ७.४ ४.४७ ४./*१५५.४९७.” 0७.४0 ४५७१९... ७.”
समजतों. परंतु आतां येथें बोलण्यांत वेळ दवडण्याइतकी सवड आपणाला नाहीं. तिकडे किल्ल्यांत या प्रकारामुळे संशयाचा व असंतोषाचा वणवा भडकला असेल. त्या वणव्याची झळ आपणाला लागण्यापूर्वी आपण येथून शत्रूच्या दृष्टिआड झालें पाहिजे. ”
द्वाररक्षक स्तब्धपरगे त्या सेनिकारचे तें भाषण ऐकत होता. त्यानें किंचित ओशाळल्यासारखें करून त्या सेनिकाला विचारलें, “ मनमोहन, ही मोहना आपल्या विश्वासाला पात्र आहे, अशी तुझी खात्री आहेना? ”
मनमोहन उत्तरला, “ तो प्रन आपला नसून आपल्या नेत्यांचा आहे., आपण आपलें कतेव्य करून शिस्त पाळावयाची आहे. तुला असें वाटतें का कों इतक्या प्रयासांनी देशाच्या दास्यविमोचनाची योजना ज्या लोकनाय- कांनीं उभारली त्यांनीं मोहनेसारख्या संशयित जिविताच्या' स्त्रीला तावूत सुलाखून पाहिल्याशिवाय उगीच आपल्या कटांत सामील करून घेतलें असेल?
तोंच मोहना म्हणाली, “ मला याविषयीं मुळींच विषाद वाटत नाहीं; उलट आनंद वाटतो कों आपल्या हिदुजनतेचा दास्यविमोचनाचा प्रयत्न इतक्या सावधपणानें व पद्धतशीर रीतीनें सुरू आहे. पाया भक्कम असला तर त्यावरची इमारत टिकते. ” ती द्वाररक्षकाकडे वळून म्हणाली, “ तूं मला टाकून बोळलास याबद्दल मी तुझ्यावर मुळींच रुष्ट झालें नाहीं, उलट तूं बेसावधपणें माझी कसून विचारपूस न करतां जर मला येथून जाऊं देतास, तर असल्या महत्त्वाच्या गुप्त कारस्थानांत तुझ्यासारख्या नेभळटाला स्थान मिळालेले अयोग्य आहे असेंच मीं म्हटलें असतें. ”
“ बरे, आतां लोकर एकदां आपण उभयतां माझ्या मागोमाग चला. सम्ापली नौका पलीकडे तयार आहे. तिच्यांतून आपण एकवार शत्रूच्या दृष्टीच्या टापूपलीकडे गेलों कौं बचावलों. ”
एवढें त्या मंडळीचें संभाषण होत आहे तोंच रामस्वामी अकस्मात् त्यांच्या- समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून सर्वांना पराकाष्टेचें आश्चर्य वाटले. राणी आणि मोहना त्याला कांहीं विचारणार, इतक्यांत त्यानेंच उलट त्यांना हडसून खडसून प्रश्न केला, “ हें काय ? आपणाला देश्याचा उद्धार करा- वयाचा आहे कीं शत्रूच्या हातून अधिकाधिक विटंबना करून घेऊन मरावयारचें आहे ? इतका वेळ तुम्ही येथें उभ्या कशा ? ” तो उत्तराची वाट न पाहतां
१०२ पेशवाईचें मन्वंतर
पुढें म्हणाला, “ बरें; आतां अगोदर माझ्याबरोबर चला. किल्ल्यांत आपण दोधीजणी अदृश्य झाल्यामुळें हाहाःकार उडाला आहे, व आपल्या शोधाचा प्रयत्न जारीनें सुरू आहे. मी इकडे आलों तो तरी पडत्या फळाची आज्ञा घेऊन आपला शोध करण्यासाठींच होय. ”
“ परंतु तुला तरी इकडे कसें येतां आलें ? मी इकडे येतांना जलाशयाचा मार्ग मोकळा करून तें भुयार कायमचें निरुपयोगी केलें होतें. ” राणी म्हणाली.
“ते खरें; परंतु ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी. ” रामस्वामी गालांतल्या गालांत किंचित् हंसून म्हणाला, आपल्या योजनेप्रमाणे आपला हेतु पूर्णपणें सफळ झाला. आपल्या शोधासाठीं म्हणून, दोन वीर त्या जला- शयांत उडी टाकून प्राणाला मुकले, मी तरी शक्य तों लवकर आपली भेट घेणें अवश्य म्हणून आपला शोध लावण्याची कामगिरी चंदासाहेबाच्या विनंतीवरून पत्करली, आणि त्या कामगिरीवर सध्यां मी इकडे आलों आहें.”
परंतु त्या जलप्रवाहानें हळूहळू किल्ल्यांत सवत जलमय होईल त्याची वाट काय ? ” राणीने विचारलें.
“ त्याची आपणाला काळजी नको. मी जलप्रवाह बंद करून इकडे आलों आहे. किल्ल्यांतल्या लोकांची मात्र कल्पना झाली असेल कीं जी गत पहिल्या दोघांची तीच रामस्वामीचीहि झाली असावी. आणि त्यांची तशी कल्पना होणें आपणाला इष्टच आहे. पण आपण खुळ्यासारखीं येथें काय उभें राहिलों ? चंदासाहेबानें मरारराव घोरपड्याला जाळ्यांत अडकविण्या- साठीं योजलेले कारस्थान पूर्ण होण्यापूर्वीच आपणाला मराररावची गांठ घेऊन त्यार्चे रक्षण केलें पाहिजे. त्यानें एकवार आपणाला पाठीशीं घातलें कों मग आपला राज्यक्रान्वीचा प्रयत्न फळाला येण्याला मुळींच उशीर नाहीं
एवढ संभाषण झाल्यावर रामस्वामीसह राणी व मोहना ह्या दोघीही तेथून निघून गेल्या. थोड्या अंतरावर मोहना व रामस्वामी यांच्या पूर्वे- योजनप्रमाणें नौका सज्ज होतांच त्या नौकेंतून ती मंडळी कोठें निघन गेली याचा चवथ्या कोणालाहि पत्ता लागला नाहीं. आपलें प्रयाण अत्यंत गप्त रहावें या हेतूनें कीं काय, रामस्वामीनें अन्य कोणाही माणसाला आपल्य़ा- बरोबर घेतलें नाहीं. त्यामुळें नौकेवर वल्हे मारण्याची कामगिरी राम- स्वामीबरोबरच राणी व मोहना या दोघींनाहि पतकरावी लागली; व त्यांनीं
0 . . /
ह. र 1.
मोहना आणि मीनाक्षी गुत्तपणे प्रयाण करीत आहेत.
सर्प दुखावला गेला १०३ 1 कयतात तीची ती आनंदानें पतकरली. मोहना वल्हे मारतां मारतां राणीला म्हणाली, राणीसाहेब, असली कठोर कामगिरी आपल्या वांट्याला परमेश्वराने आणल्के 1! पण त्याला इलाज नाहीं. ” स्थपथस्वामी तेवढ्यांत म्हणाला, “ राणीसाहेब ह्या आतां आपल्या अति- विशाळ राज्यनौकेच्या कर्णधार होणार आहेत; त्यांनीं या लहानश्या नौकेचें केण्बारत्क पतकरलें यांत वावगे असें कांहींच नाहीं ” इतका वेळ सूर्याला गोंडा फुटला नव्ह्ता, किवा तो अभ्राखालीं झांकला गेला असेल; पण राम- स्वामीर्च्या तोंडून ते शब्द निघावयाला व सुर्यबिबावरील अभ्राच्छादन दूर व्हावयात्का गांठ पडली. सोनेरी बालार्कांच्या सौम्य प्रकाशाचें अभ्यंग स्नान त्या नोव्केंतील मंडळींना घडूं लागलें. रामस्वामी त्या उगवत्या सूर्यबिंबाकडे अंगु लिनििदेचा करून उल्हसित अंत:करणानें उद्गारला, “राणीसाहेब, माझ्या भविष्यचक्ााणीला हा शुभशकून घडला पहा! ” सत्या आनंदाच्या प्रसंगाला दृष्ट लागूं नये यास्तव परमेश्वराने गालबोट लावण्याचे योजिले होतें म्हणून कों काय, राणीने सहज वर महादेवाच्या टेकडी- कडे दुष्टि लाविली, तों तेथला अंगावर शहारे आणणारा देखावा पाहून राणीचे अंतःकरण थरारून गेलें. ती कापर्या स्वरांत हळहळली, “ शिव! शिक्त ! काय हा अनर्थ ! भगवंता, तूं माझ्या देशाच्या मस्तकीं उमटलेलीं परदास्याऱ्की पदलांडनें पुसून टाकण्याच्या माझ्या प्रयत्नसिद्धीपूवीा अश्या किती न्हिरपराधी व स्वाभिमानी सुपुत्रांचा बळी घेणार आहेस न कळे! ” राणीचे ते शब्द ऐकून रामस्वामी व मोहना यानींहि वर पाहिलें, तों तेथे कड्याच्या टोंकाशीं शू खलाबद्ध असे कांहीं अभागी जीव उभे असलेले त्यांना दिसून आळे. त्या अभागी जीवांचा आतां इतक्यांत कडेलोट होणार हें टरल्यासारखेंच होतें. परंतु त्यांच्यासाठी हळहळण्याइतकी देखील उसंत राफझस्कामी', राणी वगेरे मंडळींना नव्हती. रामस्वामीनें प्रसंगावधान राखून त्याच क्षणीं राणी व मोहना यांना बुरखे घेण्याला सांगून म्हटलें, “ कदेनकाळ आपल्यावर घाला घालण्यासाठी आपल्या पाठीमागून पाळत राखीत आहे हे ध्यानांत ठेवून सावधपणानें वागा- ” | त्या*च वेळी किल्यावर चंदासाहेबानें कसा अनर्थ मांडिला होता याची' कल्यना वाकान त्या अभागी बंदिवानांचा पूर्वोक्त ओझरता निर्देश ऐकून आलीच
१.५५. १९..”१४५..४०१ ४४.८ ७८४४७. ४ ४६.४ १९..४ ७.४ 0७ ४ ७८ 0.४ ७ ७७०४४०४ ७
१०४ पेशवाईचे मन्वेतर
असेल. चंदासाहेबाच्या भनांत हिंदूंविषयीं इतकी भयंकर तेढ उत्पन्न झाली होती. परंतु या पूर्वीच त्या तेढीचा मासला वाचकांना स्थूलत:ः कळून चुकला आहे, तेव्हां त्याची येथें द्विर्क्ति करण्याचें कारण नाहीं. ह्या चळ- चळ्या हिंदूंच्या वर्मी घाव घालावा म्हणून चंदासाहेबानें प्रथम तेथल्या महा- देवाच्या देवालयाचा विध्वंस करण्याचें ठरवून तशी जाहीर घोषणा केली आणि ताबडतोब आपल्या विश्वासांतील यवन धर्माधिकार्यांना बोलावून त्या घोषणेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्या टापूंतील सवे हिंदूंना अत्यंत पूज्य वाटणारे तें महादेवाचे देवालय गोहृत्त्येच्या निषिद्ध प्रकाराने तर भ्रष्ट झालेंच; पण प्रत्यक्ष शिवलिंग देखील त्या निषिद्ध वस्तूर्ने भ्रष्ट करण्याला यवन धर्माधिकाऱ्यांनीं कमी केलें नाहीं! चंदासाहेब तो सर्व प्रकार समक्ष तेथें उभा राहून आपल्या डोळ्यांदेखत घडवून आणीत होता! इतकेंच काय पण चळवळ्या हिंदूंना दहशत बसावी म्हणून त्यानें किल्ल्यांतील बर्याच अधिकाऱ्यांना व प्रमुख नागरिकांना तेथें समक्ष हजर राहण्याला भाग पाडलें होतें. सांगकाम्या मजुरांचा एक मोठा ताफा हातांत खोरीं व फावडीं घेऊन वरिष्ठांच्या हुकूमाबरोबर तें देवालय जमीनदोस्त करण्यासाठीं उभा होता. परंतु तसें नव्हे, खरें बोलावयाचे तर त्या गरीब मजूरांवर असा आरोप एकाएकीं करणें बरें नाहीं. केवळ त्या देवालय-विध्वंसाच्या कार्या- साठीं त्या अजाण लोकांना तेथें सरकारी अधिकार्यांनी वेठीला धरून आणलें असेल, पण आपणांला आतां कोणतें काम करावयाचें आहे, याची त्यांना खरोखर कल्पनाच नव्ह्ती. ते इतर हिद्ंबरोबरच विस्मयचकित चित्ताने तेथल्या एकंदर प्रकाराकडे लक्षपर्वक पहात उभे होते. थोड्या वेळाने चंदासाहेबाच्या हुकुमावरून शिवलिंग भ्रष्ट करण्यासाठीं कांहीं यवन पुढे सरसावले; त्यावेळीं मात्र तेथल्या सर्वे हिंदूंच्या अंगावर कांटा उभा राहिला व कांहीं प्रमुख हिंदूंनीं तर चंदासाहेबाच्या हातांपायां पडून तसा अनर्थे न करण्याबददळ त्याला विनवलेंही. परंतु चंदासाहेबानें त्यांना माझ्या 'तोंडून निघालेले शब्द तडीला गेलेच पाहिजेत. चंदासाहेबाचे शब्द म्हणजे वाऱ्यावरची फुकाची बडबड नव्हे अशी सर्वे लोकांची खात्री झाली नाहीं तर माझा वचक येथल्या लोकांवर राहाणार नाहीं; यास्तव मला यावेळीं अंत:- करण कठोर करून या सवे गोष्टी पार पाडल्याच पाहिजेत. असें निक्षून
सर्प दुखावला गेला १०५ सांगून आपला हेका चालविला. आणखी अंमळशानें जेव्हां त्यानें देवालयाच्या गाभाऱ्यांतील शिवलिंग खणून काढण्याविषयीं वेठीच्या मज्रांना आज्ञा केली तेव्हां ती ऐकून तेथल्या सर्व हिंदच्या-त्या पोटार्थी मजुरांच्याही हूदयांवर वज्रा- घात झाल्यासारखे झालें. त्यांनीं त्याच क्षणीं आपलीं हत्यारें खालीं ठेवलीं आणि हात जोडून सांगितलें, “ मालिक असलें अधमपणार्चे कृत्य आपण आम्हांला करावयाला सांगू नका. आमच्या देवाची आम्ही अक्षी विटंबना केळी तर आमच्या हिंदु या थोर नांवाला काळोखी लागेल. आम्ही आपली अन्य काय वाटेल ती सेवा करूं, परंतु आमचा देव, आमचा धर्म आणि आमची अद्रू यांवर घाला घालण्यासाठी साक्षात् सेतान पुढें आला तरी आम्ही त्याला डरणार नाहीं व मारूं किवा मरूं अश्या निश्चयानें त्याच्याशीं दोन हात कर- 'ग्याला आम्ही कमी करणार नाहीं. आम्हांला असल्या आड मागनिं जाण्याला आपण भाग पाडूं नये. ”
एखाद्या नवखंड पृथ्वीच्या समग्यबाटावर, तो खवळलेल्या सागरांतून दिमा- खाने आपली नौका हांकोत चालला असतांना वादळामुळे जसा प्रसंग यावा तसाच प्रसंग चंदासाहेबाच्यावर त्यावेळीं ओढवला होता. नवखंड पृथ्वीचा 'सस्राट झाला म्हणून खवळलेल्या महासागराच्या लाटांनीं त्याची नौका उलळ्थी पालथी करून त्याला जलसमाधी देण्याचें मनांत आणल्यावर त्याची 'सम्राट्सत्ता तेथें काय कामाला येणार! चंदासाहेबाला त्रिचनापल्लीच्या राज्यांत इतका मग्रूरपणा चढला होता कीं, मी माझ्या शब्दासमोर पंचमहा- भूतांनाहि वांकवूं शकेन, असा फाजील आत्मविश्वास त्याला वाटत होता. परंतु तो ज्या सेनिकांवर आपली अबाधित हुकमत गाजवण्यासाठीं दिमाखाने 'तेथें उभा होता, त्यांनींच त्याची आज्ञा अमान्य करून निस्पृहतेची शिकस्त केल्यावर त्यांना पुन्हां हुकूम करण्याचें धेर्य त्याला झालें नाहीं. पुन्हां हुकूम करण बाजूलाच राहिले, आतां त्या बिथरलेल्या लोकसमूहांत एकट्याने उभें रहाणे देखील चंदासाहेबाला धोक्याचे वाटं लागलें. मनांतून तो मारे खूप दांत ओठ खात होता कीं, जरा संधि सांपडतांच मी या सर्व बंडखोरांचा नायनाट करून टाकीन आणि यांच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवन त्यांचें एकहि घर अथवा देवालय नांवालादेखील उभें राह देणार नाहीं 'परंतु ह्या सर्व गोष्टी तेथून स्वतः तो बचावून गेल्यावंतरच्या होत्या. हा विवेक
१०६ पेशवाईचे मन्वंतर त्याच्या डोक्यांत आला व तो एक चकार शब्दहि न बोलतां तेथल्या मंडळींना तेथेंच सोडन तडक माध्णरा वळला.
“ हा दुखावलेला सर्प फोफावत दूर निघून जात आहे, हा केव्हां घात करील याचा नियम नाहीं. ” त्या बंडखोरांपेकी एकजण दुसऱ्याच्या कानाशीं लागून म्हणाला. दुसरा तेंच तिसऱ्यापाशीं बोलला. तिसरा चोौथ्यापाशी' बोलला. असा हां हां म्हणतां त्या गोष्टीचा पराचा पारवा होऊन, चंदासाहेब झाल्या अपमानाचा सूड उगविण्यासाठींच रागाने फणफणत चालला आहे अश्या समजुतीने तेथल्या सर्व हिंदूची अंतःकरणें घेरून टाकिलीं. चंदासाहे-. बाच्या अंगीं इतका दुष्टपणा असल्याबद्दल कोणालाहि शंका नव्ह्ती; व आपण त्याची आज्ञा अमान्य केल्याबद्दल तो आपल्या सर्वांचे वाटोळे करणार असें तेथला प्रत्येक हिट ओळखून चुकला होता. पण एकदां सर्वस्व मातीला मिळ-- णार अशी खात्री झाल्यावर त्या लोकांना भीति बाळगण्याचें कांहींच कारण उरलें नाहीं. ' आपण केलें यापेक्षां कांहींहि अधिक केलें नाहीं तरीहि आपली वाताहत करण्याला तो चांडाळ कमी करणार नाहीं, मग मरावयाचें तर शक्य तितकी आपल्या देशाची आणि धर्माची सेवा बजावून कां मरू नये ?' अशा निर्धाराने तो मजुरांचा तांडा हातांतील हत्यारें खांद्यावर टाकून चंदा-- साहेबाला तडक आडवा गेला आणि एकमुखार्ने त्याला म्हणाला, “ आपण' महादेवाच्या देवालयाला किचित् देखील धक्का लावणार नाहीं असें आरवा- सन दिल्याशिवाय आम्ही आपल्याला एक पाऊलदेखील पुढें टाकं देणार नाहीं.
चंदासाहेबानें एकंदर. रागरंग पाहून निरुपायानें तसें आश्वासन दिले व आपला मार्ग एकदांचा मोकळा करून घेतला, परंतु त्याच वेळीं तो मनांतल्या-. मनांत हंसून म्हणाला, “ मूर्ख ! नेभळट ! राणीसारख्या चतुर स्त्रीला देखील खोटी शपथ देऊन मी रसातळाला नेलें, तेथें ह्या कुत्र्या-बकर््यांना ' मी थोडीच दाद देतों ! थांबा म्हणावें, आणखी एका प्रहराच्या आंत तुम्हांला ह्या चंदासाहेबारचें खरें स्वरूप दिसेल. ”
चंदासाहेब गेल्यावर आजच्यापुरते तरी महादेवाच्या देवळांवरीळ संकट टळलें अशा समजुतीनें सर्व हिंदू माघारे गेले. त्या प्रकाराला घटका दीड घटका झाली असेल नसेल तोंच चंदासाहेबाचे लष्करी यमदूत कांहीं विशिष्ट छोकांच्या घरांना गराडा घालून त्यांना केद करून महादेवाच्या टेकडीकडे
सर्प दुखावला गेला १ ०७
चालवू लागले. हे लोक अर्थातच चंदासाहेबाला देवालय-विध्वंसाच्या बाबतींत प्रतिकार करणारांपैकीं प्रमुख होते अश्या निवडक लोकांना बंदिवान करून कडेलोट करण्यासाठीं महादेवाच्या टेकडीवर सकत लष्करी पहाऱर््यांत उभे करण्यांत आलें, त्याच वेळीं राणी, मोहना व रामस्वामा नौकेतून जात. असल्यामुळें त्यांना तो भयंकर देखावा दिसला.
त्या बंदिवानांची पुढे काय द्या झाली असेल?
> पकरण १९८ व प्रसादचिन्हांचा स॒गावा "व्वा
रर्[तारा व त्रिचनापल्ली एथील घडामोडींचा आपणाला स्थूलतः परिचय
झालाच आहे. आतां आपणाला प्रथम तंजावरकडील घडामोडींचा विचार करावयाचा आहे. करुणाराणी आपल्या धर्मपित्याच्या अर्थात् झंझ्ाररावाच्या आजारीपणामुळें राजाज्ञेने त्याची अखेरची भेट घेण्यासाठीं गेली, व मानाजी- 'राव देखील त्यापूर्वीच अपरूपाराणीच्या कारस्थानाचा शोध लावण्यासाठीं कोठे तरी बाहेर निघून गेला होता, हें वाचकांना पूर्वीच माहीत झालें आहे. प्रतापसिंह महाराजांनीं संशयग्रस्त चित्ताने करुणाराणी व मानाजीराव यांना पकडून आणण्याचा हुकूम सखोजीला दिल्यानंतर हुकमाचा बंदा या नात्यानें 'सखोजीला राजाज्ञेची तामिली करणें प्राप्त होतें. त्यानें त्या कामावर सैनिक 'खवाना केलेही. करुणाराणीचा सुगावा प्रथम लागावयाचा म्हणजे तिच्या माहेरी मध्यार्जुनांत अर्थात् शुक्षाररावांच्या गांवीं, म्हणून त्या कामगिरीवर निघालेल्या सेनिकांनीं प्रथम मध्यार्जुनाला वेढा दिला. परंतु तेथें झंजार- रावाच्या घरीं जाऊन पाहतात तों तेथें झुंजाररावहि नाहीं आणि करुणा- राणीहि नाहीं ! वास्तविक राजकारणांत लक्ष घालण्याचें काम सैनिकांचे नव्हे हें जरी खरें, तरी नजरेपुढून किवा कानांवरून जाणाऱ्या गोष्टींत निष्का- 'रण मन घालण्याचा मोह मनुष्याला कधीं आंवरत नाहीं, हा मनुष्यमात्राचा 'स्वभावसिद्ध गुणच आहे. कोणी पाहिजे तर त्याला चौकसपणा म्हणावा किवा कोणी दुर्गुण म्हणावा. पण आहे हें असें आहे. झंजारराव व करुणा- राणी तेथें न सांपडतांच त्या सैनिकांच्या तुकडीवरीक म्होरक््याला सक्रहर्शनीं संशय आला कीं, राणी आणि झंजारराव हीं दोघेहि महाराजांना संशय आल्या- 'अ्रमाणें शत्रूला सामील झालीं असलीं पाहिजेत खास ! आणि झंजाररावाच्या आजारीपणाचा खोटा बोभाटा करण्यांत तरी येन केन प्रकारेण करुणेला तंजावरच्या राज्यांतून बाहेर बोलावून घेण्याचा त्याचा डाव असावा. ताबडतोब त्या म्होरक्यारने गांवांत आपल्या सेनिकांमा्फत झुंजाररावाविषयीं
प्रसादर्चिन्हांचा सुगावा १०९,
कसून चौकशी चालविली, तेव्हां करुणाराणी चार-पांच दिवसांपूर्वी तेथें आल्याचें व तिच्यासह झंजारराव कोठें तरी बाहेर गांवीं निघून गेल्याचे त्यांना कळून आलें.
तरीहि ते सेनिक आणखी एक सबंध दिवस तेथें त्या मंडळींचा शोध करीत व आल्यागेल्यावर पाळत ठेवीत राहिले होते. इतकें करूनहि कांहीं तपास लागत नाहीं असें पाहतांच त्यांनीं आपसांत विचारविनिमय करून तके केला कीं, 'ज्या अर्थी झंजारराव येथें नाहीं व राजवाड्यांतील प्रासादिक तरवारीं- सह करुणा राणीहि बेपत्ता झाली आहे, त्याअर्थी कोणा तरी शत्रुपक्षाच्या माण- साशीं संगनमत करण्यासाठीं तीं दोघें गेलीं असलीं पाहिजेत हें उघड आहे.' चंदासाहेबानें प्रतापसिहाला लिहिलेलें धमकीवजा पत्र त्या सैनिकांना माहीत होतें. त्यामुळे करुणा राणी, झ्ंजारराव व मानाजी ही मंडळी चंदासाहेबाला सामील आहेत कीं काय, अशी शंका सकृतहरशंनीं त्यांच्या मनांत आली व त्यांनीं त्या रोंखानें तपास करण्याचें ठरविलें. परंतु प्रवासांत त्यांच्या अनुभवाला जो प्रकार आला तो अगदींच निराळा. त्रिचनापल्लीच्या रोंखानें मजल दर- मजल करीत ते सेनिक चालले असतां त्यांना एका एकान्तवासाच्या ठिकाणीं भर जंगलांत कोणी तरी माणूस वस्ती करीत असल्याची शंका आली; तसेंच आपलीसुद्धां शच्तूला शंका येऊं नये म्हणून ते सैनिक आपल्या सेनापतीच्या आज्ञेवरून दहा दिशांना पांगून त्या एकांत स्थलाच्या कारस्थानाचा सुगावा घेऊं लागले. तोंच अपरूपा राणी आणि कोयाजी ही कारस्थानी जोडी आपल्या थोड्याशा अनृचरांसह तेथें थांबून कांहीं खलबत करीत आहेत असें तंजावर- कडून आलेल्या मृख्य सैनिकाच्या निदर्शनाला आलें. त्यानें अत्यंत सावध- पणानें वेषांतर करून त्या वसतिस्थानांत प्रवेश मिळविला. त्यामुळें त्याला त्यांचे खलबत ओळखण्याचा मार्ग बराच मोकळा झाला. आपणाविषयोीं कोणालीहि संशय येऊं नये म्हणून त्या म्होरक्या सेनिकानें आणखी थोडें धाडस करून आपण अपरूपा राणीचे पक्षपाती आहोंत असें नाना उपायांनीं तेथल्या संडळींना भासविण्याला कमी केलें नाहीं. त्याला तेथें प्रवेश मिळाला त्यावेळीं अपरूपाराणी आणि कोयाजी घाटगे यांचें पुढीलप्रमाणें संभाषण सुरू असलेले त्याला ओझरते एऐंकावयाला मिळालें. कोयाजी म्हणाला, “मी चंदासाहेबाची भेट घेऊन त्याला आपण दिलेली प्रासादिक तरवारींची देणगी
११.० पेशवाईचे मन्वतर देऊन आलों आहें, व त्यानेंहि आपल्या इच्छेप्रमाणे प्रतापसिहाच्या राज्याचा : नायनाट करून सयाजीरावाला तंजावरच्या गादीवर बसविण्याचें कबल केलें आहे. अर्थात् तो एक प्रश्न मिटला.
राणी म्हणाली, “ पण मुरारराव घोरपड्यासारखा आपला जबरा रात्रू : बलवत्तरपणें आजूबाजूला थेमान घालीत आहे त्याची वाट काय ? ”
कोयाजी म्हणाला, “ त्याचाहि बंदोबस्त चंदासाहेबानें अगदीं बेमालमपणे केळा आहे. इतक्यांत मुरारराव घोरपडे चंदासाहेबानें फेकलेल्या कारस्था- ' स्थानाच्या जाळ्यांत अडकून पडला असेळ अथवा पडेल. त्याप्रमाणेंच ' मराठ्यांच्या फौजेची छावणी शिवगंगेला आहे, तिची' पांगापांग करण्याची : मीं एक अजब युक्ति चंदासाहेबाला सुचविली आहे. ती जर अंमलांत आली . तर आपणाला मराठ्यांच्या सेन्याची व सेनापतीची भीति बाळगण्याचे लव- . भात्र कारण नाहीं. सुदेवानें रघोजी भोंसले वगेरे मंडळी सातार््याकडे - गंतली आहेत. ”
राणी म्हणाली, “ पण ती मंडळी लवकरच नव्या तयारीने इकडे येतील असें मला वाटतें. चंदासाहेबाच्या मनांत तंजावरच्या गादीविषयीं धुमसत असलेला द्वेषभाव प्रतापसिहाला पूर्वीपासून माहीत आहे व त्यानें तसाच प्रसंग पडला तर चंदासाहेबाचा प्रतिकार करण्यासाठीं सातार्याला जासूद . पाठवून मदतीची योजनाही केली आहे. “ तसें असलें तरी कुठें सातारा आणि कुठें तंजावर! एवढा मोठा ' मुळूख तुडवीत मराठे इकडे येईतों त्यांना मधल्या मध्यें गांठण्याची युक्ति “आम्हांला सुचली नाहीं तर आम्ही कारस्थानीं माणसे कसलीं! राणीसाहेब, आपण पूर्णपणें निश्चित असा. आगीच्या एका ठिणगींत ज्याप्रमाणें : व्रम्हांडाचें भस्म करण्याचें सामर्थ्ये असतें त्याप्रमाणे या कोयाजी घाटग्याच्या बचकभर मेंदूंत ब्रह्मांडाची उलथापालथ करण्याच्या इलमा ओतप्रोत भर- ' लेल्या आहेत. फक्त मला च्विता आहे ती करुणाराणी आणि मानाजीराव . यांचीच. मानाजी मूळपासून आपणाला पाण्यांत पहातो, आणि करुणा राणीवर त्याचें विशेष वजन आहे. तीं दोघें देशांतल्या देशांत जर : ढवळाढवळ करूं लागलीं, तर मात्र आपणाला आपला कार्यभाग साधा- : वयाला थोडेसें जड जाईल. कारण आपणाविषयीं काय किवा माझ्याविषयी
प्रसाद्चिन्हांचा सुगावा | १११ काय लोकमत फारसें शद्ध नाहीं, त्याचा फायदा घेऊन मानाजी आपणांसमोर दंड ठोकून उभा राहूं शकेल.
अपरूपा राणी खदिरांगारांसारखे डोळे लाल करून तरवारीच्या वधारे- 'प्रमाणे तीक्ष्ण वाणीने उद्गारली. “ मानाजी दंड थोपटून आमच्या समोर उभा राहिला तर त्याचे दंड मोडून त्याला जमीनदोस्त करण्याला हो अप- रूपाराणी माघार घ्यावयाची नाहीं. करुणा तर बोलून चाळून भाबडी 'पौर आहे. तिच्या आयुष्याला मीं जी च॒ड लाविली आहे ती न विझतां तिचा बळी घेईल याविषयीं मला मळींच रांका ताहीं, पण इतके कशाला ? झंजार- राव, मानाजी व करुणा यांना पकडण्याचा हुकूम प्रतापसिहानें पूर्वीच सोडला आहे. ती जाऊत कोठे जाणार ? माझे हेर त्यांच्या पाळतीवर आहेत. 'ती सप्तपाताळांत लपून वसली तरी तेथवर तलास लावून राजशयासनाच्या 'फांसावर त्यांना लटकावण्याला पुरेसे सामर्थ्ये माझ्या कारस्थानांत आहे.
हें संभाषण ऐकून त्या सैनिकाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या- चित्तवृत्तींत एकाएकीं एवढा जबरदस्त फरक घडन आला कोौं त्या- 'च्यानें तेथें श्ञांतपर्णे बसवेना देखील. तो कसल्याशा जोमदार कल्पनेंबरोबर तीरासारखा तेथून बाहेर निसटला व शून्य चित्ताने मार्गातून एकएक पाऊल टाकोत मंद गतीनें चाल लागला. “ अपरूपाराणी इतकी पाषाणहृदयी आहे काय ; आणि कोयाजी तिचा साथीदार. करुणाराणीसाहेबांना संकटाच्या गर्तेत लोटण्यासाठीं यांनींच हें कृष्ण कारस्थान रचिले असें जर महाराजांना कळलें, तर राणीसाहेबांवरचें संकट टळून त्या अपराध्यांना योग्य शासन व्हाव- याला उद्यीर लागणार नाहीं. पण ही कामगिरी कोणीं करावी ! माझ्या- सारखा सामान्य सेनिक महाराजांपाशीं जाऊन त्यांना हा प्रकार सांगूं लागला बस्तर महाराज त्यावर विश्वास कसा ठेवतील ? बरें; महाराजांना न सांगावे तर ही दुष्ट जोडी राणीचा व त्याबरोबरच महाराजांचाहि समूळ सत्याताश “केल्याखेरीज रहाणार नाहींत. तो दीड दमडीचा कमअस्सल सयाजी राज- वाड्यांतील एका बटकीचा पोर तंजावरच्या गादीवर बसलेला ह्या कुलटेला 'पाहवतो, यावरून मला संशय येतो कीं, खऱ्या राजवटीचा लवलेशहि या चांडाळणी'च्या अंगीं नसावा. तंजावरच्या सबंध राजकारणाची आजवर -वाताहात करूनहि हिचे समाधान झालें नाहीं, म्हणून ही आतां परक्या शत्रूला
११२ पेशवाईचें मन्वंतर
सामील होऊन तंजावरच्या राज्याला कायमची मूठमाती देऊं पहात आहे!
पण म्हणावे, तंजावरची हिंदु रयत असल्या कुटिल कारस्थानांत सहज फंसली जाण्याइतकी भोळसट किवा प्रमादकारक राजाज्ञेला बळी पडण्याइतकी षंढ खास बनली नाहीं. ” तो मध्येच एकाएकीं थांबला आणि डोकें खाजवीत स्वतःशीं पुन्हां विचार करण्यांत गढून गेला, “ मीं याच पावलीं माघारा जाऊन त्या दुकलीला ठार केलें तर काय होईल ? महाराज, करुणा राणीसाहेब यांच्या- वरचें एक जिवंत संकट टाळल्यासारखें होणार नाहीं काय ? ” तो पुन्हां थांबून पुन्हा स्वतःशीं विचार करूं ्लागला, “ पण ही एक दुक्कल जगांतून नाहींशी झाल्याने महाराजांची संशयनिवृत्ति कशी होगार ? आणि त्यांची संशय- निवृत्ति झाली नाहीं तर राणीसाहेबांवरचें संकट कसें टळणार ? महाराज इतके ज्यासाठीं संतापळे व निष्ठ्र बनले त्या प्रासादिक तरवारींचाहि सुदेवानें आतां तपास लागल्यासारखाच आहे. परंतु ही अपरूपा अवदसा महाराजांच्या विशवासांतील पडली; तिला ठार मारून, तिचा अपराध मी महाराजांपाशीं कसा शाबीत करूं | चंदासाहेबापाशीं प्रासादिक तलवारी आहेत असें मीं टाहो फोडून महाराजांना सांगितलें तरी त्यांना तें खरें वाटणार नाहीं; उलट माझ्यावर मात्र करुणा राणीसाहेबांना फितूर असल्याचा आरोप करण्यांत येईल आणि ह॒कनाहक माझा संशयाच्या भरांत बळी घेतला जाईल. देश्यापरी देशाची सेवा घडणार नाहीं, राजापरी राजाची सेवा घडणार नाहीं, राणीपरी' राणीचें रक्षण हातून होणार नाहीं. अ्या कवडीमोलाने स्वत:चे जीवित विकण्याइतका मी टाकाऊ मनष्य आहें काय? ” हे शब्द मनाशीं उच्चारतांना त्या सैनिकाचे डोळे विस्फारित झाले होते व सर्वांग पुलकित झालें होतें. जणू काय एखादी दिव्य शक्ति आपल्या अंगांत उत्पन्न झाली आहे, अश्या आत्म- विश्वासाने उभा राहून तो परिस्थितीचे अंतनिरीक्षण करीत होता. ह्या विचारांच्या ओघाबरोबर आपण कोठें वहात चाललों आहोंत व आतां कोठें थांबलो आहोंत याचें देखील त्याला भान नव्हतें. तो स्वतःला पूर्णपणें विसरला होता. आणखी थोडा वेळ तो तसाच गूढ विचारांत रंगलेला असतांनाच रस्त्याने पुढे पुढ चालत गेला तोंच एका वृक्षाच्या बुंध्याशी त्याला कसली तरी छाया दिसली व कांहींशीं चाहुळ लागली. ती रात्रीची भयाण वेळ असल्यानें व ती जागाही निर्जन असल्यानें त्या सेनिकाला तो संशयित प्रकार पाहून
प्रसादचिन्हांचा सुगावा ११३ दचकल्यासारखें झालें. तो मनांत म्हणाला, “ येथें कोणी भतपिश्याच्च तर नसेल कीं शत्रूचा कोणी मनुष्य येथें दबा धरून तर बसला असेल! ” असे प्रश्न मनाशीं विचारीत विचारीत तो पुर्ण भानावर येऊन समोर पाहूं लागला, तों त्याला दिसून आलें कों आपल्याला जी छाया दिसली ती केवळ छाया नव्हती, तो एक घोडा वृक्षाच्या बुंध्याशी बांधळेला होता.
अर्थात् येथे जवळपासच त्या घोड्याचा मालक असला पाहिजे, असें त्या सैनिकाच्या मनानें घेतलें व तो कोण असावा हें जाणण्याची जिज्ञासा त्याच्या मनांत उत्पन्न झालो. त्याबरोबर, तो जर शत्रू असेल तर मात्र आपणांवर कठीण प्रसंग ओढवला, या भीतीनेंहि त्याच्या मनांत थोडीथोडी कालवा- कालव सुरू केली. त्याला एकदां मन सांगे पुढें जावें, तेथें कोण आहे हें पहावें व कोणी नसल्यास त्या घोड्यावर मांड टाकून आपल्या मकाणाकडे निघून जावें. तो सेनिक बराच श्रमलेला असल्यानें श्रमपरिहाराचा हा उपाय त्याला प्रथम सुचला. पण त्याबरोबरच आपण पुढें गेल्यास आपल्या प्राणांवर तर बेतणार नाहीं ना, असा प्रश्न त्याला तेंच मन निराळ्या भाषेंत विचारू लागलें. आतां काय करावें आणि काय न करावें अश्या विचारानें त्याचें मन गोंधळून गेलें. तोंच त्या झाडाच्या बृध्याजवळून कोठून तरी त्याला खड्या आवाजांत सवाल केला गेला, “ कोण आहे. ?”
तो प्रश्न ऐकून त्या सेनिकाच्या मनाला अंमळ धक्का बसल्यासारखा झाला. तो जरी भित्रा नव्हता तरी अचानक प्राप्त झालेल्या बिकट परिस्थिती- मुळें तो गोंधळल्यासारखा झाला एवढें खरें. तो जागच्या जागीं स्तब्ध उभा राहिलेला पाहून त्याला पुन्हां पूर्ववत् सवाल टाकला गेला, “तू कोण आहेस ? लवकर उत्तर दे, नाहींतर प्राणाला मुकशील. ”
पुर्वीचा तोच हा देखील स्वर खरा, परंतु पूर्वी त्या सेनिकाला त्याची जी ओळख पटली नव्हती ती आतां ओझरती तरी पटली. तो चार पावलें पुढें येऊन चौकशी करणार, तोंच हातांत तळवार घेऊन एक धिप्पाड पुरुष अक- स्मातू त्याच्या समोर येऊन उभा राहिला व तलवार उगारून दरडावून त्याला विचारू लागला, “ तू कोण आहेस? ”
“ कोण मानाजीराव ? ” त्या सेनिकाने आश्चरयंपूर्ण पण कांहींशा निर्भय
वृत्तीने विचारलें. त्या प्रश्नांत असें काय अजब देवी सामर्थ्यं होतें न कळे, टू
११४ पेशवाईचे मन्वंतर समोरच्या तरुणाच्या हातांतील तलवार आपोआप हळुहळू खालीं आली व तो त्या सेनिकाकडे निरखून पाहूं लागला.
अंमळशानें त्या तरुणाने-परंतु तो मानाजीराव होता हें आतां आपणाला माहीत झालेंच आहे. त्याअर्थी त्याला त्याच नांवानें ओळखण्याला आपणाला हरकत नाहीं. मानाजीरावानें त्या सेनिकाकडें कांहीं क्षण निरखून पहात पुर्वीपेक्षा सोम्य शब्दांत विचारलें, “संभाजी, तूं का तो ? बहुधा मला करुणाराणीसाहेबांना पकडण्याच्या कामगिरीवर तुझी योजना झाली असेल! ”
“ पण हें तुम्ही कशावरून ओळखलें ? ”
*“ त्यांत अवघड काय आहे ? तुम्ही सयाजीरावाचे पक्षपाती व कोयाजी घाटग्याचे त्रद्ृणातुबंधी ! तुम्हीं राजांचे अन्नच खाऊत त्यांच्या नाशासाठी झटलां नाहीं तरच आडचर्य !
“ तुम्ही म्हणालां ती गोष्ट खरी आहे. परंतु हा संभाजी मात्र त्याला अपवाद आहे. निदान आतां तरी तो अपवाद ठरला आहे. यापुर्वी मी असल्या हीन कामगिरींत सामील झालों तो केवळ फंसून, पण प्रत्यक्ष महाराजदेखील जिथें कोयाजी' आणि अपरूपा राणी यांच्या कृष्ण कारस्थानाला बळी पडले, तिथें माझ्यासारख्या य:करिंचत् माणसाची काय कथा? ”
“ बरें; आतां मला ही वायफळ गप्पांची लांबड नको आहे. तूं अद्या अप- रात्रीं इकडे कां व कसा आलास त्याची मला खात्री करून दे, तरच तुझ्या शब्दांवर माझा विश्वास बसेळ; नाहींपेक्षां तुला शत्रू समजून मला तुझें पारि- फत्य करावें लागेल.” मानाजीराव उद्गारला.
“ आणि तुम्हांला कालत्रयींहि न मिळणारी माहिती मीं पुरवली आणि त्यामुळें महाराजांच्या आणि राज्याच्या तरणोपायाचा राजमार्ग तुम्हांला सांपडला तर तुम्द्री मला काय बक्षीस देणार?” संभाजीनें निर्भयपणे विचारलें. त्याचा हा प्रश्न अर्थातच विनोदाचा होता. त्याच वेळीं त्यानें सखोजीकडून आपली ह्या कामगिरीवर कशी नेमणूक झाली हा वृन्तातही निवेदन केला. सखोजी देखील आपणावर उलटला याचा मानाजीला विस्मय वाटला. पण तो त्यानें बाहेर दाखविला नाहीं. तरी बरें कीं महाराजांचे मन खरोखर किती कलुषित झालें आहे याची संभाजीलाही माहिती नसल्यामुळें तो वृत्तांन्त मानाजींला कळला नाहीं. त्रो कळला असतां तर त्याला षपराकाष्टंचा खेद
प्रसादचिन्हांचा सुगावा १ १" झाला असता. असो. संभाजी आपण होऊनच पुढें म्हणाला, “ पण मानाजी- राव, इतर कशावर नाहीं तरी माझ्या अस्सल हिंदुत्वावर-नेकजात मराठे- 'पणावर तरी तुमचा विश्वास असला पाहिजे. खऱ्या मराठ्याची' ओळख खऱ्या मराठ्याला नाहीं, असें आजवर कधीं तरी झालें आहे? अपख्पा आणि कोयाजी यांच्या कृष्ण-कारस्थानाचें बिंग मला अचानक कळून चुकले आहे- त्यांना पायबंद कसा घालावयाचा याच चितेनें मला इतका वेळ घेरले होतें. तोंच तुम्ही भेटलां, परमेश्वर पावला ! मीं जर त्या दोघांचा बेत आपणाला सांगितला तर त्यांचा या क्षणीं बंदोबस्त करण्याची तुमची तयारी आहे काय?”
“ सांग, मला प्रथम त्यांचा पत्ता सांग. मी पुढच्या सवं गोष्टी' पहातों. ”
“ परंतु त्यांना दुखवणें म्हणजे सर्पाच्या शेपटीवर पाय टाकण्यासारखें आहे हें तुम्ही जाणतांच. जर का तुमच्या हातून त्यांचें पारिपत्य झालें नाहीं, तर तुमची आमची धडगत नाहीं हें पक्के समजा. ”
“त्याची काळजी तुला नको. सर्पाशीं खेळतांना त्याचे दांत पाडून खेळावें एवढें व्यवहारज्ञान मला आहे; आणि दांत पाडण्याची कलादेखीळ भला अवगत आहे. तूं मला फक्त त्यांचा पत्ता सांग म्हणजे झालें. ”
“ चला तर माझ्या मागोमाग. ” असें म्हणून संभाजी पुढें चाळू लागला. मानाजीरावानें आपला घोडा झाडाच्या बुंध्यापासुन सोडून संभाजीच्या मागोमाग आपल्याबरोबर चालविला. बरेंच अंतर चाळून गेल्यावर एका पडक्या घराच्या आडोशाला संभाजीनें मानाजीरावाला नेलें व सांगितलें, * आपल्या घोड्याला थोडा वेळ या ठिकाणीं डांबून ठेवा. किवा असें करा, तुम्ही देखील येथेंच थांबा; मी एकवार चाहूल घेऊन येतों.
संभाजीने इतका मनमोकळेपणा दाखविला तरी देखील मानाजीराव त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकण्याला मनापासून राजी नव्हता. न जाणो, हा राणीचा पक्षपाती, राणीला आपल्या आगमनाची खबर देऊन आपणाला गोत्मांत आणणार नाहीं कशावरून? असें स्वतःशीं म्हणून ती संभाजीच्या बरोबर चालू लागला. त्याला संशय येऊं नये म्हणून मानाजीनें आपल्या कृतीचे समर्थन केलें, “ तुझ्याविषयी जर राणीला संराय आला असेल तर ती तुला दगा दिल्याशिवाय रहाणार नाहीं. अश्या वेळीं एकाला दोन भाणसें बरोबर असलेली बरीं. चल मीहि तुझ्यावरोबर येतों. ”
११६ पेशवाईचे मन्वेतर संभाजीनें यावर जास्त आढेवेढे घेतले नाहींत. ते दोघेटि साजथगिरीनें त्या विशिष्ट स्थळीं जाऊन पोहोंचल व जवळच्या गर्दे लाटींत लपून बसून
को न
तेथून त्य़ा मंडळीच्या हालचाली अवलोकन करू लागळे. तोंच ती मंडळी पूढील मकाणाकडे निघण्याच्या तयारींत आहेत असें त्या दोषांना आढळून आलें. त्या ठिकाणीं कांहीं लोकांच्या हातांत मशाली तेटबिळेल्या त्या दोघांना दुरून दिसल्या, व अपर्पा राणी आणि कोयाजी हीं दोघेही दोन घोड्यांवर स्वार झालेलींही त्यांनीं पाहिली.
““ही मंडळी तर निघाली 1 आतां कसें करावयाचें ? " संभाजीने माना- जीला हळूच विचारले-
“ आता आपण असें करू, तूं हया मंडळींच्या मागोमाग राठ्न त्यांच्यावर नजर ठेव; तोंबर मी त्य़ांचा बंदोबस्त करण्यानी तजवीज करतों. तुळा जर शक्य असेल तर त्यांचा रोख कोणीकडे आहे याजी माटिती काढून मला कळव. मी आतां जातों. ' असे म्हणून मानाजीराय मागे पसन चपळाईने आपल्या घोड्यावर स्वार झाला.
“ चरंतु आतां तुमची माझी भट पुन्ट | कोडे होणार ? " संभाजीने विचारठे.
“ तुझी माझी मेट ! " मानाजीराव जातां जातां किवित् विचार करून उद्गारला, “ बहुधा ही मंडळी कांचनगडच्या र गाने चाळी असाधी. कारण अशा अपरात्री त्यांना अन्स ड्िकाणीं जातां येणे शक्यच नाही. कांबन- गडचा किल्ळेवार अपख्पाराणीचा पक्षपाती आठे हे मठा माहीत आहे. तेथे आपल्या कारस्थानाची उभारणी करण्यासाठीं ही सर्वे चांडाळ माणसे जमणार असती असा माझा तर्क आहे. पणती कोळी जाणार असळी तरी तं कान गडच्या अळीकडे हमरस्त्मानरच एत धर्मशाळा आरे, तेथन गा बाजरडा जो मार्ग फुटतो त्या मागनिं वळलास, कीं तुळा पाथ कासाच्या अवरावर एक देवाळय लागेल व त्या ठिकाणीं कांडी बेरागी तमी पेटयन बसकड तुळा आढळ, तीळ. त्यांना तू खबर द म्हणजें मळा ती बळीचे मिळेल. त् शक्य तर तॅथच थांब, किवा त्या मंडळीचा अखेरपर्यंत तुळा पाठलाग करता आला तर फारच चांगले झाले. तुला घोडा पाहिजे असला तरत्ता देैवाठगातील बराग्यांता सांग, म्हणजे ते तुझी व्यवस्था करतील. कदाषित् तू. अनीळणी म्हणून नै तुझ्याशी विश्वासाने बोलणार नाहींत; यास्तव तू ही लण आपणापाशीं
प्रसादर्चिन्हांचा सुगावा ११७ उव आणि त्यांना ती दाखीव, म्हणजे बिनभोबाट सर्वे कामें होतील. ” असें म्हणून मानाजीरावानें एक खुणेचें चिन्ह आपल्या कमरपटचांतून काढून संभाजीला दिलें. त्या चिन्हावर काय खोदलेले होतें हें काळोख्या रात्रीं संभा- जीला कळण्याला कांहींच मार्ग नव्हता. त्यानेंही तें जाणण्याचा प्रयत्न केला नाहीं. मानाजीरावाला जरी त्याच्याविषयीं संशय वाटत होता, तरी त्याला मानाजीरावाच्या उज्ज्वळ राजनिष्ठेबद्दह ब विश्वासूपणाबद्दळ लवमात्र संशय नव्हता. तो अत्यंत आज्ञाधारक सेवकाप्रमार्णे मानाजीची आज्ञा शिरसावंद्य मानून तेथून पुढे निघाला व मानाजीरावानेंहि आपल्या घोड्याला टांच मारली. त्या काळोखाच्या गर्दीत संभाजीने अनेकवार मार्गे वळून पाहिलें. परंतु मानाजीरावाचा घोडा कोणत्या दिशेला चालला होता हें कांहीं त्याला कळलें नाहीं. त्यारनेंह्रि त्याविषयी जास्त उत्सुकता मनांत बाळगली नाहीं. केवळ वरिष्ठांच्या हुकुमाची तामिळी करावयाची, यापेक्षां जास्त भानगडींत' पडावयाचें नाहीं, अशा शिस्तीचा शिपाईगडी तो होता.
संभाजीच्या मनांतून त्या मंडळीचा तपास काढून, मानाजीरावानें सांगित- त्याप्रमाणे इत्थंभूत बातमी काढावयाची होती. परंतु त्याला त्या मंडळी- पासून आपलें अस्तित्व गुप्त राखतां आले नाहीं. त्याला आपल्या मनांतील प्रामाणिकपणा मनांत ठेवून बाह्यात्कारी तरी त्या मंडळीच्या तंत्राने वागणें भ्राप्त झालें.
“ संभाजी, इतवा वेळ तूं कोठे होतास ? ” कोय़राजीनें संभाजीला अचानक आलेला पाहून विचारलें.
संभाजीने प्रसंगावधानपूर्वक उत्तर दिलें, “ धनी, मी स्वतःला कांहीं करा- मत दाखवतां आली तर पहावी म्हणून शत्रूच्या तलासावर गेलों होतों
मर्ग, कांहीं तलास लागला का? ” अपख्पाराणीनें उत्सुकतापूर्वक
संभाजीकडे पद्टात विचारलें
या प्रश्नाला आतां काय उत्तर द्यावे, याविषयी क्षणभर संभाजीच्या मनांत गोंधळ 'उडाला. परंतु दुसऱ्याच क्षणाळा तो तोंडाला आलें तें कांहींतरी उत्तर देऊन मोकळा झाला, “ करुणाराणी व भझंंजारराव यांचें वास्तव्य सध्यां कांचनगडावर असावें असा सुगावा मला लागला आहे.
“ आम्हांलाहि तोच संशय होता व म्हणूनच आम्हीहि तिकडेच चाललों
११८ पेशवाईचें मन्वंतर
“६.४ ५-./५/५-/%/५-५/* “४४४ «८४२ /* “7-८. “४.” “५. “४.८.” ८४ “१७ ७ /९१ ८ _/ "७
होतों. त्याला तुझ्या या बातमीने बळकटी मिळाली. ” कोयाजी म्हणाला.
त्या मंडळींना कांचनगडाकडे झुकवून मानाजीरावाच्या हातून त्यांचा परस्पर बंदोबस्त होईल अशी व्यवस्था करावी म्हणून संभाजी सहज कांचन- गडचा उल्लेख करून गेला. परंतु आतां त्याला हुरहूर वाटूं लागली कीं, ह्या मंडळीच्या माहितीप्रमाणे खरोखरच जर करुणाराणी कांचनगडावर असेळ, तर तिला ह्या चांडाळाच्या जबड्यांत लोटण्याचें पातक आपणाला लागेल! परंतु एकवार तोंडांतून शब्द गेला, आतां तेथें संभाजीचा तरी कायः इलाज होता! त्यांतल्या त्यांत तेवढ्यांत अपरूपाराणीनें कांचनगडच्या रोंखाने पुढें जाऊन आपल्या सैनिकांनिशीं गडाची नाकेबंदी करण्याची कामगिरी त्याला सांगितली, तेवढेंच त्याला समाधान वाटलें.' आपण जलदीने पुढे जाऊन जर करुणाराणी तेथें असेळ तर तिला ताबडतोब सुखरूपपणे गडाच्या बाहेर काढून देऊं असा त्याचा मानस होता.
परंतु कोयाजीनें त्याला अपशकून केला. त्याला संभाजीविषयीं संशय आला म्हणून कीं काय न कळे, तो मध्येंच म्हणाला, “चल, मीहि तुझ्याबरोबर येतों. न जाणों, किल्लेदार जर करुणा राणीला फितूर झाला असला तर तेथें तुझा एकट्याचा पाड लागावयाचा नाहीं. ”
आतां प्राप्त परिस्थितीला मुकाट्यानें तोंड देणे संभाजीला प्राप्त होतें. लगेच कोयाजी सैनिकांच्या एका तुकडीसह कांचत्तगडाकडे वळला व संभाजी- लाहि त्याच्या बरोबरच जावें लागलें.
प्रकरण १६ वें, करुणाराणीवर संकट !
वि शशश॒ाबाडआजजबखअाबाकककििबबशुशावावावाार बाय काँ कांचनगड वरवर दिसावयाला जरी सामान्य किल्ला होता, तरी त्याला ऐतिहासिक महत्त्व फार होतें. खुद्द किल्ला पहिल्या प्रतीचा लढावू नसला तरी नकेबंदीच्या दृष्टीनें त्याचें महत्त्व कोणत्याहि पहिल्या प्रतीच्या लढावू किल्ल्याइतकें होतें. दमलचेरीच्या घाटांत* शिरतांना व पुढील प्रवास करतांना, ज्याप्रमाणें तेथल्या स्थायिक सत्ताधाऱ्यांना कांचनगड हा साक्षात् परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे असें वाटे, त्याप्रमाणेंच शत्रु त्या तोंडानें गड चढून येऊं लागला किवा विरुद्ध दिशेनें गड ओलां- डून येऊं लागला, तर हा प्रत्यक्ष कर्दनकाळ आपला अक्राळविक्राळ जबडा पसरून आपणाला गिळंकृत करावयाला उभा आहे कीं काय, असें वाटून शत्रूची छाती दडपून जाई. तेव्हां थोड्याच दिवसांपूर्वी दमलचेरीच्या घाटांत मराठे आणि अर्काटचा नबाब यांची जी धुमश्चक्री झाली त्या प्रसंगीं कांचनगड * इ. स. १७४० मध्यें शाहू महाराजांनीं भराठ्यांची जंगी फोज रघूजी भोंसले वगेरे शूर सरदारांच्या नेतुृत्वाखालीं कर्नाटकांत अर्का- टचा नबाब दोस्तअल्लीखान याच्याशीं सामना देण्यासाठीं रवाना केली. तें सर्वे सेन्य त्या वर्षाच्या एप्रिल महिन्यांत अर्काट प्रांतांत येऊन दाखल झालें. ते पाहून नबाब दोस्तअल्लीखान हा मराठ्यांशीं टक्कर देण्यासाठीं कडप्पा आणि अर्काट या दोन जिल्ह्यांच्यामध्यें दमलचेरीचा जो घाट आहे ती सुरक्षित जागा समजून तिथें आपले चार हजार घोडेस्वार व सहा हजार पायदळ घेऊन दाखळ झाला. उभय पक्षांचे त्या घाटांत घनघोर युद्ध झालें. त्यामध्यें मराठ्यांनी विश्षेष शौर्य गाजविले व अद्वितीय यश संपादन केलें. नबाब दोस्तअल्लीखान पतन पावून शत्रूच्या हस्तगत झाल्यामुळें त्या सर्वे संन्याची दाणादाण उडून गेली व तें सेरावेरा पळून गेलें. त्यामुळें मराठ्यांना अर्काट प्रांतांत इतस्ततः आपला अंमल बसवतां आला.-इतिहाससंग्रह (तंजावरचे राजघराणें. )
१२० पेशवाईचे मन्वंतर मराठ्यांच्या हातीं आला. त्यापूर्वी तेथें अर्काटच्या नबाबाची सत्ता होती. तो गड हातचा जाऊं नये म्हणून नबाबानें आपलें सहस्रावधी सेन्य इरेला घातलें व मराठ्यांनींहि त्या गडाचें महत्तव ओळखून आपल्या नेकजात कडव्या सेनिकांच्या प्राणांची पर्वा न करतां त्यांच्या रक्ता-मांसाचा चिखल करून, किल्ला सर करण्याची वाट बांधून काढली, असें म्हणावयाला हरकत आहों. नबाबावर विजय मिळवून देण्याच्या कामीं कांचनगडाचा इतका उपयोग झाल्यामुळें मराठ्यांना तो गड आपल्या एखाद्या पुरातन देवालयाइतका पवित्र वाटूं लागला होता.
परंतु पेशवाईतील उलाढालीच्या निमित्ताने, मराठ्यांच्या कर्नाटकांतील सर्व हालचाली थांबून त्यांच्या सेन्याचा तळ शिवगंगेळा पडल्यापासून भ्रट्या शत्रूंना पुन्हां दमलचेरीच्या घाटांत व त्याच्या आजूबाजूला दंगामस्ती करा- वयाला हळुहळू फावूं लागलें होतें. त्यांतच कांचनगड्च्या बाटग्या मुसलमान किल्लेदाराच्या नीचवृत्तीची भर पडन मराठ्यांचें-नव्हे, हिदवी-सर्वेस्वाचें काळीज पोंखरून खाणार्या शत्रुशक्तीला तेथें हळुहळू आपलें ठाण मांडण्याला अवकाश मिळाला होता. भमीरकासीम हा वास्तविक केवळ मराठ्यांच्या जिवावर, आणि तोही दमलचेरीच्या घाटांतील लढाईत उदयासं आलेला. त्यानेंच घाटांतील अनेक गुप्त मार््याच्या जागा व महत्त्वाच्या गुप्त वाटा मराठ्यांना दाखवून देऊन त्या मोबदल्यांत तेथली किल्लेदारी मिळविली होती. पण मराठ्यांना त्या दगलबाज मीरकासीमचा खरा स्वभाव काय माहीत! तो जो मूळचा मराठा असतांना बाटून मुसलमान झाला होता, तो केवळ नबा- बाची मर्जी संपादन करून सानमान्यता मिळवण्यासाठीं. त्याचीच गोष्ट कश्याला? आणखी असेच कांहीं कुऱ्हाडीचे दांडे गोताला काळ होऊन बसलेले होते त्यांतळा तो एक. त्यानें बाटून त्या बाटगेपणाच्या जोरावर नबाबाच्या पदरीं शिलेदारी मिळवली होती. मराठे आणि नबाब यांचा सामना जपून त्यांत नबाबाची धडगत नाहीं असा रागरंग दिसूं लागतांच तो विश्वासघातकी लगेच नबाबाच्या विरुद्ध मराठ्यांना सामील झाला, आणि आतां मराठेहि किल्ला आपल्या स्वाधीन करून तेथून सातार््याकडे निघून गेलेले पाहतांच त्याला अशी हांव उत्पन्न झाली होती, “ आपण जन्मभर एवढ्या लहानश्या किल्ल्याचे किल्लेदारच कां म्हणून रहावयाचें ! केव्हांपासून नबाब तिकडे फजीत पावून
करुणाराणीवर संकट १२१
*५४..४%./ ९.४५./१९.,/४.४११../१, ४. /४./४६. ४९.५४” ४१.” /५/0-४५१-४१५०/४-/ ४०-८४”. 00५ 0.”
हाय हाय करीत बसला आहे व मराठे घरचें भांडण भांडण्यासाठीं कर्नाटकांतील मोहीम अर्धवट सोडून सातार््याकडे निघून गेले आहेत. यावेळीं आपणांला लहानसे स्वतंत्र राज्य स्थापून दमलचेरीचा छोटासा सुलतान व्हावयाला ही संश्रि फार नामी आहे.” आणि त्यानें त्या रोंखारने आपले सारे उपद्व्याप चालविले होते. तो वृत्तान्त वाचकांना पुढें कळेलच. तृ्त येथें एवढें निवेदन केलें म्हणजे पुरे कीं, कोयाजी आणि अपरूपाराणी यांच्या विषयींचा मानाजो- 'रावाचा तके कांहीं खोटा नव्हता. त्याच्या अटकळीप्रमाणें ती मंडळी रातोरात नेमकी कांचनगडच्या रोंखानेंच गेली होती.
त्यावेळीं
कांचनगडावर
त्या
काळोख्या
रात्रीलाही
लाजविणारा
निराळाच
भयंकर
काळोखा
प्रकार
चालला
होता.
पूर्वोक्त
दुरात्मा
मीरकासीम
एका
असहाय
सुंदरीला
किल्ल्यांत
कोंडून
तिच्या
अबरूवर
घाला
घालण्यासाठी
टपून
बसला
होता.
मात्र
बाहेरच्या
मंडळींना
त्या
प्रकाराची
दाद
लागणें
शक्य
नव्हतें.
राजे
लोकांच्या
राजवाड्यांत
काय,
किवा
अद्या
थोरामोठ्यांच्या
घरांत
काय,
नेहमींच
अश्या
कांहीं
अनन्वित
गोष्टी
घडत
असतात
कीं
बाहेरच्या
जगाला
त्याची
दादही
नसते.
त्यांतलाच
प्रकार
त्या
रात्रौ
चालला
होता.
कोयाजी
व
अपख्पाराणी
यांच्या
अटकळीप्रमाणें
करुणाराणी
व
झुंजारराव
दोघेहि
'त्या
किल्लेदाराच्या
आश्रयाला
आल्याला
पुरे
चार
प्रहरहि
लोटले
नाहींत,
तोंच
मीरकासीमनें
करुणाराणीचा
छळ
मांडिला
होता.
त्या
छळाचें
वर्णेन
स्वत:च्या
शब्दांत
देण्यापेक्षा
त्यांच्या